Uday Samant : 'ऑपरेशन वरळी' हा 'ऑपरेशन टायगर'चाच भाग

मंत्री उदय सामंत; सुनील शिंदे शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागतच करू


मुंबई : "सचिन अहिर यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा शिवसेना पक्षातील प्रवेश हा काहींना चेहऱ्यावर दाखवता येत नसला तरी आतून मोठा धक्का देणारा ठरला आहे. शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी सुरू असलेल्या 'ऑपरेशन टायगर'चाच एक भाग म्हणजे 'ऑपरेशन वरळी' आहे," असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी केला. त्याचप्रमाणे आमदार सुनील शिंदे यांनी सध्या त्यांची भूमिका स्पष्ट केली असली, तरी भविष्यात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली, तर त्यांचे पक्षात स्वागतच केले जाईल," असेही त्यांनी सांगितले. (MLA Sachin Ahir)



उबाठा गटाचे आमदार सुनील शिंदे (MLA Sunil Shinde) यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना उदय सामंत म्हणाले, सुनील शिंदे हे अत्यंत सक्षम नेतृत्व आहे. ते मूळचे धनुष्यबाण या चिन्हावरच निवडून आलेले आहेत. जर त्यांना त्यांच्या मतदारसंघाचा रखडलेला विकास वेगाने करण्यासाठी आमच्यासोबत यायचे असेल, तर आम्ही त्यांना का नाकारू? पक्षप्रवेशाची ही प्रक्रिया आता रोजचीच झाली असून, कालही अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांच्या बाजूला जाण्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मोठा तडा गेल्याचे सांगत सामंत म्हणाले, माजी मंत्री आणि तीन वेळा आमदार राहिलेला नेता जर अचानक दुसरीकडे जात असेल, तर त्यामागे नक्कीच काहीतरी गंभीर कारण असणार, हे आता महाराष्ट्रातील जनतेलाही कळून चुकले आहे.



अधिवेशनात विकासाचे प्रश्न बाजूला ठेवून फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याच्या विरोधकांच्या टीकेला सामंत यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, "सभागृहात आम्ही जनतेच्या आणि विकासाच्या प्रश्नांवरही तितक्याच गांभीर्याने काम करत आहोत. मुंबईतील नालेसफाई, शेतकऱ्यांचे आणि कामगारांचे प्रश्न, मराठी भाषेचा मुद्दा तसेच उद्योग विभागाच्या महत्त्वाच्या विषयांवर दररोज चर्चा होत आहे. प्रश्नोत्तराचा तास आणि लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत."




श्रीकांत शिंदेंच्या पदवीवरील आरोपांना प्रत्युत्तर


खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वैद्यकीय पदवीबाबत विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांचा उदय सामंत यांनी समाचार घेतला. "हा विषय तीन वर्षांपूर्वीही काही लोकांनी राजकीय हेतूने उपस्थित केला होता, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. श्रीकांत शिंदे हे स्वतः एक मान्यताप्राप्त ऑर्थोपेडिक सर्जन (अस्थिरोग तज्ज्ञ) आहेत. त्यामुळे त्यांच्या पदवीवर आक्षेप घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांनी पहिली निवडणूक एकनाथ शिंदे यांचे पुत्र म्हणून लढवली असेल, पण आज त्यांनी स्वतःचे स्वतंत्र आणि कर्तबगार नेतृत्व निर्माण केले आहे," असे सामंत यांनी स्पष्ट केले. (MLA Sachin Ahir)




केंद्रात शिवसेनेला किती मंत्रीपदे?


केंद्रातील आगामी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला किती जागा मिळणार का, यावरही सामंत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "याबाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात होणाऱ्या चर्चेनंतरच होईल. केंद्रात शिवसेनेच्या दोन खासदारांना नवीन मंत्रिपदे मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अचूक संख्या आम्हाला ठाऊक नसली, तरी शिवसेनेला केंद्रात अधिक प्रतिनिधित्व मिळाले तर आम्हाला निश्चितच आनंद होईल," असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

Jharkhand : झारखंडमध्ये झामुमो - काँग्रेस सरकारचा विद्यार्थ्यांवर लाठीमार

रांची : विद्यार्थ्यांशी चर्चा करा, त्यांच्यावर कठोर कारवाई करणे टाळा असे आवाहन एक्स पोस्ट करून संसदेतील विरोधी

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Crime News : राज्यातले आणखी एक बेकायदा औषधनिर्मिती युनिट उद्ध्वस्त, DRI ची कारवाई

मुंबई : मादक द्रव्ये आणि मनोविकारकारक पदार्थांच्या अवैध उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय तस्करीविरोधात आपली