नवी दिल्ली : भारताने (India) पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर आणि सीमापार दहशतवादाला मिळणाऱ्या पाठिंब्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध केला असून, यामध्ये अनेक निष्पाप नागरिक आणि बालकांचा बळी गेल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. (Indus Waters Treaty)
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जैस्वाल यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंधू पाणी कराराबाबत भारताची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. ते म्हणाले, "सिंधू पाणी कराराबाबत आमचे धोरण सुसंगत आहे. पाकिस्तानकडून (Pakistan) सुरू असलेला सीमापार दहशतवाद आणि या दहशतवादाला मिळणारे प्रायोजकत्व पाहता, हा करार अद्याप 'स्थगित' स्थितीत आहे. पाकिस्तानने स्वतःच्या भूमीवरून चालणारा हा दहशतवाद कायमस्वरूपी थांबवला पाहिजे, तरच परिस्थिती सुधारू शकेल."
वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाय काढण्यात येणा मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणामुळे ...
दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताला जपानचाही भक्कम पाठिंबा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि जपानचे पंतप्रधान साना ताकायची यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात, दोन्ही देशांनी पाकिस्तानपुरस्कृत सीमापार दहशतवादाचा निषेध केला आहे. तसेच, लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, अल-कायदा आणि आयएसआयएस यांसारख्या जागतिक दहशतवादी संघटनांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे आवाहन दोन्ही देशांनी जागतिक समुदायाला केले आहे.
केतन अग्रवाल हत्याकांडात सिया गोयलची होणार लाय डिटेक्टर टेस्ट? पोलिसांनी तयार केली १८ प्रश्नांची यादी पुणे : केतन अग्रवाल (Ketan Agrawal Murder) ...
पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिया, पक्तिका आणि कुनार या प्रांतांमध्ये केलेल्या लष्करी हवाई हल्ल्यांबाबत भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तालिबान सरकारच्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये ३६ नागरिकांचा मृत्यू झाला असून १६३ जण जखमी झाले आहेत, तर अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेवर बोलताना प्रवक्ते जैस्वाल म्हणाले, "अफगाणिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे आम्ही समर्थन करतो. अशा हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांचा बळी जाणे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत."
एकीकडे पाकिस्तान अफगाणिस्तानवर हल्ले करत असताना, दुसरीकडे भारताने अफगाणिस्तानला मानवी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताकडून अफगाण नागरिकांना औषधे, अन्नधान्य आणि विविध विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मदत दिली जात असून, त्याचा थेट फायदा तिथल्या स्थानिक जनतेला होत असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.