प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश
मुंबई : पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याकांडाचा खटला आता फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाणार आहे. या संवेदनशील प्रकरणात गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील (Special Public Prosecutor) म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले आहेत. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनीही या खटल्याचे काम पाहण्यासाठी आपली संमती दर्शवली आहे.
सध्या फॅशन विश्वात 'रेनकोर' (Raincore) या नवीन ट्रेंडची जोरदार चर्चा सुरू आहे. हा ट्रेंड केवळ पावसाळी हवामानापासून प्रेरित नसून, त्याने पावसाकडे पाहण्याचा ...
केतन अग्रवाल(Keatn agrawal) यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी शुक्रवारी पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्या मुलासाठी न्याय मागितला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी पीडित कुटुंबाला धीर देत, "दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, त्यांना फाशीचीच शिक्षा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे," अशी ग्वाही दिली. अग्रवाल कुटुंबाने हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात(Fast track court) चालवण्याची आणि उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची केलेली मागणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मान्य करत विधि व न्याय विभागाच्या सचिवांना यासंबंधीचे आदेश जारी करण्याचे निर्देश दिले.
Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर येथील पेड दर्शन घोटाळ्यातील (Trimbakeshwar Paid Darshan Scam) मुख्य संशयित पुरुषोत्तम कडलग (Purushottam Kadlag) याला अखेर अडीच महिन्यांनी उच्च न्यायालयाने जामीन ...
२६ वर्षीय तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याचा १८ जून २०२६ रोजी लोहगड किल्ल्याच्या खोल दरीत कोसळून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू असल्याचा बनाव रचण्यात आला होता, परंतु पुणे पोलिसांनी केलेल्या सखोल तांत्रिक तपासानंतर यामागील हत्येचा कट उघडकीस आला. केतन अग्रवाल यांचा साखरपुडा सिया गोयल हिच्याशी झाला होता आणि नोव्हेंबर २०२६ मध्ये त्यांचा विवाह होणार होता. मात्र, सियाचे चेतन चौधरी नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. कुटुंबाच्या भीतीपोटी पळून जाण्याऐवजी या दोघांनी केतनलाच कायमचे वाटेतून हटवण्याचा क्रूर कट रचला. १८ जून रोजी सिया केतनला घेऊन लोहगड किल्ल्यावर गेली. तिथे चेतन आधीपासूनच दबा धरून बसला होता. सियाने इशारा करताच चेतनने केतनला मागून खोल दरीत ढकलून दिले.
पोलीस तपासात समोर आलेल्या बाबी
केतनला मारण्याचा हा त्यांचा पहिला प्रयत्न नव्हता. यापूर्वीही त्यांनी अनेकदा कट रचला होता. एका ट्रेक दरम्यान सियाने केतनला दरीच्या दिशेने ढकलले होते, मात्र केतन झाडाझुडपांचा आसरा मिळाल्याने सुदैवाने वाचला. त्या वेळी सियाने 'तुला सापापासून वाचवण्यासाठी ढकलले' अशी खोटी कहाणी रचून केतनचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा केलेला प्रयत्नही अयशस्वी ठरला होता, मात्र १८ जून रोजी त्यांचे प्रयत्न सफल झाले.