अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यू झाला असून, तब्बल १४ गावांतील ३,१०० हून अधिक नागरिक प्रभावित झाले आहेत. अचानक आलेल्या पुराचा फटका शेती आणि पशुधनालाही मोठ्या प्रमाणावर बसला असून, अनेक वाहने वाहून गेली आहेत.



पूर आणि भूस्खलनामुळे तबिरिपो साकू, लोगलू, रोहे आणि कोयू यांसारख्या गावांचा बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. सुमारे ५०० कुटुंबे अडकून पडली असून, गावाला जोडणारा झुलता पूल वाहून गेल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा यंत्रणा, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ग्रामस्थांना आपली घरे सोडून शेतातील तात्पुरत्या झोपड्यांमध्ये आश्रय घेण्याची वेळ आली आहे.



जिल्हा प्रशासन, भारतीय सैन्य, भारत-तिबेट सीमा पोलीस, बीआरओ आणि स्थानिक पोलीस प्रशासनाकडून संयुक्तपणे बचावकार्य राबवले जात आहे. अडकलेल्या गावांपर्यंत अन्नधान्य आणि पिण्याचे पाणी पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. रस्ते वाहतूक पूर्ववत करणे आणि तात्पुरते पूल उभारणे याला सध्या सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला असून, केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, बाधित कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांना त्वरित नुकसानभरपाई आणि पुनर्वसन सुविधा देण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे. ईशान्य भारताच्या इतर राज्यांतही आसाम, मेघालय, सिक्कीम आणि नागालँडमध्ये मान्सूनच्या पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून, प्रशासन सतर्क आहे.

Comments
Add Comment

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा संताप, रशियन राजदूतांना समन्स

नवी दिल्ली : युक्रेनच्या किनारपट्टीजवळील व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा

Kangana Ranaut On CJP : 'आम्ही संसदेत कैदेत असल्यासारखे अडकलो होतो'; दिल्लीतील हिंसक आंदोलनावर खासदार कंगना रनौत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीच्या मध्यभागी हजारो आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला. हा मोर्चा

IIT Roorkee : 'राजकीय आंदोलनांना सोशल मीडियावर पाठिंबा देऊ नका'; IIT च्यामोठ्या निर्णयाची देशभरात चर्चा

रुडकी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुडकीने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या एका अंतर्गत