Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मास्टर प्लॅन तयार केला आहे. आता बोरिवली स्थानकाचा भार हलका करण्यासाठी कांदिवली स्थानकाचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' (Alternative Transport Hub) म्हणून विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पासाठी हिरवा कंदील दिला असून दोन्ही स्थानकांचा एकात्मिक पुनर्विकास केला जाणार आहे.




बोरिवली स्थानकावर प्रचंड ताण


बोरिवली हे पश्चिम रेल्वेचे एक प्रमुख केंद्र आहे. या स्थानकावरील गर्दीची आकडेवारी पाहता हा बदल अत्यंत आवश्यक होता:





  • दैनिक प्रवासी संख्या: सुमारे ३.६५ लाख प्रवासी.




  • रेल्वे सेवा: दररोज सुमारे १,२०० लोकल फेऱ्या आणि १९१ लांब पल्ल्याच्या गाड्यांची ये-जा. प्रवाशांची वाढती संख्या पाहता गर्दीचे नियोजन करणे रेल्वेसाठी मोठे आव्हान ठरत होते, त्यामुळे आता काही वाहतूक कांदिवली स्थानकाकडे वळविण्याचे नियोजन आहे.






काय असणार आहे पुनर्विकासात?


एकात्मिक पुनर्विकास योजनेअंतर्गत दोन्ही स्थानकांचा कायापालट होणार आहे:





  • बोरिवली स्थानकासाठी विशेष: नवीन उद्वाहक (Lifts), सरकते जिने (Escalators), स्कायवॉक, अतिरिक्त फलाट आणि आधुनिक पादचारी पूल (FOB) उभारले जाणार आहेत. पादचारी मार्ग अधिक रुंद करून प्रवासी वाहतूक व्यवस्था सुलभ केली जाईल.




  • कांदिवली स्थानकासाठी विशेष: कांदिवली स्थानकाला अत्याधुनिक सुविधांसह एक महत्त्वाचे वाहतूक केंद्र म्हणून विकसित केले जाईल.






प्रवाशांना मिळणार 'मल्टि-मोडल' कनेक्टिव्हिटी


दोन्ही स्थानकांचा केवळ रेल्वेपुरता विचार न करता, त्यांना इतर सार्वजनिक वाहतुकीशी जोडण्यावर भर दिला जाणार आहे:





  • मेट्रो आणि बस कनेक्टिव्हिटी: रेल्वे स्थानके मेट्रो, बस आणि रस्ते वाहतुकीशी अधिक प्रभावीपणे जोडली जातील.




  • इतर सोयी: प्रवाशांसाठी बहुमजली वाहनतळ (Multi-level parking), वाहनांसाठी स्वतंत्र 'ड्रॉप-ऑफ' आणि 'पिक-अप' झोन, तसेच सुसज्ज जोडरस्ते (Approach roads) उभारले जातील.






प्रवाशांना काय फायदा होईल?


या प्रकल्पामुळे बोरिवली ते विरार या पट्ट्यातील लाखो प्रवाशांना अधिक सुरक्षित, जलद आणि सुखद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. गर्दीचे विभाजन झाल्यामुळे स्थानकांवरील चेंगराचेंगरीचा धोका टळण्यास मदत होईल. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Comments

Anil    June 17, 2026 06:00 AM

Buses from KADIVALI east to gokul anand hotel and back to Kandivali station east (Ring route ) Fast train should stop at Kandivali & borivali

Add Comment

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Eknath Shinde : ठाणे शहरातील सर्वात मोठ्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाला प्रारंभ; तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन

ठाणेकरांच्या स्वप्नपूर्तीकडे एकनाथ शिंदेंचे आणखी एक मोठे पाऊल २०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी कामामुळे दीड

Ashadhi Wari : आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच

Mumbai Crime News : मुंबई विमानतळ परिसरातील हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; अहमदाबादच्या व्यावसायिकाला अटक

मुंबई : मुंबई शहरातील विमानतळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये महिलेवर

Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! घाटकोपरमध्ये उभारला जाणार नवा केबल-स्टेड पूल, 2027 पर्यंत काम पूर्ण होण्याचे लक्ष्य

BMC News : तरंगता कचरा रोखण्यासाठी मालाडमध्ये 'द ओशन क्लीनअप' इंटरसेप्टर पायलट प्रकल्प!

तरंगता कचरा संकलन प्रकल्प पाहणीसाठी तेजिंदर सिंग तिवाना उतरले नदीपात्रात! मुंबई : मालाड (Malad) खाडीमध्ये जागतिक