Jalgaon Crime : जीवघेण्या हल्ल्यातील जखमी तरुण रुग्णालयात तर मुख्य आरोपी मोकाट

Jalgaon Crime : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये मागील काही महिन्यांपासून सर्वच प्रकारच्या अवैध व्यावसायांनी उच्छाद मांडला आहे. कुऱ्हाड तांडा येथे २४ एप्रिल रोजी अवैध व्यवसायांच्या तक्रारीच्या कारणावरून एका तरुणावर टोळक्याने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात तो तरुण जबर जखमी झाल्याने त्याच्यावर गेल्या एक ते दीड महिन्यांपासून जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तो तरुण जीवनाशी झुंज देत आहे.


या हल्ला प्रकरणात सामील आरोपी अटक करण्यात आले होते. तर मुख्य आरोपी हा घटना घडल्या पासून फरार होता. असे असतांना या खुनी प्रकरणातील मुख्य आरोपीला न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केल्याचे समजते. जीवावर बेतलेल्या आणि रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेला तरुण उपचार घेत असताना त्याच्या मारेकऱ्याला जामीन मंजूर झाल्याने वैफल्यग्रस्त कुटुंबामध्ये तीव्र संताप आणि असंतोष निर्माण झाला आहे. न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त करत पीडित कुटुंबाने जळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत येत्या १९ तारखेला सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने या प्रकरणाला वेगळी दिशा मिळाली असून संशय निर्माण झाला आहे.



नेमकं काय घडलं होतं ?


कुऱ्हाड तांडा येथे तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ल्यात त्याच्या पोटाच्या आतड्या बाहेर आल्या होत्या. तरुण गंभीर जखमी असून त्याची प्रकृती आजही चिंताजनक आहे. त्याच्यावर २४ एप्रिल पासून उपचार सुरू आहे. या प्रकरणी सहा जणांसह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपासादरम्यान काही आरोपींना अटक करण्यात आली, तर अल्पवयीन आरोपींना बालसुधारगृहात रवाना करण्यात आले आहे. मात्र मुख्य आरोपी हा हल्ला केल्यापासून फरार झाला होता.



आरोपीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याची चर्चा असतांनाच त्याला तात्पुरता जामीन मंजूर झाल्याचे बोलले जात आहे. या बाबत न्यायालयीन आदेशाची प्रत उपलब्ध नसल्याने पोलिस प्रशासनाकडून जामीन बाबत दुजोरा देण्यात आलेला नाही. पीडित कुटुंबीयांचा आरोप आहे की, आरोपी फरार असताना देखील त्यांच्यावर दबाव आणि धमक्या देण्याचे प्रकार सुरू असून आता तर आरोपीला जामीन मिळाल्यामुळे जिवाला धोका धोका निर्माण झाला आहे. जखमी तरुणाची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याने त्याच्यावर आणखी एक मोठी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.


जळगाव येथे पत्रकार परिषद घेत पीडित कुटुंबातील सदस्यांनी आपली व्यथा मांडली असून गेल्या दीड ते दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी आम्हाला न्याय मिळालेला नाही. तर दुसरीकडे आरोपींविरुद्ध कठोर कारवाई होत नसल्याची शंका उपस्थित केली आहे. आम्हाला न्याय पाहिजे मुख्य आरोपीचा जमीन रद्द करण्यासाठी पिंपळगाव पोलिसांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्याय् मिळेल अशी पावले उचलावी अन्यथा १९ जून रोजी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

Alandi Flood : पूरग्रस्त आळंदीसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय

- विविध विकास कामांसाठी एकूण १० कोटींचा विशेष निधी मंजूर! मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार

Rahuri : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात ; लालपरी, कारच्या अपघातात तीनजण गंभीर

Rahuri : नगर-मनमाड महामार्गावर (Nagar-Manmad highway) कोल्हार खुर्द शिवारात राज्य परिवहन महामंडळाची बस व कारचा समोरासमोर भीषण

Ahilyanagar : धुवाधार पावसाचा कहर ! घाटघर येथे ३२१ मिमी पावसाची नोंद, अनेक धबधबे, किल्ले आणि ट्रेकिंग मार्गांवर प्रवेशबंदी

Ahilyanagar : अकोले तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून हरिश्चंद्रगड-भंडारदरा (Harishchandragad and Bhandardara) परिसरात

Tukaram Maharaj Palkhi Sohala 2026 : तुकोबाराय व माऊलींच्या पालखी स्वागतासाठी पिंपरी-चिंचवड सज्ज

पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी

Satara : महाबळेश्वरमध्ये 24 तासांत 513 मिमिची नोंद, 100 वर्षांतील विक्रमी पाऊस

Satara : मराठवाडा वगळता राज्यातील इतर भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई (Mumbai), पुणे , नाशिक याठिकाणी पावसाने मोठ्या

Chandrashekhar Bawankule : गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी कोकणासह प्रमुख शहरांमध्ये 'ड्रोन' सर्वेक्षण

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा; गौण खनिजांच्या देखरेखीसाठी कोकणात हायटेक