Rahul Narwekar : मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारणाबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिले स्पष्टीकरण

- प्रिंटमध्ये तांत्रिक चुका; मने दुखावली असल्यास दिलगिरी व्यक्त करतो


मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठी भाषेतून शोकप्रस्ताव मांडताना झालेल्या अशुद्ध उच्चारणांमुळे समाजमाध्यमांवर प्रचंड ट्रोलींग सुरू झाल्याने, या संपूर्ण प्रकरणावर बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिले आहे. "शोकप्रस्तावाच्या छापील प्रतींमधील (प्रिंट) तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान हा अनपेक्षित प्रकार घडला. या घटनेमुळे जर सभागृहातील किंवा राज्यातील कोणत्याही व्यक्तीचे मन दुखावले गेले असेल, तर मी त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो," असे अध्यक्ष म्हणाले.



या प्रकाराबाबत सविस्तर खुलासा करताना अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) म्हणाले, "अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी प्रथेप्रमाणे आपण शोकप्रस्ताव घेत असतो आणि ते केवळ अध्यक्षांनीच वाचून दाखवायचे, असा निर्णय झाला होता. त्या दिवशी पटलावर एकूण १२ शोकप्रस्ताव होते, ज्यांचे वाचन मी सभागृहात केले. हे १२ शोकप्रस्ताव ज्या कागदावर प्रिंट होऊन आले होते, त्याचा फॉन्ट अत्यंत बारीक आणि अस्पष्ट होता. त्या प्रिंटमध्ये काही तांत्रिक चुका होत्या, ज्या सुरुवातीला कोणाच्याच लक्षात आल्या नाहीत. परिणामी, समोर जसे आले होते तसे वाचन केल्यामुळे ही अनपेक्षित चूक घडली. गेली साडेचार वर्षे मी या सर्वोच्च सभागृहात अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. या प्रदीर्घ कार्यकाळात मी अनेक भाषणे आणि शोकप्रस्ताव मराठीतच मांडले आहेत. तसेच सभागृहाची संपूर्ण नियमावली आणि दैनंदिन कार्यपद्धती मराठी भाषेतूनच हाताळली आहे. मराठी भाषेबद्दल या सभागृहातील सदस्यांना आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाला जेवढा जाज्वल्य अभिमान आहे, तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक अभिमान मला स्वतःला मराठी भाषेबद्दल आहे." (Rahul Narwekar)



आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा किंवा भावना दुखावण्याचा विचार महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती स्वप्नातही करू शकत नाही; त्यामुळे या राज्याच्या विधानसभेचा अध्यक्ष तर मुळीच असे वक्तव्य करणार नाही. जे काही घडले ते निव्वळ तांत्रिक चुकीमुळे घडले आहे, त्याचा कृपया कोणीही वेगळा राजकीय अर्थ काढू नये ही विनंती. तरीही यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले. (Rahul Narwekar)



दोषींवर कारवाई करा - अजय चौधरी


अध्यक्षांच्या या खुलाशानंतर उबाठा गटाचे शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. "अध्यक्ष महोदय, तुमच्या भावना आणि अडचण आम्हाला पूर्णपणे समजली आहे. परंतु, राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या विधानसभा अध्यक्षांची प्रतिमा मलिन होईल, अशी सदोष आणि चुकीची प्रिंट देणारी जी काही यंत्रणा किंवा व्यक्ती असेल, तिचा शोध घेऊन तिच्यावर कठोर कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे," अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

Comments
Add Comment

Pune Accident : क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! पुण्यात बसमधून खाली पडल्याने तरुणीचा दुर्दैवी अंत; 'त्या' एका चुकीमुळे गेला जीव?

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. धावत्या पीएमपीएमएल बसमधून अचानक तोल जाऊन खाली

Nashik Rain Update : शेतकऱ्यांना दिलासा मिळणार ? नाशिकसह जळगाव, धुळे जिल्ह्यांत आज पावसाची स्थिती काय ?

Nashik Rain Update : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे आणि नाशिक जिल्ह्यांत काही ठिकाणी स्थानिक वातावरणाच्या प्रभावामुळे

Chhatrapati Sambhaji : देवा...किती किळसवाणा प्रकार! पप्पांनी कचोरी आणली अन् त्यात उंदराच्या लेंड्या; ५ पैकी २ कचोऱ्या मुलांनी खाल्ल्याने नागरिकांत संताप

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूर शहरात (Vaijapur Area) अन्नाची अवहेलना आणि ग्राहकांच्या

Nalasopara Viral Video : नालासोपाऱ्यात हॉटेलच्या भातावर उंदरांचा हैदोस; ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या हॉटेलवर कठोर कारवाईची मागणी

नालासोपारा : वसई-विरार महापालिका (Vasai-Virar Mahanagpalika) क्षेत्रातील नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा परिसरातून एक अत्यंत

Nashik Crime : नाशिकमध्ये चाललंय काय ? रविवार कारंजावर टवाळखोरांचा धुमाकूळ, रिक्षाचालकाला अडवून थेट...

Nashik Crime : नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला असं नाशिक पोलीस गुन्हेगारांना पकडून त्यांच्याकडून वदवून घेत असले

Nitesh Rane : अंडी फेकली, पण लक्षात ठेवा ईद आणि मोहरमही येतोय, पुढे कसा कार्यक्रम...माझगावमधील घटनेनंतर मंत्री नितेश राणे आक्रमक, दिला कडक इशारा

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असतानाच, माझगाव परिसरातील 'माझगाव मोरया' (Mazgoan Morya) गणपतीच्या आगमन