Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये मुसळधार ! भंडारदरा निम्मे भरले तर मुळा नदीला पूर

Ahilyanagar :गर जिल्ह्यात देखील पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील भंडारदरा धरण निम्मे भरले आहे. भंडारदरा धरण पाणलोटात पुनर्वसु नक्षत्रांच्या सरींचे तांडव सुरू असल्याने धरणात वेगाने नवीन पाण्याची आवक होत आहे. 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरण काल सायंकाळी 5 वाजता निम्मे झाले. काल सायंकाळी पाणीसाठा 5604 दलघफू (50.76 टक्के) झाला होता. वाकीचा ओव्हरफ्लो वाढला असून निळवंडेतही आवक वाढल्याने हे धरण 25 टक्क्यांवर गेले आहे.



मुळा नदीला पूर


सोबतच अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरण (Mula Dam) पाणलोटातील अकोलेतील हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित व अन्य भागात अतिवृष्टी होत असल्याने काल दुपारपासून अकोलेतील मुळा नदीला पूर वाढला आहे. सकाळी कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग केवळ 13836 क्युसेक होता. पण धो धो पाऊस कोसळत असल्याने क्षणाक्षणाला मुळाचा विसर्ग वाढत होता. दुपारी 12 वाजता हा विसर्ग 29533 क्युसेक होता. त्यानंतर दुपारी 3 वाजता हा विसर्ग 37875 क्युसेकवर पोहचला होता.



शेती जलमय, प्रचंड नुकसान


मुळा नदीला पूर आल्याने मुळा धरणात विक्रमी आवक होत आहे. उद्याही आजच्यापेक्षा अधिक आवक होणार आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढणार आहे. दरम्यान, पुरामुळे लहीत खुर्द-लहीत बुद्रुक जोडणारा पूल पाण्याखाली गेला असून दोन्ही गावांमधील संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. पुराचे पाणी कोतूळ येथील कोतूळेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. तसेच शेती जलमय झाली असून प्रचंड नुकसान झाले आहे.


तर नाशिकमध्येही मुसळधार पाऊस बरसत आहे. अनेक ठिकाणची नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक धरणांमधून आता विसर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून (Nandur Madhmeshwar) बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात (Godavari River) १५ हजार २४८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. आता याच निसर्गाच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.



विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता


सुरुवातीला नांदूर मध्यमेश्वर (Nandur Madhmeshwar) बंधाऱ्यामधुन 18403 क्युसेक्स ने विसर्ग चालू होता तरी तो विसर्ग दुपारी 2 वाजता 10531 क्युसेक्स ने वाढ करून एकूण 28934 क्यूसेक्स करण्यात आला आहे.सदर विसर्गात टप्याटप्याने वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी गोदावरी नदीपात्रालगतच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावर असल्यास तात्काळ हलविण्यात यावे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे. तरी प्रशासकीय विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : मुंबईच्या पूर नियंत्रणासाठी १३ हजार कोटींचा आराखडा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

- 'फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको', विरोधकांना आवाहन मुंबई : "मुंबईला दरवर्षी भेडसावणाऱ्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत मंत्री नितेश राणेंचे कौतुक

वॉटर मेट्रोसाठी प्रभावी काम; ३४० किमी वॉटर मेट्रोमार्गांचे जाळे उभारणार मुंबई : मुंबई आणि महानगर प्रदेशातील

Pune Building Collapsed : मुसळधार पावसात भीषण दुर्घटना! पिंपरी-चिंचवडमध्ये वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची इमारत कोसळली; १४ जण अडकल्याची भीती

पुणे : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले असतानाच पुणे जिल्ह्यात मोठी

CM Devendra Fadnavis : फडणवीसांना बदनाम करा, पण महाराष्ट्राला नको; मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आवाहन

१ कोटी खोटारडे लोक मेले, तेव्हा हे पैदा झाल्याचा हल्लाबोल मुंबई : "देवेंद्र फडणवीसला हव्या तेवढ्या शिव्या द्या,

Mumbai Tree Collapse : वादळ आणि पावसात उन्मळून पडणाऱ्या झाडांचे जोखीम मूल्यांकन सुरू

मुंबई : मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई

Chandrashekhar Bawankule : ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या मालमत्तांची तपासणी होणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

- राज्यव्यापी तपासणीचा तीन महिन्यांत अहवाल देणार मुंबई : इंग्रजकालीन ख्रिश्चन मिशनरी संस्थांनी राज्यात मागे