Rahuri : नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad highway) कोल्हार खुर्द शिवारात राज्य परिवहन महामंडळाची बस व कारचा समोरासमोर भीषण अपघात होवून कारमधील तीनजण गंभीर जखमी झाल्याची दुर्देवी घटना घडली. जखमींना लोणीच्या प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांच्यावर अधिक उपचार सुरु आहेत.(Accident News)
Ahilyanagar : अकोले तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून हरिश्चंद्रगड-भंडारदरा (Harishchandragad and Bhandardara) परिसरात धोक्याची घंटा वाजली आहे. घाटमाथ्यावर ...
नेमकं काय घडलं ?
आज मंगळवारी (७ जुलै) दुपारी साधारण पावणे चार वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. राज्य परिवहन महामंडळाची बस (एम एच १४ एल एक्स ९८१८) ही सिंदखेडा-पुणे ही सिंदखेडा डेपोची बस नगरकडे जात होती तर ममदापूर (ता. राहाता) येथील तिघेजण पाटिलवाडी (कोल्हार खुर्द) येथील अंत्यविधी उरकून टाटा व्हिस्टा कारने (एम एच १७ एजे २८१५) कोल्हार कडे चालले होते. (Accident News)
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील महत्त्वाचे बदल; नूतनीकरणाच्या दुहेरी शुल्कातून व्यापार-उद्योगांना कायमची मुक्ती मुंबई(Mumbai) : राज्यातील वाणिज्यिक ...
दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक
नगर-मनमाड रस्त्याचे काम सुरु असल्याने आणि एका बाजूचा रस्ता खराब असल्याने, बसचालकाने रस्त्यावरील कोल्हार खुर्द शिवारातील ढाब्याजवळून बस विरुद्ध बाजूने घातली होती. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या कारचा अंदाज न आल्याने या दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारची समोरची बाजू बसच्या खाली शिरली. या अपघातात कारचा अक्षरश चक्काचूर झाला. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडल्याचं मन हेलावणार चित्र याठिकाणी पाहायला मिळाल.(Accident News)
मुंबई : मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान नियमितपणे चालणाऱ्या २ साप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत. दिनांक ६ जुलै ...
दोघांची प्रकृती गंभीर
कारमधील राजू शेख, कदीर शेख व नजीर गुलाब सय्यद यांना अक्षरश: कारचे दरवाजे तोडत स्थानिक रुग्णवाहिकेचा मालक निखिल भोसले, अभिषेक जाधव, रोहन साळवे या तरुणांनी अन्य प्रवाशांच्या मदतीने बाहेर काढत लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या तीघांपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. (Accident News)
अपघातानंतर बसचालक बस सोडून पळून गेला असल्याची प्राथमिक समोर येत आहे. बसमधील प्रवासी या अपघाताने भयभीत झाल्याचे वातावरण होते. दोन्ही वाहनांना जेसीबी च्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. राहुरीचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख फौजफाट्यासह अपघातस्थळी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांकडून वाहतूक पुर्ववत करण्यात आली. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.