Nashik : एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पावसाची शक्यता , शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध शेती करावी : रविंद्र माने

नाशिक : भारतीय हवामान विभागाने यंदा एल निनो परिस्थिती सक्रिय राहण्याची शक्यता व्यक्त केली असून पावसाचे प्रमाण कमी राहण्याची किंवा पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे नियोजन, जलसंधारण आणि हवामानाधारित शेती व्यवस्थापन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.



नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामात ६ लाख ४० हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड केली जाते. यात मका, बाजरी, भात, सोयाबीन, मूग, भुईमूग, तूर यासह फळबागांचा समावेश आहे. हवामान विभागाने यंदा सरासरीच्या ९० टक्के (±५ %) पर्जन्यमानाचा अंदाज व्यक्त केला असल्याने शेतकऱ्यांनी दक्ष राहण्याची गरज कृषी विभागाने व्यक्त केली आहे.


फलोत्पादनासाठी द्राक्ष, डाळिंब व आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापन, मल्चिंग, बाष्परोधक फवारणी, ठिबक सिंचन आणि उन्हापासून संरक्षणाच्या उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.“एकच पीक, एकच पेरणी आणि पावसावर पूर्ण अवलंबित्व” ही पद्धत टाळून मिश्र पीक पद्धती, कमी कालावधीचे वाण, पाणी साठवण आणि हवामानानुसार निर्णय हे सूत्र शेतकऱ्यांनी स्वीकारावे, असे आवाहन नाशिक जिल्हा कृषी विभागाने केले आहे.



कृषी विभागाच्या प्रमुख सूचना :


अपुरा पाऊस असताना घाईघाईने पेरणी करू नये. किमान ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी.


संपूर्ण क्षेत्राची एकाच वेळी पेरणी न करता टप्प्याटप्प्याने पेरणी करावी.


दुबार पेरणीची गरज भासू नये यासाठी प्रमाणित बियाण्यांचा राखीव साठा ठेवावा.


कमी कालावधीच्या व दुष्काळसहिष्णू वाणांना प्राधान्य द्यावे.


ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, तीळ यांसारख्या कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड करावी.


तूर + सोयाबीन, बाजरी + तूर यांसारख्या मिश्र व आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.


बीबीएफ पद्धती, कंटूर बंडिंग, कंपार्टमेंट बंडिंग यांसारख्या जलसंधारण उपायांचा वापर करावा.


पीक अवशेष, पेंढा, पालापाचोळ्याचा वापर करून मल्चिंग करावे.


शेततळे, जलसाठे आणि सूक्ष्म सिंचन पद्धतींचा वापर वाढवावा.


महाअॅग्री एआय व हवामान सेवांचा वापर करून हवामानानुसार शेती नियोजन करावे.


पशुपालन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन व कुक्कुटपालन यांसारख्या पूरक व्यवसायांकडे वळावे.

Comments
Add Comment

Mumbai Tree Collapse : वादळ आणि पावसात उन्मळून पडणाऱ्या झाडांचे जोखीम मूल्यांकन सुरू

मुंबई : मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुंबई

Chandrashekhar Bawankule : ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या मालमत्तांची तपासणी होणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

- राज्यव्यापी तपासणीचा तीन महिन्यांत अहवाल देणार मुंबई : इंग्रजकालीन ख्रिश्चन मिशनरी संस्थांनी राज्यात मागे

Nandur Madhmeshwar : नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यामधुन 28 हजार 934 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Nandur Madhmeshwar News : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. अनेक ठिकाणची नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक धरणांमधून आता विसर्ग

Nilesh Rane : दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ; आ. निलेश राणेंच्या लक्षवेधीवर मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

- प्रशासकीय दिरंगाईसाठी चौकशी समिती गठीत मुंबई : कोकणची वैभवशाली परंपरा असलेल्या दशावतार लोककलेच्या

CM Devendra Fadnavis : शवविच्छेदन क्षेत्रात होणार हायटेक बदल चिरफाडमुक्त 'नॉन-इन्व्हेझिव्ह' पद्धत सुरू करणार; रिक्त पदे गतीने भरण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत ग्वाही

मुंबई : राज्यातील शासकीय रुग्णालये आणि शवविच्छेदन केंद्रांच्या सक्षमीकरणासाठी शासन अत्यंत सकारात्मक असून,

Andheri Tree Fall : मुंबईत आणखी एक दुर्घटना! अंधेरीत फांदी कोसळून पादचारी गंभीर जखमी

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान झाड कोसळण्याच्या घटनांमध्ये आणखी एक भर पडली आहे. अंधेरी पूर्व