Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस - उद्धव ठाकरेंचा एकत्र विमान प्रवास

ऑपरेशन टायगर’नंतरची पहिलीच भेट



मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही, असे म्हणतात. उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्याची घटना ताजी असतानाच, शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav thakre) यांनी एका विमानातून प्रवास केला. मुंबई ते नागपूर प्रवासात या दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याचे कळते.



६ खासदार फुटल्यानंतर पक्ष सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी संबंधित लोकसभा मतदारसंघांचे दौरे करण्याचे निश्चित केले आहे. २७ जून रोजी त्यांचा यवतमाळ-वाशिम दौरा असून, याच दौऱ्यासाठी ते मुंबईहून नागपूरला जात होते. योगायोगाने, याच विमानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील नागपूरला रवाना होत होते. उद्धव ठाकरे समोर येताच, कटुता बाजूला ठेवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत खिलाडूवृत्तीने त्यांची विचारपूस केली. "आपण भेटलो हीच मोठी बातमी आहे," असा टोला फडणवीसांनी लगावताच तिथे उपस्थित नेत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.



२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत युती म्हणून लढूनही उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी स्थापन करत वेगळा रस्ता धरला. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वितृष्ठ जगजाहीर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘ऑपरेशन टायगर २.०(Opretion tigar 2.0)’ राबवून उबाठा गटाचे नऊपैकी सहा खासदार आपल्या गळाला लावले. या मोठ्या राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अशा रीतीने आमनेसामने आले. या प्रवासात उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई देखील उपस्थित होते.

Comments
Add Comment

Jayant Patil : जयंत पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

आमदार जितेंद्र आव्हाडही सोबत; 'नंदनवन'वर एक तास खलबते मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती