Traffic Congestion : वाहतूक कोंडीचा अर्थव्यवस्थेला फटका;चार शहरांना दरवर्षी ₹१.४७ लाख कोटींचे नुकसान

नवी दिल्ली: देशातील प्रमुख महानगरांमधील वाढती वाहतूक कोंडी ही केवळ नागरिकांच्या गैरसोयीचा विषय राहिलेली नसून, ती देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार ठरत असल्याचे आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये नमूद करण्यात आले आहे. दिल्ली, मुंबई, बंगळूर आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये वाहतूक कोंडीमुळे दरवर्षी सुमारे ₹१.४७ लाख कोटींचे आर्थिक नुकसान होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.या नुकसानीमध्ये वाहतूक कोंडीत वाया जाणारा वेळ, उत्पादकतेतील घट, इंधनाचा अतिरिक्त वापर आणि वाहतूक खर्चातील वाढ यांचा समावेश आहे. शहरी वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यात अपयश आल्यास येत्या काळात आर्थिक विकास, पर्यावरण आणि नागरिकांच्या जीवनमानावर त्याचे अधिक गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराही सर्वेक्षणात देण्यात आला आहे.



सर्वेक्षणानुसार, कोणत्याही महानगराच्या विकासात वाहतूक व्यवस्था ही रक्तवाहिनीप्रमाणे महत्त्वाची असते. लोक, वस्तू आणि सेवांची जलद व सुरळीत हालचाल अर्थव्यवस्थेला गती देते. मात्र अपुरी किंवा कमकुवत वाहतूक व्यवस्था असल्यास वाहतूक कोंडी, वायू व ध्वनी प्रदूषण आणि कार्यक्षमतेत घट यांसारख्या समस्या निर्माण होतात.दिल्लीतील सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (CSE) च्या अभ्यासानुसार, वाहतूक कोंडीमुळे अकुशल कामगारांचे वार्षिक ₹७,२०० ते ₹१९,६००, कुशल कामगारांचे ₹८,३०० ते ₹२३,८०० आणि उच्च कौशल्य असलेल्या व्यावसायिकांचे ₹९,००० ते ₹२५,९०० इतके वैयक्तिक आर्थिक नुकसान होते. बंगळूरमधील इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज (ISEC) च्या अभ्यासानुसार, २०१८ मध्ये वाहतूक कोंडीमुळे सुमारे ७.०७ लाख उत्पादक तास वाया गेले. त्यामुळे केवळ एका शहरातच सुमारे ₹११.७ अब्ज रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या विश्लेषणानुसार दिल्ली, मुंबई, बंगळूर आणि कोलकाता या चार महानगरांमध्ये वाहतूक कोंडीमुळे दरवर्षी एकूण ₹१.४७ लाख कोटींचे स्थूल आर्थिक नुकसान होते. विलंब, इंधनाचा अपव्यय आणि उत्पादकतेतील घट ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, डच लोकेशन टेक्नॉलॉजी कंपनी टॉमटॉमच्या २०२५ च्या विश्लेषणानुसार, जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या शहरांच्या पहिल्या १०० शहरांमध्ये भारतातील दहा शहरांचा समावेश आहे. यावरून देशातील शहरी वाहतूक व्यवस्थेवरील वाढता ताण स्पष्ट होत असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.(Traffic Congestion)



तज्ज्ञांच्या मते, वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणे, खाजगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करणे, रस्त्यांचा कार्यक्षम वापर वाढविणे आणि शहरांची रचना वाहनांऐवजी नागरिकांच्या सुरळीत प्रवासाला प्राधान्य देणारी असणे आवश्यक आहे. वाहतूक कोंडीचे मूळ कारण लोकांचा वाढता प्रवास नसून, कमी प्रवासी घेऊन धावणाऱ्या खाजगी वाहनांकडून रस्त्यावरील जागेचा होणारा मोठ्या प्रमाणातील वापर असल्याचे तज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे.


Comments
Add Comment

India-China Border : नाथुला खिंडीतून ६ वर्षांनंतर भारत-चीन सीमा व्यापार पुन्हा सुरू

सिक्किम : कोविड-१९ महामारी आणि त्यानंतरच्या सीमा तणावामुळे २०२० पासून बंद असलेला भारत-चीन सीमा व्यापार तब्बल ६

Bomb Making Paper In Collage : धक्कादायक! अयोध्येच्या मेडिकल कॉलेजच्या एक्स-रे विभागात सापडला बॉम्ब बनवण्याचा कथित आराखडा; तीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राजर्षी दशरथ मेडिकल कॉलेजमध्ये शनिवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार

Asmita Dey : सायकल मेकॅनिकच्या लेकीची जागतिक भरारी! अस्मिता डेने ज्युडोमध्ये रचला इतिहास, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय ठरली

ग्लासगो : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमांच्या जोरावर कोणतीही स्वप्ने पूर्ण करता येतात, हे त्रिपुराच्या २३

राष्ट्रकुल खेळ २०२६: बॉक्सिंगमध्ये भारताचा सुवर्णधमाका; प्रीती पवार आणि जास्मिन लांबोरिया ठरल्या सुवर्णकन्या!

ग्लासगो : राष्ट्रकुल खेळ २०२६ च्या दहाव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. रिंगण गाजवत

Alluri Sitarama Raju Airport : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आंध्र प्रदेशात 'अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळा'चे उद्घाटन

₹१७,९०० कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण! विझियानगरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी आंध्र

Rashmika Mandanna Injured : शूटिंगदरम्यान रश्मिका मंदानाला गंभीर दुखापत; ६ आठवडे विश्रांतीचा सल्ला!

मुंबई : दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीची लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिच्या चाहत्यांसाठी