Maharashtra Monsoon Weather Alert : मान्सूनची मुंबईकरांना प्रतीक्षाच! २० जूनपर्यंत पाऊस लांबण्याची शक्यता; पाणी कपातीचं संकट गडद

मुंबई : मुंबईकरांना यंदा मान्सूनसाठी नेहमीपेक्षा अधिक प्रतीक्षा करावी लागत आहे. साधारणपणे ७ ते ८ जूनदरम्यान मुंबईत दाखल होणारा मान्सून १५ जून उलटल्यानंतरही शहरापासून दूरच आहे. त्यामुळे उष्णता, वाढलेली आर्द्रता आणि पाणीटंचाईच्या संभाव्य संकटामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)


मान्सूनने काही दिवसांपूर्वी तळकोकण आणि रत्नागिरी गाठले होते. त्यामुळे लवकरच मुंबईतही पावसाचे आगमन होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र त्यानंतर मान्सूनची प्रगती मंदावली असून त्याच्या वाटचालीला तात्पुरता ब्रेक लागल्याचे चित्र आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १८ ते २० जूनदरम्यान दक्षिण किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून त्यानंतरच तो मुंबईकडे सरकू शकतो. (Maharashtra Monsoon Weather Alert)


दरम्यान, पावसाच्या अनुपस्थितीमुळे मुंबईतील उकाडा कायम आहे. सोमवारी सांताक्रूझ येथे ३५.२ अंश सेल्सिअस तर कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे ३.१ आणि ३.५ अंशांनी अधिक होते. किमान तापमानात काहीशी घट झाली असली तरी हवेतील ६० ते ७० टक्के आर्द्रतेमुळे नागरिकांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मंगळवारीही हवामानात विशेष बदल होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)



मान्सूनच्या उशिरामुळे आता मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबतही चिंता वाढली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा हळूहळू कमी होत असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. मात्र पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास ही कपात वाढवून २० टक्क्यांपर्यंत नेण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)



महापालिका प्रशासनाकडून धरणांतील पाणीसाठ्याचा नियमित आढावा घेतला जात असून अंतिम निर्णय हवामानाच्या पुढील स्थितीवर अवलंबून असेल. पावसाचा विलंब कायम राहिल्यास पाणी व्यवस्थापनासाठी अधिक कठोर उपाययोजना लागू केल्या जाऊ शकतात. यामुळे आता मुंबईकरांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, मान्सून कधी दाखल होणार आणि उकाडा व पाणीटंचाईपासून कधी दिलासा मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे. (Maharashtra Monsoon Weather Alert)

Comments
Add Comment

Parth Pawar : मुंढवा जमीन वादात न्यायालयाचा मोठा आदेश; पार्थ पवारांच्या कंपनीचा दस्त रद्द

पुणे : पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन प्रकरणात महत्त्वाचा न्यायालयीन निर्णय देण्यात आला असून, उपमुख्यमंत्री

Moshi building collapse : मोशी इमारत दुर्घटना : एकाचा मृत्यू, सहा जण अद्याप ढिगाऱ्याखाली; २२ तासांपासून बचावकार्य सुरू

पुणे : मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील दुमजली इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळल्याच्या दुर्घटनेत

Chakur Bus Accident : चाकूरमध्ये शाळेची बस पलटून २२ विद्यार्थी जखमी प्रकरणी चालकासह मुख्याध्यापक व संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

लातूर : जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पलटी होऊन २२ विद्यार्थी जखमी झाल्याची

Nasrapur Case : जिलेबीची ऑर्डर नसती तर... ;नसरापूर हत्याकांडातला धक्कादायक खुलासा समोर

पुणे : नसरापूर (Nasrapur) येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात दोषीला अवघ्या दोन महिन्यांत फाशीची शिक्षा

Veer Jeevaji Mahale : प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार; प्रथम टप्प्यात 1 कोटींचा निधी

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेत माहिती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Jalgaon : भुसावळ–उधना मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा; ‘अमृत भारत’ एक्स्प्रेस आजपासून दररोज धावणार

Jalgaon : भुसावळ–उधना मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. उधना–ब्रह्मपूर अमृत भारत