Sachin Ahir : कामगार ते उपसभापती'... संघर्षमय प्रवासाचा उल्लेख करत सचिन अहिरांनी दिली निष्पक्ष कामकाजाची ग्वाही

उपसभापती पदाची गरिमा राखत प्रत्येक सदस्याला समान न्याय देणार - सचिन अहिर


मुंबई : राजकीय व्यासपीठावर राजकारण जरूर होईल, मात्र उपसभापतीच्या या सर्वोच्च खुर्चीवर बसल्यानंतर पक्षभेद विसरून प्रत्येक सदस्याला समान न्याय देणे हीच माझी प्राथमिक जबाबदारी असेल," अशी ग्वाही नवनियुक्त उपसभापती सचिन अहिर यांनी आज दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर सभागृहातील सर्वपक्षीय सदस्यांचे आभार मानताना त्यांनी या पदाची गरिमा आणि लोकशाहीची उच्च परंपरा राखण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. बदलत्या राजकीय समीकरणांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, पद कोणतेही मिळाले तरी सचिन अहिर हा कार्यकर्ता सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली आपली बांधिलकी कधीही तुटू देणार नाही.


आपल्या कृतज्ञता भाषणाची सुरुवात करताना सचिन अहिर यांनी कवी नारायण सुर्वे यांच्या "एकटाच आलो नाही, युगाची साथ आहे.. हो, मी कामगार आहे आणि मी तळपती तलवार आहे" या अजरामर ओळी सादर करत सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी त्यांनी सातरस्ता आणि धोबीघाट परिसरातील आपले बालपण, गिरणी कामगार चळवळीतील सहभाग आणि खटाव मिलमध्ये एका वेल्डरचा हेल्पर म्हणून केलेली नोकरी, असा आपला अत्यंत संघर्षमय आणि भावनिक प्रवास सभागृहासमोर मांडला. परदेशात नशीब आजमावण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर पुन्हा कामगारांच्या लढ्यात स्वतःला झोकून दिले. कामगारांच्या हक्कासाठी दिल्लीतील 'बीआयएफआर'समोर (BIFR) यशस्वी लढा दिल्यानंतर हजारो कामगारांनी केलेले स्वागत हाच आपल्या आयुष्याचा 'टर्निंग पॉइंट' ठरल्याची आठवण त्यांनी अत्यंत भावुक होत सांगितली.


आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाबाबत बोलताना सचिन अहिर यांनी महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील दिग्गज नेत्यांचे आभार मानले. यात आदरणीय शरद पवार, दिवंगत विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील, तसेच नारायण राणे, जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस या सर्वपक्षीय नेत्यांसोबत काम करण्याची मिळालेली संधी हा समृद्ध करणारा अनुभव होता, असे ते म्हणाले. राजकीय विचारभिन्नता असली तरी सर्वच पक्षांतील नेत्यांशी जिव्हाळ्याचे आणि मित्रत्वाचे संबंध राखणे, हेच आपल्या राजकारणाचे खरे बळ असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच गृहनिर्माण, सामाजिक न्याय, उद्योग आणि कामगार मंत्रालयाची जबाबदारी सांभाळताना घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.


शेवटी, उपसभापती म्हणून आपल्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट करताना सचिन अहिर यांनी लोकशाही मूल्यांची जपणूक करण्याचे आश्वासन दिले. संसदीय कामकाजाचे पवित्र्य राखताना सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या सदस्यांना आपले प्रश्न मांडण्याची समान संधी दिली जाईल. सभागृहाची प्रतिष्ठा सर्वोच्च ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधीमंडळाच्या माध्यमातून सुटण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू, असा शब्द त्यांनी संपूर्ण सभागृहाला दिला.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून