Nashik News : आधी पत्नी आता पतीचाही मृत्यू, शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं अन होत्याचं नव्हतं झालं; घटनेनं गूढ वाढलं

Nashik News : काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्याच्या बागलाण (Baglan) तालुक्यातील आखतवाडे (Akhatwade) येथे एका शेतकरी दाम्पत्याने रात्री जेवणात चिकन खाल्यांनंतर त्यांनी दही खाल्ले आणि त्यांनतर थोड्यावेळाने दाम्पत्याची अचानक प्रकृती बिघडल्याची घटना घडली. या घटनेत उपचारापूर्वीच पत्नीचा मृत्यू झाला होता, तर पतीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आता 10 दिवसानंतर पतीचा देखील मृत्यू झाला आहे.


राज्यात खाण्या-पिण्याच्या गोष्टींमधील भेसळ हा मुद्दा सध्या राज्यभरात चर्चेत आहे. मध्यंतरी मुंबईतील पायधुनी प्रकरणात कलिंगड खाल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. त्या मृत्यूबाबतही अनेक उलट सुलट चर्चा सुरु होत्या. दरम्यान आता बागलाण मध्येही अशीच घटना समोर आली आहे.



नेमकं काय घडलं ?


28 जून रोजी रात्री चिकनचं जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. उपचारासाठी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज (Dwarkabai Shantaram Hallij) यांचा मृत्यू झाला. तर, त्यांचे पती शांताराम ह्याळीज (Shantaram Hallij) यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मालेगाव येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली असून दोघांच्याही मृत्यूमागचं कारण मात्र अद्याप गुलदस्तात आहे.



अन्न व औषध प्रशासनाकडून दखल


या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) पथक गेल्या आठवड्यात आखतवाडे येथे दाखल झाले होते. पथकाने संबंधित ठिकाणावरील विविध खाद्यपदार्थांचे नमुने संकलित केले होते. सदर नमुने तपासणीसाठी अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार होते. मात्र, अद्यापही या विषबाधासंदर्भातील अहवाल समोर आलेला नाही. अहवालातून विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याने हा अहवाल महत्वाचा असणार आहे.



वैद्यकीय तज्ज्ञाच्या मतं विषबाधा


दरम्यान, या विषबाधेच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती, नेमकी विषबाधा चिकनमुळे झाली की दह्यामुळे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अनेकदा मटण आणि दही एकत्र खाल्ल्याने किंवा अन्न शिळे असल्यास फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो. मात्र, या प्रकरणातील नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही.

Comments
Add Comment

Mumbai Redevelopment : मुंबईतील पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

 म्हाडा सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर; न्यायालयीन आणि प्रशासकीय अडचणी होणार दूर मुंबई : दक्षिण मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : शर्तभंग झालेल्या जमिनी सरकार जमा करणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश मुंबई : राज्यातील सिडको, नैना, एमएमआरडीए(MMRDA) तसेच विविध नगरपालिका आणि

Chandrashekhar Bawankule : शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करण्याच्या बहाण्याने जमिनींच्या मालकी हक्कात फेरफार

महसूल खात्यात 'कलम १५५' चा गैरवापर; पुण्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांसह १५ अधिकारी निलंबित मुंबई :

Devendra Fadnavis : २०१९ मधील लाभधारक शेतकऱ्यांनाही सरसकट कर्जमाफी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; 'भाडे के टट्टू'वर आक्षेप घेणाऱ्यांना संबोधले 'सुपारीबाज' मुंबई :

Eknath Shinde : सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वक्तव्य

आपत्ती व्यवस्थापनात तात्काळ प्रतिसाद आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर भर मुंबईसह राज्यभर पायाभूत सुविधांच्या

Mangal Prabhat Lodha : स्टार्टअपद्वारे ज्ञानाचे उद्योगात रूपांतर करून विकसित भारत घडविण्याची गरज

‘स्टार्टअप फ्रंटियर 1.0’ कार्यशाळेचे राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :  ज्ञानाचे नाविन्यपूर्ण