Sunetra Pawar : आदिवासी हा विकासाचा लाभार्थी नव्हे, तर विकासाला दिशा देणारा समाज!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; ग्लोबल वॉर्मिगबाबतचा जीवनमंत्र आदिवासींनी शेकडो वर्षांपूर्वी दिला


मुंबई : "आदिवासी समाजाने देशातील जंगलांचे, जलस्रोतांचे आणि जैवविविधतेचे रक्षण करून माणसाला निसर्गाशी सुसंवादाने जगण्याची शिकवण दिली आहे. आज संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या वातावरण बदल आणि ग्लोबल वॉर्मिग (जागतिक तापमानवाढ) या संकटावर मात करण्याचा जीवनमंत्र या समाजाने शेकडो वर्षांपूर्वीच आपल्या जीवनपद्धतीतून दिला आहे. म्हणूनच आदिवासी समाज हा विकासाचा लाभार्थी नसून, तो संपूर्ण विकासाला नवी दिशा देणारा मार्गदर्शक समाज आहे", असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी केले.



जागतिक आदिवासी दिनानिमित्त अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वतीने आयोजित 'वनरंग आदिवासी संस्कृतीचा गौरव' या तीन दिवसीय उत्सवाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई महिला अध्यक्षा आरती साळवी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, डिजिटल युगातही आपल्या पारंपरिक बोलीभाषा, लोककला, लोकसंगीत आणि हस्तकलेचा वारसा जिवंत ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती आणि महाराष्ट्राचे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या योगदानाचा उल्लेख करत, आदिवासी समाजाचा इतिहास हा भारताच्या स्वाभिमानाचा इतिहास असल्याचे त्यांनी सांगितले.



महायुती सरकारने आदिवासी विकास आणि कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. अजितदादांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने काम केले असून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सरकार आणि पक्षाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधा प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळांचे आधुनिकीकरण, ई-लर्निंग सुविधा, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षणासाठी विशेष योजना आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. नाशिकच्या दिलीप गावित याने ग्लास्को येथील क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांनी आदिवासी तरुणांच्या क्षमतेचे कौतुक केले.

Comments
Add Comment

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि

Amravati : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यूची NHRCकडून स्वतःहून दखल; महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना नोटीस

अमरावती येथील जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या देखभाल विभागात (SNCU) लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा