MLA Manda Mhatre : आमदार मंदा म्हात्रेंकडून मंत्री गणेश नाईकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई : नवी मुंबईतील भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि वर्चस्वाची लढाई मुख्यमंत्र्यांच्या दारात पोहोचली आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मंगळवारी (१६ जून) मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत वनमंत्री गणेश नाईक यांची तक्रार केली. नाईक हे आपल्या मतदारसंघात घुसखोरी करीत असल्याचा त्यांचा आरोप आहे.




सोमवारी (१५ जून) नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य विषयक सुविधांच्या लोकार्पण कार्यक्रमावरून या वादाची ठिणगी पडली. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव गायब असल्यामुळे महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत आधीच तीव्र नाराजी पसरली होती. त्यातच स्थानिक आमदार असूनही आपल्याला विश्वासात न घेता आणि राजशिष्टाचाराला हरताळ फासत हा सोहळा उरकला गेल्याचा आरोप करत आमदार मंदा म्हात्रे यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. ही नाराजी इथेच न थांबवता म्हात्रे यांनी मुंबई गाठून मुख्यमंत्र्यांकडे नाईक यांच्या कार्यपद्धतीचा पाढा वाचला.


या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार मंदा म्हात्रे यांनी मंत्री गणेश नाईक यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. "२००४ मध्ये मी जेव्हा आमदार नव्हते, तेव्हा गणेश नाईक मला विचारत असत की, मी इथला आमदार असताना तुम्ही मला न विचारता कामे कशी करता? आज तोच प्रश्न मी त्यांना विचारत आहे की, मी या भागाची विद्यमान आमदार आहे, मग मला अंधारात ठेवून तुम्ही कामे कशी काय करू शकता?" असा सवाल म्हात्रे यांनी उपस्थित केला. कोकण किनारपट्टीवर आगरी आणि ओबीसी समाजाची आपण एकमेव महिला आमदार असून आपल्याला मुद्दाम दुखावले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.



आधी स्वतःचा मतदारसंघ सांभाळा


मंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधताना म्हात्रे म्हणाल्या, "तुमच्या स्वतःच्या ऐरोली मतदारसंघात काय चालले आहे ते आधी बघा, तिथले त्रस्त लोक कामे घेऊन माझ्याकडे येत आहेत. आमच्या प्रत्येक चांगल्या कामात खो घालण्याचे काम सुरू आहे. निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी आहेत, याची जाणीव संबंधितांनी ठेवावी," असा इशारा देत मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. आता मुख्यमंत्री या अंतर्गत वादावर काय तोडगा काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

Nashik : नाशिक जिल्ह्यात 1,148 विद्यार्थ्यांकडून 26 हजार 891 वारकऱ्यांची चरणसेवा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम

Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत

Cristiano Ronaldo : ‘हाच माझा शेवटचा विश्वचषक!’ क्रिस्टियानो रोनाल्डोच्या भावनिक घोषणेनंतर फुटबॉलप्रेमींना मोठा धक्का

नवी दिल्ली : जागतिक फुटबॉलमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) आपल्या

Baruipur Murder Case : गुप्तांगांवर जखमा, डोक्यावर प्रहार अन् १२ वर्षीय मुलीवर पाशवी बलात्कार; पश्चिम बंगाल हादरले!

पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील बारुईपूर येथे एका १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार

Nashik Crime : फेसबुकवरील ‘फ्रेंडशिप’ ठरली कोट्यवधींचा सापळा ! नाशिक सायबर पोलिसांनी उघड केला 5.45 कोटींचा नोकरी घोटाळा

Nashik Crime : फेसबुकवर मैत्री, मंत्रालयात ओळख असल्याचा दावा अन सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आमिष आणि त्यानंतर कोट्यवधी

Kalyan Dombivli Rain Update : कल्याण-डोंबिवलीत पावसाची दाणादाण : नाले ओव्हरफ्लो, घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ

कल्याण : कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात दाणादाण उडाली असून जनजीवन