Aditi Tatkare : लाडक्या बहिणी योजनेत मोठा घोटाळा? १६५ कोटींची वसुली; सरकारी कर्मचारीही रडारवर

मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेमध्ये खोटी माहिती देऊन जवळपास १६५ कोटी रुपयांचा निधी लाटणाऱ्या अपात्र व्यक्ती आणि शासकीय कर्मचाऱ्यांभोवती आता शासनाने कायद्याचा पाश आवळण्यास सुरुवात केली आहे. योजनेच्या पडताळणीत १२ हजार ४१५ शासकीय महिला कर्मचाऱ्यांसह काही पुरुषांनी या योजनेचा बेकायदेशीर लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत 'महसूल वसुली पावती' (रेव्हेन्यू रिकव्हर्री रिसिप्ट) नियमांनुसार त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जात असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. आमदार विलास तरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात तटकरे यांच्या विभागाकडून कारवाईच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्यात आला.



मंत्री तटकरे यांनी सांगितले की, ज्या पुरुषांनी (लाडक्या भावांनी) यंत्रणेची दिशाभूल करून लाभ लाटला, त्यांचा आर्थिक पुरवठा पहिल्या टप्प्यातच रोखण्यात आला आहे. आता त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार देण्यात आले असून 'आरआरसी'च्या नियमांद्वारे ही वसुली केली जात आहे. तसेच, लाखो रुपयांचा पगार असतानाही योजनेत घुसखोरी करणाऱ्या १२ हजारांहून अधिक शासकीय महिला कर्मचाऱ्यांची माहिती संबंधित विभागांकडे सुपूर्द करण्यात आली असून, त्यांच्यावर कठोर प्रशासकीय व शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.



आधार प्रमाणीकरणामुळे बोगस लाभार्थी रडारवर



  • शासनाने योजना राबविताना पारदर्शकतेसाठी आधार प्रमाणीकरणावर आधारित ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली. याच तांत्रिक पडताळणीमुळे हा १६५ कोटींचा गैरविनियोग उघडकीस आणण्यात सरकारला यश आले. ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे पुढील सर्व हप्ते रोखण्यात आले असून, संपूर्ण छाननीअंतीच पात्र महिलांना पुढील लाभ दिला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

  • दुष्काळी परिस्थिती आणि तांत्रिक अडचणींमुळे मूळ गरीब व गरजू महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार का? या आमदारांच्या प्रश्नावर सरकारने 'नाही' असे उत्तर दिले. पात्र महिलांना ई-केवायसीसाठी पुरेशी संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे मंत्री आदिती तटकरे यांनी छापील उत्तरात स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Prashant Kishor : जनतेने बिहारसाठी 'चांगल्या' मुख्यमंत्र्याची निवड करण्याचा संदेश दिला, विजयानंतरची प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया

पाटणा : बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Chandrashekhar Bawankule : आमचा 'शेर' महाराष्ट्रात प्रचंड ताकद निर्माण करतोय!

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार - नितेश राणे