Nashik : एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पावसाची शक्यता , शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध शेती करावी : रविंद्र माने

नाशिक : भारतीय हवामान विभागाने यंदा एल निनो परिस्थिती सक्रिय राहण्याची शक्यता व्यक्त केली असून पावसाचे प्रमाण कमी राहण्याची किंवा पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे नियोजन, जलसंधारण आणि हवामानाधारित शेती व्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.



नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ४० हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड केली जाते. यात मका, बाजरी, भात, सोयाबीन, मूग, भुईमूग, तूर यासह फळबागांचा समावेश आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीच्या ९० टक्के (±५ %) पर्जन्यमानाचा अंदाज व्यक्त केला असल्याने शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याची गरज कृषी विभागाने व्यक्त केली आहे.


फलोत्पादनासाठी द्राक्ष, डाळिंब व आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापन, मल्चिंग, बाष्परोधक फवारणी, ठिबक सिंचन आणि उन्हापासून संरक्षणाच्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.“एकच पीक, एकच पेरणी आणि पावसावर पूर्ण अवलंबित्व” ही पद्धत टाळून मिश्र पीक पद्धती, कमी कालावधीचे वाण, पाणी साठवण आणि हवामानानुसार निर्णय हे सूत्र शेतकऱ्यांनी स्वीकारावे, असे आवाहन नाशिक जिल्हा कृषी विभागाने केले आहे.



कृषी विभागाच्या प्रमुख सूचना :


अपुरा पाऊस असताना घाईघाईने पेरणी करू नये. किमान ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.


संपूर्ण क्षेत्राची एकाच वेळी पेरणी न करता टप्प्याटप्प्याने पेरणी करावी.


दुबार पेरणीची गरज भासू नये यासाठी प्रमाणित बियाण्यांचा राखीव साठा ठेवावा.


कमी कालावधीच्या व दुष्काळसहिष्णू वाणांना प्राधान्य द्यावे.


ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, तीळ यांसारख्या कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड करावी.


तूर + सोयाबीन, बाजरी + तूर यांसारख्या मिश्र व आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.


बीबीएफ पद्धती, कंटूर बंडिंग, कंपार्टमेंट बंडिंग यांसारख्या जलसंधारण उपायांचा वापर करावा.


पीक अवशेष, पेंढा, पालापाचोळ्याचा वापर करून मल्चिंग करावे.


शेततळे, जलसाठे आणि सूक्ष्म सिंचन पद्धतींचा वापर वाढवावा.


महाअॅग्री एआय व हवामान सेवांचा वापर करून हवामानानुसार शेती नियोजन करावे.


पशुपालन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन यांसारख्या पूरक व्यवसायांकडे वळावे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; पुढील काही दिवस पावसाला ब्रेक?

मुंबई : ऐन पावसाळ्यात महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री

Bombay High Court on FDA : मुंबई हायकोर्टाचा FDA ला दणका; ५ लाखांचा दंड, कारवाईच्या अतिरेकावर न्यायालयाची नाराजी

मुंबई : महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाला (FDA) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. पुण्यातील गुरुनानक

DCM Eknath Shinde : 'मराठी भक्तीची भाषा, अमराठी बांधवांनी मराठी स्वीकारून सांस्कृतिक एकात्मतेचा आदर्श घालून दिला'

ठाणे : मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून, अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही

Sonia Gandhi : 'वंदे मातरम्' प्रकरणात सोनिया गांधी आणि खर्गेंच्या विरोधात मुंबईत दिंडोशी पोलीस ठाण्यात FIR

मुंबई : स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात 'वंदे मातरम्' गायन सुरू असताना त्यात व्यत्यय