Indus Waters Treaty : दहशतवादाला मदत आणि प्रोत्साहन देणार्‍या पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित

नवी दिल्ली : भारताने (India) पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर आणि सीमापार दहशतवादाला मिळणाऱ्या पाठिंब्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध केला असून, यामध्ये अनेक निष्पाप नागरिक आणि बालकांचा बळी गेल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. (Indus Waters Treaty)


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जैस्वाल यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंधू पाणी कराराबाबत भारताची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. ते म्हणाले, "सिंधू पाणी कराराबाबत आमचे धोरण सुसंगत आहे. पाकिस्तानकडून (Pakistan) सुरू असलेला सीमापार दहशतवाद आणि या दहशतवादाला मिळणारे प्रायोजकत्व पाहता, हा करार अद्याप 'स्थगित' स्थितीत आहे. पाकिस्तानने स्वतःच्या भूमीवरून चालणारा हा दहशतवाद कायमस्वरूपी थांबवला पाहिजे, तरच परिस्थिती सुधारू शकेल."



दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताला जपानचाही भक्कम पाठिंबा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि जपानचे पंतप्रधान साना ताकायची यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात, दोन्ही देशांनी पाकिस्तानपुरस्कृत सीमापार दहशतवादाचा निषेध केला आहे. तसेच, लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, अल-कायदा आणि आयएसआयएस यांसारख्या जागतिक दहशतवादी संघटनांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे आवाहन दोन्ही देशांनी जागतिक समुदायाला केले आहे.



पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिया, पक्तिका आणि कुनार या प्रांतांमध्ये केलेल्या लष्करी हवाई हल्ल्यांबाबत भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तालिबान सरकारच्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये ३६ नागरिकांचा मृत्यू झाला असून १६३ जण जखमी झाले आहेत, तर अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेवर बोलताना प्रवक्ते जैस्वाल म्हणाले, "अफगाणिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे आम्ही समर्थन करतो. अशा हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांचा बळी जाणे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत."


एकीकडे पाकिस्तान अफगाणिस्तानवर हल्ले करत असताना, दुसरीकडे भारताने अफगाणिस्तानला मानवी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताकडून अफगाण नागरिकांना औषधे, अन्नधान्य आणि विविध विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मदत दिली जात असून, त्याचा थेट फायदा तिथल्या स्थानिक जनतेला होत असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

'ATAGS' artillery gun is ready : १५ सेकंदात ३ हल्ले आणि ४८ किमीचा अचूक पल्ला; चीन-अमेरिकाही चकित

नवी दिल्ली: रणांगणावर भारताच्या सं

Delhi-Pune SpiceJet Flight : दिल्ली - पुणे विमानात तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याची घटना

Actor Prakash Raj : अभिनेते प्रकाश राज यांचा SIR वरचा दावा खोटा? निवडणूक आयोगाने दाखवला BLOचा व्हिडिओ; म्हणाले "जुन्या पत्त्यावर..."

नवी दिल्ली : अभिनेता प्रकाश राज (Actor Prakash Raj) आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता कर्नाटकमधील Special Intensive Revision (SIR)

Jharkhand : पोलिसांच्या दडपशाहीविरोधात झारखंड बंद

रांची : झारखंडमध्ये स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या

Arunachal Pradesh : "अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग", चीनच्या आक्षेपाला भारताचे चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली : भारताने गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत नकाशावर अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक

Vande Mataram Law : ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीने ऐतिहासिक विधेयकाचे कायद्यात रूपांतर

नवी दिल्ली: राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा अवमान करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी