1 July New Rules : १ जुलैपासून बदलणार अनेक आर्थिक नियम; जाणून घ्या तुमच्या खिश्यावर परिणाम होणार की नाही?

१ जुलै २०२६ पासून देशभरात काही महत्त्वाचे आर्थिक आणि बँकिंग नियम बदलणार आहेत. या बदलांचा परिणाम आधार कार्डधारक, बँक ग्राहक, क्रेडिट कार्ड वापरणारे, पासपोर्टसाठी अर्ज करणारे आणि आयकर भरणाऱ्या नागरिकांवर होणार आहे. त्यामुळे हे नवीन नियम जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.



सर्वात मोठा दिलासा आधार कार्डधारकांना मिळणार आहे. UIDAI ने १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत आधारमध्ये नोंदणीकृत ईमेल आयडी अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. यापूर्वी यासाठी ७५ रुपये शुल्क भरावे लागत होते.


एसबीआय (SBI) कार्डने फोनपे एसबीआय क्रेडिट कार्ड पर्पल (PhonePe SBI Credit Card PURPLE) आणि सिलेक्ट ब्लॅक (SELECT BLACK) कार्डधारकांसाठी रिवॉर्ड पॉइंट्सचे नियम बदलले आहेत.
१ जुलैपासून काही व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत, तसेच पॉइंट्स मिळवण्याची मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे.


HDFC बँकेच्या काही क्रेडिट कार्डधारकांसाठीही नवीन नियम लागू होणार आहेत. देशांतर्गत विमानतळावरील लाउंज सुविधा मोफत वापरण्यासाठी मागील तिमाहीत किमान ६०,००० रुपयांचा खर्च करणे आवश्यक असेल. ही सुविधा प्रत्येक कॅलेंडर तिमाहीत जास्तीत जास्त तीन वेळा मिळेल.


याशिवाय, सामान्य आणि तत्काळ पासपोर्टसाठी लागणाऱ्या शुल्कातही वाढ होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने नवीन शुल्क संरचना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.


RBI देखील 1 जुलैपासून बँकांकडून आर्थिक उत्पादने चुकीच्या पद्धतीने विक्री करण्यावर कठोर नियम लागू करणार आहे. ग्राहकांची फसवणूक झाल्यास संबंधित रक्कम परत मिळण्याबरोबरच नुकसानभरपाईचीही तरतूद करण्यात आली आहे.



दरम्यान, आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ITR-१ आणि ITR-२ दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ आहे. निर्धारित मुदतीत आयकर विवरणपत्र न भरल्यास दंडासह इतर करसंबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो.


Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Suman Kale Murder Case : पारधी समाजाच्या सुमन काळे हत्या प्रकरणात राज्य शासनाची नव्याने एसआयटी; विशेष तपास पथक गठित

अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पारधी समाजातील सुमन काळे यांच्या सन २००७ मधील संशयास्पद पोलिस कोठडीतील मृत्यू

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

Ashish Shelar : दहिहंडी उत्सवाला युनेस्कोमध्ये घेऊन जाणार, सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्र शासनातर्फे दहिहंडी उत्सवाला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत नेण्यासाठी प्रयत्न करीत

Chandigaon Tiranga Case : चंडीगाव ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणा, राष्ट्रध्वजाचा अवमान

डहाणू : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाच्या सन्मानाबाबत डहाणू तालुक्यातील चंडीगाव ग्रामपंचायतीच्या कारभारातील