ऑपरेशन टायगर’नंतरची पहिलीच भेट
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही, असे म्हणतात. उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्याची घटना ताजी असतानाच, शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav thakre) यांनी एका विमानातून प्रवास केला. मुंबई ते नागपूर प्रवासात या दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याचे कळते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत मोठा बदल; पूर्व परीक्षा आता CBT पद्धतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) भरती प्रक्रिया अधिक वेगवान आणि ...
६ खासदार फुटल्यानंतर पक्ष सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी संबंधित लोकसभा मतदारसंघांचे दौरे करण्याचे निश्चित केले आहे. २७ जून रोजी त्यांचा यवतमाळ-वाशिम दौरा असून, याच दौऱ्यासाठी ते मुंबईहून नागपूरला जात होते. योगायोगाने, याच विमानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील नागपूरला रवाना होत होते. उद्धव ठाकरे समोर येताच, कटुता बाजूला ठेवत मुख्यमंत्री फडणवीस यांनी अत्यंत खिलाडूवृत्तीने त्यांची विचारपूस केली. "आपण भेटलो हीच मोठी बातमी आहे," असा टोला फडणवीसांनी लगावताच तिथे उपस्थित नेत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार पाऊस पडला. मात्र गेल्या दोन दिवसापासून ...
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत युती म्हणून लढूनही उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी स्थापन करत वेगळा रस्ता धरला. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय वितृष्ठ जगजाहीर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ‘ऑपरेशन टायगर २.०(Opretion tigar 2.0)’ राबवून उबाठा गटाचे नऊपैकी सहा खासदार आपल्या गळाला लावले. या मोठ्या राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच अशा रीतीने आमनेसामने आले. या प्रवासात उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, विनायक राऊत आणि अनिल देसाई देखील उपस्थित होते.