Maharsahtra Weather : राज्यात पावसाचा जोर ओसरला; बहुतांश जिल्ह्यांना दिलासा, १५ जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने अखेर काहीशी विश्रांती घेतली आहे. गुरुवारपासून अनेक भागांतील पावसाचा जोर कमी झाल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज (१० जुलै) घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात कुठेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. (Weather Update)



कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, या जिल्ह्यांसाठी कोणताही रंगीत इशारा नसल्याने मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. (Maharashtra rain)


पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्येही हवामानात बदल जाणवत आहे. अनेक दिवसांनंतर काही भागांत सूर्यदर्शन झाले असून हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी येलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. (Monsoon Update)



मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती आणि पेरणीची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी अनुकूल वातावरण मिळणार आहे. (IMD)


उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर कमी झाला असून हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. सततच्या पावसानंतर अनेक ठिकाणी सूर्यदर्शन होत असल्याने वातावरणात बदल जाणवत आहे. (Maharashtra monsoon)


विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, भंडारा, नागपूर आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Weather)


दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात १५ जुलैनंतर पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांनी हवामान विभाग व कृषी विभागाच्या सूचनांवर लक्ष ठेवून नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा कहर! अमरावती-यवतमाळला रेड अलर्ट; 'या' जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

पुढील 24 तास महत्त्वाचे; काही भागांत 200 मिमीपर्यंत पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई:

Chandrashekhar Bawankule : ज्येष्ठ नागरिकांच्या अर्जांवर ९० दिवसांत निर्णय बंधनकारक

- निष्काळजी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : आई-वडील आणि ज्येष्ठ

Pune Murder : शिक्रापुरात पोत्यात सापडलेल्या तरुणाच्या मृतदेहाचं गूढ उलगडलं; अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटकडून खून

धक्कादायक! पत्नीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला; दोन्ही आरोपींना अटक पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील

Ahilyanagar : 'ॲट्रॉसिटी’चे खटले चालवण्यासाठी अहिल्यानगरला विशेष न्यायालय मंजूर

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानूसार (Scheduled Castes and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act) दाखल

IMD Monsoon update : पुढील ४८ तास अत्यंत धोक्याचे; हवामान विभागाकडून धुवांधार पावसाचा इशारा; पाहा तुमचा जिल्हा आहे का ?

मुंबई : राज्यात पावसाने पुन्हा एकदा अत्यंत रौद्र रूप धारण केले असून आगामी दोन दिवस विविध भागांत मुसळधार ते

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची पहिली ट्रायल यशस्वी; ट्रॅफिकच्या जाचातून मिळणार दिलासा

माण ते आर. के. लक्ष्मण म्युझियम या १३ किमी टप्प्याला सुरक्षा मंजुरी; पहिल्या टप्प्यात १२ स्थानकांवरून मेट्रो