Maharsahtra Weather : राज्यात पावसाचा जोर ओसरला; बहुतांश जिल्ह्यांना दिलासा, १५ जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने अखेर काहीशी विश्रांती घेतली आहे. गुरुवारपासून अनेक भागांतील पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज (१० जुलै) घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात कुठेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. (Weather Update)



कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, या जिल्ह्यांसाठी कोणताही रंगीत इशारा नसल्याने मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. (Maharashtra rain)


पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्येही हवामानात बदल जाणवत आहे. अनेक दिवसांनंतर काही भागांत सूर्यदर्शन झाले असून हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी येलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. (Monsoon Update)



मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती आणि पेरणीची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळणार आहे. (IMD)


उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर कमी झाला असून हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. सततच्या पावसानंतर अनेक ठिकाणी सूर्यदर्शन होत असल्याने वातावरणात बदल जाणवत आहे. (Maharashtra monsoon)


विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, भंडारा, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Weather)


दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात १५ जुलैनंतर पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभाग व कृषी विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवून नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात २० ऑगस्टला पाऊस बरसणार; ४ जिल्ह्यांना हवामान खात्याचा यलो अलर्ट

मुंबई : सध्या राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी २० ऑगस्ट रोजी अनेक भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान

Energy and Nanotechnology : पुणे आणि मुंबई विद्यापीठांचा अनोखा उपक्रम; ऊर्जा आणि नॅनोटेकनॉलॉजीमध्ये संयुक्त एमटेक अभ्यासक्रम सुरू

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) आणि मुंबई विद्यापीठ (MU) यांच्यातर्फे संयुक्त पदव्युत्तर तंत्रज्ञान

Pandavkada Waterfall : पावसाळी सहल ठरली जीवघेणी; कुर्ल्यातील १६ वर्षीय मुलाचा खारघरमधील पांडवकडा धबधब्यात बुडून मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील पांडवकडा धबधब्यात मंगळवारी संध्याकाळी एका १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. या

Nitesh Rane : श्रीवर्धन तालुक्यातील मच्छिमार बांधवांवरील गुन्हे मागे घेणार

- मंत्री नितेश राणे; खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई : रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल

Deemed Conveyance : राज्यातील ७० हजार गृहनिर्माण सोसायट्यांच्या 'डीम्ड कन्व्हेअन्स'चा मार्ग मोकळा

- मालमत्ता पत्रक आणि सातबारावर सोसायटीच्या नावाची नोंद होणार - स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन आणि कर सवलतींची

Dhiraj Kalawate Organ Donation : धिरजचा श्वास थांबला पण अवयवदानातून अनेकांचे श्वास राहणार सुरू

अमरावती : एका आठवड्यापूर्वी, आपल्या मित्रांसोबत केदारनाथ आणि बद्रीनाथला भेट देऊन आनंदाने घरी परतलेल्या ३०