Water hyacinth : पवई तलावातील जलपर्णी आता कायमची हद्दपार..

तलावाच्या विहार पथाचा विकास सी एस आर निधीतून..


मुंबई: मुंबई महापालिकेच्या पवई तलावात सांडपाण्याच्या प्रवाहामुळे यातील जलपर्णी आणि मगरींचा त्रास मोठ्याप्रमाणात होत आहे. हा त्रास आता कायमचाच दूर होणार आहे. यातील सांडपाणी प्रवेशाचे मार्ग आता कायमचेच बंद होत आहे. येत्या जून अखेरपर्यंत हे मार्ग पूर्णपणे बंद होवून यातील पाण्याचा दर्जा सुधारला जाणार आहे. परिणामी या तलावातील या सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या जलपर्णी आणि मगरींचा त्रास कायमचाच दूर होणार आहे. दरम्यान, या पवई तलावातील पाण्यावर कारंजे बसवले जाणार असून हे काम म्हाडाच्यावतीने केले जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.


पवई तलावाच्या दक्षिण बाजूस आदि शंकराचार्य मार्गालगत परिसराचा मागील १८ वर्षांपासून विकास रखडलेला असून आता याठिकाणी मेट्रो रेल्वेच्या स्थानकांची कामे पूर्ण होताच याचा विकास करण्यात येत आहे. या परिसराचे सुशोभिकरणाचे काम पूर्ण करण्यात आल्यांनतर पर्यटकांसाठी तिकीट आकारणी करण्यात येणार आहे, तसेच अंतर्गत भागांमध्ये फूड कोर्टद्वारे खाद्यपदार्थांची विक्रीची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या कामासाठी सल्लागार नेमणुकीचा प्रस्ताव आला असता,सदस्यांनी सल्लागार नियुक्तीवर आक्षेप घेतला. अश्रफ आझमी यांनी जी सल्लागार कंपनी नेमली त्याचा अनुभव काय आहे असा सवाल याच्या विकासाचा विस्तृत अहवाल सादर करण्याची मागणी केली. तर सईदा खान यांनी पवई तलावातील मगरींना सुरक्षित राणीबागेत स्थलांतरीत करावे अशी सूचना केली. तर यशोधर फणसे यांनी निविदा न काढता यासाठी सल्लागार कसा नेमला जात आहे असा सवाल कर यामध्ये एका विकासकाने मगरी सोडल्याचा आरोप केला. यावेळी झालेल्या चर्चेत शीतल गंभीर, अजंता यादव, मिनाक्षी पाटणकर यांनी सहभाग घेतला.


यावेळी अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी पवई तलावाची सुधारणा आणि प्रोमिनाड अर्थात विहार पथ आदींची कामे स्वतंत्र होत आहे. या पवई तलाव आणि आदी शंकराचार्य मार्ग मधील जागेचा विकास करण्यात येत असून यामुळे कोस्टल रोडच्या धर्तीवर एक विहार पथ उपलब्ध होणार आहे. या विहार पथाचा विकास खासगी स्वयंसेवी संस्थांच्या वतीने सीएसआर निधीतून केला जाणार आहे.तसेच पवई तलावाची सुधारणा विविध तज्ज्ञ समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार तथा त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत असून पवईत ज्या भागातून सांडपाणी प्रवेश होते, ते प्रवेश मार्ग आता बंद करण्यात येत आहेत. यामध्ये १८ दशलक्ष लिटर सांडपाणी अर्थात मलजल येत असते. त्यामुळे ३० जूनपर्यंत हे १८ प्रवेश मार्ग बंद करण्यात येत आहेत. हे सर्व प्रवेशमार्ग शोधून बंद करण्यात येत आहे. येत्या १ जुलैपासून हे प्रवेशमार्ग बंद झाल्यामुळे सांडपाण्याचा प्रवाह बंद होईल. ज्यामुळे जलपर्णी जी अधिक या पाण्यावर वाढते, ते प्रमाण कमी होईल,असे बांगर यांनी स्पष्ट केले.तसेच तलावातील कारंजे बंद असून हे कारंजे पूर्वव्रत केले जाणार आहेत. या कांरजा बसवण्याचे काम म्हाडाच्या माध्यमातून केले जाणार आहे,असेही बांगर यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

MBBS Admission Scam : MBBS प्रवेशाच्या आमिषाने १.१३ कोटींची फसवणूक; आरोपी महिलेला मुंबईतील विमानतळावर अटक

मुंबई : मुंबई किंवा पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी एका दुबईस्थित भारतीय उद्योगपती

Nasha Mukti Kendra : राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात नशा मुक्ती केंद्र स्थापन करा!

- मुख्यमंत्र्यांचे निर्देश; 'ड्रग्ज फ्री महाराष्ट्रा'साठी सर्व विभाग एकत्रित काम करणार मुंबई : तरुण पिढीला

Devendra Fadnavis :मागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा, जलयुक्त शिवार ३.० मध्ये प्राधान्य मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जलसंधारणाची कामे तातडीने हाती घेण्याच्या सूचना निश्चित झालेल्या प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून

Hotel Radha Malad : मालाडमधील हॉटेल राधाचा FDA परवाना निलंबित; किचनमध्ये उंदीर, झुरळांचा सुळसुळाट

मुंबई : अस्वच्छतेविरोधात कारवाईचा बडगा उगारत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मालाड पश्चिम येथील हॉटेल राधाचा अन्न

Nitesh Rane : राज्याच्या खोल समुद्रात होणार 'मसल फार्मिंग'

- मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; स्थानिक मच्छिमारांना विश्वासात घेण्याचे निर्देश मुंबई : समुद्रातील

Cyber Farud : 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आलंय!' निवृत्त अधिकाऱ्याला ५१ लाखांचा गंडा; मुंबई पोलिसांची थेट केरळमध्ये एन्ट्री अन्...

मुंबई : मुंबईत ‘डिजिटल अटक’च्या नावाखाली दोन ज्येष्ठ नागरिकांची तब्बल ७९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले