अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून, तब्बल १४ गावांतील ३,१०० हून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत. अचानक आलेल्या पुराचा फटका शेती आणि पशुधनालाही मोठ्या प्रमाणावर बसला असून, अनेक वाहने वाहून गेली आहेत.



पूर आणि भूस्खलनामुळे तबिरिपो साकू, लोगलू, रोहे आणि कोयू यांसारख्या गावांचा बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. सुमारे ५०० कुटुंबे अडकून पडली असून, गावाला जोडणारा झुलता पूल वाहून गेल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा यंत्रणा, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ग्रामस्थांना आपली घरे सोडून शेतातील तात्पुरत्या झोपड्यांमध्ये आश्रय घेण्याची वेळ आली आहे.



जिल्हा प्रशासन, भारतीय सैन्य, भारत-तिबेट सीमा पोलीस, बीआरओ आणि स्थानिक पोलीस प्रशासनाकडून संयुक्तपणे बचावकार्य राबवले जात आहे. अडकलेल्या गावांपर्यंत अन्नधान्य आणि पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. रस्ते वाहतूक पूर्ववत करणे आणि तात्पुरते पूल उभारणे याला सध्या सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला असून, केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, बाधित कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना त्वरित नुकसानभरपाई आणि पुनर्वसन सुविधा देण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. ईशान्य भारताच्या इतर राज्यांतही आसाम, मेघालय, सिक्कीम आणि नागालँडमध्ये मान्सूनच्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून, प्रशासन सतर्क आहे.

Comments
Add Comment

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का