मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून, विधान परिषदेत उरण येथील 'भारत मुंबई कंटेनर टर्मिनल'ला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या दर्जाबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. आमदार धीरज लिंगाडे यांनी आज सभागृहात तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून या पुलाच्या बांधकामातील त्रुटी आणि सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुलाची सद्यस्थिती स्पष्ट करत सरकारची भूमिका मांडली. पुलाची मुख्य रचना पूर्णपणे सुरक्षित असून, तांत्रिक त्रुटी सुधारण्यासाठी कंत्राटदाराकडूनच सर्व खर्च वसूल केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. (Shivendrasinhraje Bhosale)
मुख्य संरचना सुरक्षित; फक्त 'अॅप्रोच स्लॅब'मध्ये तांत्रिक अडचण :
विरोधकांनी उपस्थित केलेल्या चिंतेचे निरसन करताना मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले की, या उड्डाणपुलाची मुख्य संरचना (Main Structure) अत्यंत भक्कम असून ती पूर्णपणे सुरक्षित आहे. केवळ पुलाच्या अॅप्रोच स्लॅबच्या भागात जमिनीचे खचणे (Soil Settlement) आणि ओव्हरलोडेड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे काही अंशी परिणाम झाला होता. एप्रिल २०२६ मध्ये करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही बाब निदर्शनास येताच सरकारने त्यावर तात्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. (Shivendrasinhraje Bhosale)
- 'ट्विटर'वर हॅशटॅग प्रथम क्रमांकावर; राजकीय नेत्यांसह नेटिझन्सकडून शुभेच्छांचा वर्षाव मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन विविध राजकीय घडामोडींनी गाजत ...
जुन्या डिझाईनमधील त्रुटी दूर; आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर :
मंत्री भोसले यांनी माहिती दिली की, पुलाचे डिझाईन 'इंडियन रोड काँग्रेस' (IRC) च्या मानकांनुसारच करण्यात आले होते. मात्र, काही जुन्या तांत्रिक त्रुटी (Lacunae) समोर आल्या आहेत. ही बाब लक्षात घेता, सरकारने जुने डिझाईन बदलून आता नवीन आणि सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या समस्या उद्भवणार नाहीत, याची दक्षता घेतली जात आहे. (Shivendrasinhraje Bhosale)
३ कोटींचा खर्च कंत्राटदाराकडूनच :
या दुरुस्तीच्या कामाबाबतची सर्वात महत्त्वाची घोषणा करताना मंत्री भोसले म्हणाले की, दुरुस्तीसाठी लागणारा अंदाजे ३ कोटी रुपयांचा खर्च शासकीय निधीतून केला जाणार नाही. करारातील 'मेंटेनन्स क्लॉज'चा प्रभावी वापर करून हा संपूर्ण खर्च संबंधित कंत्राटदाराकडूनच वसूल केला जात आहे. विशेष म्हणजे, पुढील १० वर्षांपर्यंत या पुलाच्या संपूर्ण देखभालीची आणि दुरुस्तीची कायदेशीर जबाबदारी संबंधित कंत्राटदाराचीच निश्चित करण्यात आली आहे. (Shivendrasinhraje Bhosale)
Nashik Shalarth ID Scam : राज्यातील शिक्षण विभागाला हादरवून सोडणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणात काही संस्थाचालक आणि ...
जुलै अखेरपर्यंत काम पूर्ण होणार :
सध्या या पुलाच्या भरावाचे काम अंतिम टप्प्यात असून काँक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. हे दुरुस्तीचे काम जुलै २०२६ अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधान परिषदेत दिली. सरकारच्या या तत्परतेमुळे आणि कंत्राटदाराला जबाबदार धरल्यामुळे जनतेच्या पैशाची बचत होणार असून सुरक्षित प्रवासाची हमी मिळणार आहे. (Shivendrasinhraje Bhosale)






