मुंबई : फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात 'वेदर स्टेशन' (Weather Station) बसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल,असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील अनियमितता, शेतकऱ्यांना न मिळालेली नुकसानभरपाई आणि प्रलंबित तक्रारींबाबत मंत्रालयात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कृषी मंत्री बोलत होते.या बैठकीला आमदार मनीषा चौधरी, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे,कृषी संचालक विनयकुमार आवटे,विमा कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. (Weather Station)
मुंबई: राज्यात एका बाजूला उबाठा गटातील ६ खासदारांच्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच, आता पक्षात अंतर्गत वादाची ठिणगी पडली आहे. उबाठा ...
डहाणू आणि बोईसर येथील शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरूनही त्यांची नोंदणी पूर्ण झाली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी जिल्हाधिकारी पालघर यांनी करण्याचे निर्देश कृषी मंत्र्यांनी दिले. प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारण्यासाठी शासन आग्रही आहे. गावागावात हवामान केंद्र झाल्यास, निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रत्यक्ष झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचा आकडा आणि विम्याचे निकष यांची तंतोतंत जुळवणी करणे शक्य होईल, ज्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळेल असेही कृषी मंत्री भरणे म्हणाले.(Weather Station)
मुंबई : ऑपरेशन टायगर अंतर्गत ६ खासदारांनी बंडखोरी करीत, शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे खबदरारी म्हणून उद्धव ठाकरेंनी सोमवारी सर्व आमदारांची बैठक घेतली. ...
विमा कंपन्या, बँका आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपापसातील समन्वय वाढवून प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत. कोणताही पात्र शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे कडक निर्देशही कृषी मंत्री भरणे यांनी यावेळी दिले. (Weather Station)





