सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका बेवारस मृतदेहाची दफनविधीसाठी चक्क कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाडीतून वाहतूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले आहे.



नेमकं प्रकरण काय ?


माहितीनुसार, शहरात आढळलेल्या एका बेवारस व्यक्तीच्या मृतदेहाचे अमळनेर ग्रामीण रुग्णालयात (Amalner Rural Hospital) शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेहाचा सन्मानपूर्वक दफनविधी करण्यासाठी स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देण्याऐवजी तो थेट शहरातील कचरा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या घंटागाडीत ठेवून दफनभूमीकडे नेण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, मृत्यूनंतरही व्यक्तीच्या सन्मानाची जपणूक करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका होत आहे.



मानवी मूल्यांचीही पायमल्ली


नगर परिषदेच्या नियमांनुसार बेवारस मृतदेहांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करणे संबंधित कचरा संकलन ठेकेदारावर बंधनकारक आहे. मात्र या प्रकरणात सर्व नियमांना केराची टोपली दाखवत मृतदेहाची वाहतूक कचऱ्याच्या वाहनातून करण्यात आली. त्यामुळे केवळ नियमांचे उल्लंघनच नव्हे, तर मानवी मूल्यांचीही पायमल्ली झाल्याचा आरोप होत आहे.



सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला


घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. "मृत्यूनंतर प्रत्येकाला सन्मानाने अंतिम निरोप मिळायला हवा," अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला. विविध सामाजिक संघटनांनीही या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला आहे. दरम्यान, नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर (Dr. Parikshit Baviskar) यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. दोषींना कोणतीही माफी दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.



सखोल चौकशीचे आदेश


नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनीही संबंधित ठेकेदाराकडून अक्षम्य चूक झाल्याचे मान्य केले आहे. नियमांनुसार स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देणे बंधनकारक असतानाही त्याचे पालन झाले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या घटनेनंतर नगर परिषदेच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ठेकेदार नियमांचे पालन करत आहेत की नाही, याची प्रभावी तपासणी करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका होत आहे. त्यामुळे केवळ ठेकेदारच नव्हे, तर संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.


शहर विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या प्रशासनाच्या कारभारावर या घटनेमुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत्यूनंतरही माणसाच्या सन्मानाची अशी विटंबना होणार असेल, तर ही केवळ निष्काळजीपणाची नव्हे तर संपूर्ण यंत्रणेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "