Maharsahtra Weather : राज्यात पावसाचा जोर ओसरला; बहुतांश जिल्ह्यांना दिलासा, १५ जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने अखेर काहीशी विश्रांती घेतली आहे. गुरुवारपासून अनेक भागांतील पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज (१० जुलै) घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात कुठेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. (Weather Update)



कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, या जिल्ह्यांसाठी कोणताही रंगीत इशारा नसल्याने मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. (Maharashtra rain)


पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्येही हवामानात बदल जाणवत आहे. अनेक दिवसांनंतर काही भागांत सूर्यदर्शन झाले असून हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी येलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. (Monsoon Update)



मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती आणि पेरणीची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळणार आहे. (IMD)


उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर कमी झाला असून हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. सततच्या पावसानंतर अनेक ठिकाणी सूर्यदर्शन होत असल्याने वातावरणात बदल जाणवत आहे. (Maharashtra monsoon)


विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, भंडारा, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Weather)


दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात १५ जुलैनंतर पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभाग व कृषी विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवून नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईत दूध भेसळ प्रकरणावर FDA ची मोठी कारवाई; ४७० लिटर दूध जप्त करून नष्ट

मुंबई : मुंबईतील दहिसर परिसरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दूध भेसळीविरोधात मोठी कारवाई करत भेसळयुक्त दूध जप्त केले

Moshi Building Collapse : दीड वर्षांचा संसार क्षणात उद्ध्वस्त; पत्नीला शेवटचा मेसेज पाठवून भावेशवर काळाचा घाला

मोशी (पिंपरी-चिंचवड) : पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील मोशी (Moshi) कचरा डेपो (Garbage Depot) परिसरात घडलेल्या भीषण दुर्घटनेत (Accident) एका

Moshi Building Collapse : ४० तास उलटले... तरी मोशी दुर्घटनेतील ८ कामगारांचा अद्यापही सापडले नाही; रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर

मोशी (पिंपरी-चिंचवड) : पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो (Moshi Garbage Depot) येथे बुधवारी दुपारी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर

Ashadhi Wari 2026 : भक्तीचा उत्सव रंगला! पुण्यात संतांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

पुणे : "देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या..." या हरिपाठातील ओळींचा प्रत्यय देणारे भक्तिमय

Parth Pawar : मुंढवा जमीन वादात न्यायालयाचा मोठा आदेश; पार्थ पवारांच्या कंपनीचा दस्त रद्द

पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन प्रकरणात महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय देण्यात आला असून, उपमुख्यमंत्री

Moshi building collapse : मोशी इमारत दुर्घटना : एकाचा मृत्यू, सहा जण अद्याप ढिगाऱ्याखाली; २२ तासांपासून बचावकार्य सुरू

पुणे : मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील दुमजली इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळल्याच्या दुर्घटनेत