Devendra Fadnavis : पाऊस २३ जूननंतरच, पाणी जपून वापरा!

सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई : राज्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर गेल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या पाणीटंचाईचे पडसाद मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. राज्यातील धरणांमध्ये सध्या केवळ २५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. उपलब्ध पाणीसाठ्याचे संकट लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाणी अत्यंत जपून वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, हवामान अंदाजानुसार येत्या २३ जूननंतर राज्यात मान्सून पूर्ववत सक्रिय होईल, अशी शक्यता बैठकीत वर्तवण्यात आली.



मंगळवारी मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा विभागातर्फे राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्याबाबतचे सविस्तर सादरीकरण (प्रेझेंटेशन) करण्यात आले. या अहवालातील आकडेवारी अत्यंत चिंताजनक असून, पुढील अडीच महिने पाण्याचा काटेकोर वापर करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.


जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, राज्यातील एकूण ३ हजार २८ लहान-मोठ्या धरणांमध्ये सध्या अवघा १ हजार ४४२.३४ टीएमसी म्हणजेच फक्त २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणांमध्ये ३१ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा ६ टक्क्यांनी घटला आहे. जिल्हानिहाय आणि विभागनिहाय आकडेवारीचा विचार केला असता, पुणे विभागातील परिस्थिती सर्वाधिक गंभीर असल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या ७२४ धरणांमध्ये सध्या ५३८.६४ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून हे प्रमाण गेल्या वर्षीच्या २८ टक्क्यांच्या तुलनेत कमालीचे घटले आहे.




३१ ऑगस्टपर्यंत काटेकोर नियोजनाचे आदेश


- २३ जूननंतर जरी मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज असला, तरी संभाव्य धोका टाळण्यासाठी राज्य सरकारने आधीच सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे. धरणांमधील उपलब्ध पाणी पिण्यासाठी प्राधान्याने राखून ठेवले जावे आणि ३१ ऑगस्टपर्यंत पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरला जावा, अशा सूचना मंत्रिमंडळ बैठकीत सूत्रांनी दिल्या आहेत.
- पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य सचिवांनी तातडीने पावले उचलत सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
- त्यानुसार, धरणांमधून किंवा मुख्य जलवाहिन्यांतून होणारा पाण्याचा अवैध उपसा रोखण्यात यावा आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सध्याच्या राज्य सरकारच्या धोरणानुसार, टंचाईच्या काळात जर संबंधित धरणात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा उपलब्ध असेल, तरच खरिपाच्या पिकांसाठी सिंचनाचे पाणी सोडण्याबाबत नियोजन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Maharashtra Heavy Rain : राज्यात पावसाचा कहर! १७ NDRF आणि 6 SDRF पथके तैनात; लोणावळ्यात तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली