एशियाटिक लायब्ररीच्या जतनासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ५६३.३३ लाखांचा निधी मंजूर
मुंबई : राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या एशियाटिक लायब्ररी इमारतीच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने व्यापक दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला आणि कामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे जोरदार कौतुक करत, शिवसेना ...
या प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ५६३.३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून एकूण १२ संवर्धन आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे जुलै २०२६ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
Under-19 Rowing Championship : पिंपरी-चिंचवडमध्ये होणार रोईंग वर्ल्ड कप; स्पर्धेसाठी १० कोटींच्या आर्थिक मदतीची मागणी
रोईंग वर्ल्ड कप अंडर-19, अंडर-23 स्पर्धा पिंपरीत; सुनेत्रा पवार यांच्याकडे आर्थिक सहाय्याची मागणी मुंबई : रोईंग वर्ल्ड कप–III स्पर्धेत भारताला सुवर्णपदक ...
यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, एशियाटिक लायब्ररी ही केवळ ग्रंथालयाची इमारत नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक इतिहासाचा महत्त्वाचा वारसा आहे. या ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूप कायम ठेवत आवश्यक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
या प्रकल्पांतर्गत ग्रंथालय संचालनालय, राज्य मध्यवर्ती ग्रंथालय आणि एशियाटिक सोसायटीच्या कार्यालयांमध्ये रंगकाम, गिलावा दुरुस्ती, छताची दुरुस्ती, लाकडी दरवाजे, खिडक्या आणि कपाटांचे संवर्धन, तसेच विविध नागरी दुरुस्तीची कामे केली जात आहेत. याशिवाय शौचालयांचे नूतनीकरण, कर्मचारी कक्षांची दुरुस्ती, जिने, वाचन कक्ष आणि संशोधन संस्थेच्या कक्षांमध्येही आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत.
तळघरातील ग्रंथसंग्रह सुरक्षित ठेवण्यासाठी ओलावा नियंत्रण आणि संरचनात्मक मजबुतीकरणाची कामेही करण्यात येत आहेत. वारसा वास्तू संवर्धनाचे सर्व निकष पाळून कामे करण्यात यावीत आणि नागरिकांना कमीत कमी गैरसोय होईल, याची काळजी घेण्याच्या सूचनाही मंत्र्यांनी दिल्या.






