Nashik News : आधी पत्नी आता पतीचाही मृत्यू, शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं अन होत्याचं नव्हतं झालं; घटनेनं गूढ वाढलं

Nashik News : काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्याच्या बागलाण (Baglan) तालुक्यातील आखतवाडे (Akhatwade) येथे एका शेतकरी दाम्पत्याने रात्री जेवणात चिकन खाल्यांनंतर त्यांनी दही खाल्ले आणि त्यांनतर थोड्यावेळाने दाम्पत्याची अचानक प्रकृती बिघडल्याची घटना घडली. या घटनेत उपचारापूर्वीच पत्नीचा मृत्यू झाला होता, तर पतीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आता 10 दिवसानंतर पतीचा देखील मृत्यू झाला आहे.


राज्यात खाण्या-पिण्याच्या गोष्टींमधील भेसळ हा मुद्दा सध्या राज्यभरात चर्चेत आहे. मध्यंतरी मुंबईतील पायधुनी प्रकरणात कलिंगड खाल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. त्या मृत्यूबाबतही अनेक उलट सुलट चर्चा सुरु होत्या. दरम्यान आता बागलाण मध्येही अशीच घटना समोर आली आहे.



नेमकं काय घडलं ?


28 जून रोजी रात्री चिकनचं जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. उपचारासाठी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज (Dwarkabai Shantaram Hallij) यांचा मृत्यू झाला. तर, त्यांचे पती शांताराम ह्याळीज (Shantaram Hallij) यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मालेगाव येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली असून दोघांच्याही मृत्यूमागचं कारण मात्र अद्याप गुलदस्तात आहे.



अन्न व औषध प्रशासनाकडून दखल


या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) पथक गेल्या आठवड्यात आखतवाडे येथे दाखल झाले होते. पथकाने संबंधित ठिकाणावरील विविध खाद्यपदार्थांचे नमुने संकलित केले होते. सदर नमुने तपासणीसाठी अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार होते. मात्र, अद्यापही या विषबाधासंदर्भातील अहवाल समोर आलेला नाही. अहवालातून विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याने हा अहवाल महत्वाचा असणार आहे.



वैद्यकीय तज्ज्ञाच्या मतं विषबाधा


दरम्यान, या विषबाधेच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती, नेमकी विषबाधा चिकनमुळे झाली की दह्यामुळे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अनेकदा मटण आणि दही एकत्र खाल्ल्याने किंवा अन्न शिळे असल्यास फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो. मात्र, या प्रकरणातील नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : महाराष्ट्र-हेसन भागीदारीतून गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र आणि हेसन दरम्यान परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य

China Visa : भारतीयांना व्यावसायिक कामांसाठी चीनला जाणे झाले कठीण

बीजिंग : चीनने भारतीयांसाठी व्यावसायिक व्हिसाच्या नियमांमध्ये बदल के

Samsung Galaxy : सॅमसंग गॅलेक्सी एस२६ एफई लीक; नवीन फीचर्स, एक्सिनोस २५०० प्रोसेसर आणि इतर तपशील उघड!

सॅमसंगचा आगामी फॅन एडिशन स्मार्टफोन 'गॅलेक्सी एस२६ एफई' (Galaxy S26 FE) लाँच होण्यापूर्वीच इंटरनेटवर त्याचे फीचर्स आणि

CM Devendra Fadnavis : केंद्र पुरस्कृत योजनांच्या निधी खर्चात शालेय शिक्षण विभाग अव्वल

- ९६ टक्के निधीचा विनियोग; कृषी, ग्रामीण विकास आणि महिला-बाल विकास विभागांचीही उल्लेखनीय कामगिरी मुंबई : केंद्र

Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय! ३७४ हेक्टर जमिनीवरील ‘महाराष्ट्र शासन राखीव वने’ नोंद कायम

ठाणे : भाईंदरपाडा (ओवळे) येथील तब्बल ३७४ हेक्टर ७९ आर वनजमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादात

Prakash Abitkar : आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर, प्रशिक्षण प्रणालीमध्ये अमुलाग्र बदल; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या