Indus Waters Treaty : दहशतवादाला मदत आणि प्रोत्साहन देणार्‍या पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित

नवी दिल्ली : भारताने (India) पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर आणि सीमापार दहशतवादाला मिळणाऱ्या पाठिंब्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारताने तीव्र निषेध केला असून, यामध्ये अनेक निष्पाप नागरिक आणि बालकांचा बळी गेल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. (Indus Waters Treaty)


परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जैस्वाल यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंधू पाणी कराराबाबत भारताची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. ते म्हणाले, "सिंधू पाणी कराराबाबत आमचे धोरण सुसंगत आहे. पाकिस्तानकडून (Pakistan) सुरू असलेला सीमापार दहशतवाद आणि या दहशतवादाला मिळणारे प्रायोजकत्व पाहता, हा करार अद्याप 'स्थगित' स्थितीत आहे. पाकिस्तानने स्वतःच्या भूमीवरून चालणारा हा दहशतवाद कायमस्वरूपी थांबवला पाहिजे, तरच परिस्थिती सुधारू शकेल."



दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताला जपानचाही भक्कम पाठिंबा मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि जपानचे पंतप्रधान साना ताकायची यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात, दोन्ही देशांनी पाकिस्तानपुरस्कृत सीमापार दहशतवादाचा निषेध केला आहे. तसेच, लश्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, अल-कायदा आणि आयएसआयएस यांसारख्या जागतिक दहशतवादी संघटनांविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे आवाहन दोन्ही देशांनी जागतिक समुदायाला केले आहे.



पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिया, पक्तिका आणि कुनार या प्रांतांमध्ये केलेल्या लष्करी हवाई हल्ल्यांबाबत भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तालिबान सरकारच्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये ३६ नागरिकांचा मृत्यू झाला असून १६३ जण जखमी झाले आहेत, तर अनेक घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेवर बोलताना प्रवक्ते जैस्वाल म्हणाले, "अफगाणिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे आम्ही समर्थन करतो. अशा हल्ल्यांमध्ये महिला आणि मुलांचा बळी जाणे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत."


एकीकडे पाकिस्तान अफगाणिस्तानवर हल्ले करत असताना, दुसरीकडे भारताने अफगाणिस्तानला मानवी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताकडून अफगाण नागरिकांना औषधे, अन्नधान्य आणि विविध विकास प्रकल्पांच्या माध्यमातून मदत दिली जात असून, त्याचा थेट फायदा तिथल्या स्थानिक जनतेला होत असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून

Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या

Indian Armed Forces: संरक्षण दलांची युद्धसज्जता वाढवण्यासाठी 52,000 कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 03 जुलै 2026 रोजी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने

Child Safety : इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह जाहिरातींवर सरकारची कारवाई; मेटाकडून मागवले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतातील इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाला (Child sexual abuse) प्रोत्साहन देणाऱ्या कथित आक्षेपार्ह

अयोध्या प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा व्हावी - दत्तात्रेय होसबळे

नवी दिल्ली : अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील दानपेट्यांमधून झालेल्या चोरी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई