Vandri Dam Waterfall : धबधब्यावर जाताय? थांबा! पालघरच्या वांद्री धबधब्यावर घडला थरार

धबधब्यांवर पाणी अचानक वाढलं आणि पर्यटकांची उडाली तारांबळ



पालघर : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर (Palghar) जिल्ह्यातील वांद्री धरण परिसरातील धबधब्यावर मोठी दुर्घटना टळली. पर्यटनासाठी आलेल्या अनेक पर्यटकांना अवघ्या दोन मिनिटांत वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे जीव मुठीत धरावा लागला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पावसाळी पर्यटनातील धोके पुन्हा एकदा समोर आले आहेत.



व्हिडिओमध्ये सुरुवातीला महिला, लहान मुले आणि इतर पर्यटक धबधब्याच्या पाण्यात आनंद घेताना दिसतात. मात्र काही क्षणांतच डोंगरावरून पाण्याचा वेग अचानक वाढला आणि पाण्याचा प्रवाह चिखलमय झाला. वाढत्या प्रवाहामुळे अनेक पर्यटक सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावपळ करताना दिसले. काहींनी एकमेकांचे हात धरून स्वतःचा तोल सावरत बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. (Vandri Dam Waterfall)



या संकटाच्या वेळी स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. प्रवीण नावाच्या स्थानिक तरुणासह ग्रामस्थांनी धाडस दाखवत पाण्यात अडकलेल्या महिला, मुले आणि इतर पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर पर्यटकांनीही बचावकार्यात हातभार लावल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Rescue Team)


हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या व्यक्तीने हा प्रकार जनजागृतीसाठी प्रसिद्ध केल्याचे सांगितले आहे. पावसाळ्यात धबधबे, नद्या आणि ओढ्यांमधील पाण्याची पातळी क्षणार्धात वाढू शकते. त्यामुळे रील्स, फोटो किंवा पिकनिकसाठी अशा धोकादायक ठिकाणी जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Rain)


दरम्यान, राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून प्रशासनाने धबधबे, नद्या आणि पूरस्थिती असलेल्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.


Comments
Add Comment

Maharashtra Rain Alert : 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे 29 ते 31 जुलैदरम्यान

Laxmanrao Joshi : ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे निधन; 'व्रतस्थ संपादकाला मुकलो' – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :  नागपूर 'तरुण भारत'चे माजी मुख्य संपादक ल. त्र्यं. (लक्ष्मणराव) जोशी (Laxmanrao Joshi) यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री

Illegal Mining : अवैध गौण खनिज उत्खननासाठी दहापट दंड

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे समभाग भांडवल ५०० कोटींवर मुंबई : राज्यातील वाळू आणि

Satara Suicide : NEET परीक्षेतील अपयशाने खचली! कराडमधील १८ वर्षीय विद्यार्थिनीची विष प्राशन करून आत्महत्या

सातारा : गेल्या काही दिवसांपासून नीट पेपरफुटीमुळे देशभरात आंदोलने सुरु होती. नीट पेपरफुटीमुळे आणि परिक्षेतील

Nagpur Rain Alert Update : नागपुरात मुसळधार पावसाची जोरदार हजेरी : सखल भागात साचले पाणी, सोमलवार शाळेचे मैदान जलमय; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

नागपूर : उपराजधानी नागपूरमध्ये (Nagpur Heavy Rain) हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे.

Nagpur Manish Nagar Accident : नागपूरच्या मनीष नगरमध्ये हृदयद्रावक दुर्घटना : ३ वर्षांच्या चिमुकल्याचा कारखाली चिरडून मृत्यू; थरार CCTV मध्ये कैद

नागपूर : नागपूर शहरातील मनीष नगर परिसरातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आपल्या वडिलांच्या