Nashik News : काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्याच्या बागलाण (Baglan) तालुक्यातील आखतवाडे (Akhatwade) येथे एका शेतकरी दाम्पत्याने रात्री जेवणात चिकन खाल्यांनंतर त्यांनी दही खाल्ले आणि त्यांनतर थोड्यावेळाने दाम्पत्याची अचानक प्रकृती बिघडल्याची घटना घडली. या घटनेत उपचारापूर्वीच पत्नीचा मृत्यू झाला होता, तर पतीवर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आता 10 दिवसानंतर पतीचा देखील मृत्यू झाला आहे.
राज्यात खाण्या-पिण्याच्या गोष्टींमधील भेसळ हा मुद्दा सध्या राज्यभरात चर्चेत आहे. मध्यंतरी मुंबईतील पायधुनी प्रकरणात कलिंगड खाल्याने विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता. त्या मृत्यूबाबतही अनेक उलट सुलट चर्चा सुरु होत्या. दरम्यान आता बागलाण मध्येही अशीच घटना समोर आली आहे.
Nashik Crime : नाशिकच्या उच्चभ्रू आणि सुसंस्कृत परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंडित कॉलनीत भररस्त्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ ...
नेमकं काय घडलं ?
28 जून रोजी रात्री चिकनचं जेवण आणि त्यानंतर दही खाल्ल्यानंतर या वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अचानक बिघडली. उपचारासाठी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु दुर्दैवाने उपचारादरम्यान 68 वर्षीय द्वारकाबाई शांताराम ह्याळीज (Dwarkabai Shantaram Hallij) यांचा मृत्यू झाला. तर, त्यांचे पती शांताराम ह्याळीज (Shantaram Hallij) यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, मालेगाव येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली असून दोघांच्याही मृत्यूमागचं कारण मात्र अद्याप गुलदस्तात आहे.
Nashik :राज्यात झालेल्या 'ऑपरेशन टायगर' प्रमाणेच नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) राजकारणात सध्या 'ऑपरेशन टायगर' (Operation Tiger) आणि नगरसेवकांच्या संभाव्य ...
अन्न व औषध प्रशासनाकडून दखल
या प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) पथक गेल्या आठवड्यात आखतवाडे येथे दाखल झाले होते. पथकाने संबंधित ठिकाणावरील विविध खाद्यपदार्थांचे नमुने संकलित केले होते. सदर नमुने तपासणीसाठी अधिकृत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार होते. मात्र, अद्यापही या विषबाधासंदर्भातील अहवाल समोर आलेला नाही. अहवालातून विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याने हा अहवाल महत्वाचा असणार आहे.
Nashik : नाशिक शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. नाशिक शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त असतानाच, ...
वैद्यकीय तज्ज्ञाच्या मतं विषबाधा
दरम्यान, या विषबाधेच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती, नेमकी विषबाधा चिकनमुळे झाली की दह्यामुळे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अनेकदा मटण आणि दही एकत्र खाल्ल्याने किंवा अन्न शिळे असल्यास फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो. मात्र, या प्रकरणातील नेमकी विषबाधा कशामुळे झाली, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेलं नाही.