३० भारतीय जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडली
नवी दिल्ली : इराण आणि अमेरिका यांच्यातील सामंजस्य करारामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्याची 'जीवनरेखा' मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.आतापर्यंत भारताशी संबंधित ३० जहाजांनी या मार्गावरून सुरक्षित प्रवास केला आहे, तर २६ जहाजे अद्याप आखाती प्रदेशात प्रतीक्षेत आहेत. प्रवास केलेल्या ३० जहाजांमध्ये एलपीजी, एलएनजी, कच्चा तेल आणि खते/बल्क कार्गोचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या करारानंतर जहाजांच्या हालचाली दुप्पट झाल्या असून, ही फेब्रुवारीनंतरची सर्वोच्च पातळी आहे.
Journalist Controversy : पत्रकार वादावर खासदार संजय पाटील यांनी मागितली माफी
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय पाटील(Sanjay Patil) यांनी पत्रकारांसोबत झालेल्या वादानंतर जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे. वादाच्या वेळी अनवधानाने ...






