Nashik : नाशिक-शिर्डी रेल्वे प्रवास होणार सुसाट ? दुहेरी रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती

Nashik : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela) पार्श्वभूमीवर नाशिकमधील पायाभूत सुविधांच्या कामांना प्रशासनाकडून वेग दिला जात आहे,. अशातच आता नाशिकरोड ते साईनगर शिर्डी (Nashik Road to Sainagar Shirdi) या दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाचीही (Railway Line Project) जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी आता भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यात आली असून जिल्हा प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे भविष्यात नाशिक ते शिर्डी रेल्वे प्रवास अधिक जलद आणि सुलभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


नाशिक हे देशातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे. धार्मिक, औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने नाशिक शहराचे महत्त्व मोठे आहे. सिंहस्थ कुंभमेळा, त्र्यंबकेश्वर, पंचवटी तसेच शिर्डी यांसारख्या धार्मिक स्थळांमुळे दरवर्षी लाखो भाविक नाशिकमध्ये येत असतात. नाशिकमध्ये पर्यटनासाठी देखील प्रसिद्ध ठिकाणे आहे. त्यामुळे शहराची दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. रस्तेमार्ग, हवाई सेवा आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.



नाशिकसाठी दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्प महत्त्वाचा


याच पार्श्वभूमीवर नाशिकरोड ते साईनगर शिर्डी हा दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पासंदर्भात मध्य रेल्वेकडून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन शाखेला प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्या प्रस्तावाच्या आधारे आता प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याचे भूसंपादन समन्वय अधिकारी राजेंद्र वाघ (Rajendra Wagh) यांच्या डिजिटल स्वाक्षरीने २५ मे रोजी भूसंपादनासंदर्भातील (Land Acquisition) आदेश जारी करण्यात आले आहेत.


या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील तब्बल ३४ गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. यामध्ये सिन्नर आणि नाशिक या दोन तालुक्यांचा समावेश असून प्रकल्पाची जबाबदारी निफाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.



'या' गावांमध्ये भूसंपादन होणार


सिन्नर तालुक्यातील सिन्नरसह खंबाळे, कुंदेवाडी, वडझिरे, दातली, मलढोण, पाथरे खुर्द, पांगरी खुर्द, मांजरे, फुलेनगर, ब्राम्हणवाडे, मुसळगाव, देशवंडी, जायगाव, पांगरी बुद्रुक, वावी, सायाळे, पाटपिंप्री, बारागावपिंप्री, भोकणी, सुंदरपूर या गावांमध्ये भूसंपादन केले जाणार आहे. तर नाशिक तालुक्यातील जाखोरी, देवळाली, विहितगाव, बेलतगव्हाण, चांदगिरी, चेहेडी बुद्रुक, संसरी, मोहगाव, बाभळेश्वर, पंचक आणि चाडेगाव या गावांचाही यात समावेश आहे.


दरम्यान, नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पावरून गेल्या काही वर्षांत मोठा वाद पाहायला मिळाला होता. सुरुवातीला सिन्नर, संगमनेर आणि राजगुरुनगरमार्गे हा मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र नंतर या मार्गात बदल करून तो शिर्डीमार्गे प्रस्तावित करण्यात आला. त्यामुळे मूळ मार्गानुसारच रेल्वे व्हावी, या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली होती. मात्र सध्या नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाबाबत विशेष हालचाली दिसत नसताना नाशिकरोड ते साईनगर शिर्डी दुहेरी रेल्वेमार्गाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान,आता भूसंपादन प्रक्रिया कितपत वेगाने पूर्ण होते आणि प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पालकमंत्री नितेश राणेंनी घेतला चहा-भजीचा आस्वाद

मसूरे : सत्तेच्या पदांचा किंवा प्रोटोकॉलचा कोणताही अभिनिवेश न बाळगता जनतेत मिसळणे, कार्यकर्त्यांच्या

Friendship Day 2026 Special : मैत्रीची अनोखी कहाणी सांगणारे बॉलीवूडचे 'हे' सुपरहिट चित्रपट, एकदा नक्की पाहाच!

मुंबई : मैत्री म्हणजे विश्वास, साथ, त्याग आणि आयुष्यभर जपला जाणारा नात्याचा धागा. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या

Jasprit Bumrah : बुमराह श्रीलंका दौऱ्याला मुकणार ? दुखापतीमुळे निवड समितीसमोर पर्यायांचा प्रश्न

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) १५ ऑगस्टपासून गाले येथे सुरू होणाऱ्या

Supreme Court : व्यभिचार सिद्ध झाल्यास पत्नी पोटगीस अपात्र, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली : पत्नी व्यभिचारात राहत असल्याचे पतीकडून स्पष्टपणे सिद्ध झाल्यास, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १२५

India Envoy Warns Pakistan : "आधी दहशतवाद संपवा, आणि नंतरच..."!पाकिस्तानला भारताचा कडक इशारा; राजदूत विनय क्वात्रा यांचे स्पष्ट शब्द

नवी दिल्ली : पाकिस्तानने द्विपक्षीय संबंध सुधारायचे असतील, तर सर्वप्रथम आपल्या भूमीवरील दहशतवादाचा संपूर्ण

Justice Anu Grover Baliga : न्यायमूर्ती अनु ग्रोवर बलीगा यांची बदली, नीट पेपरफुटीची सोमवारी ३ ऑगस्ट रोजी सुनावणी

नवी दिल्ली : देशभरात प्रश्नपत्रिका फुटीच्या वाढत्या प्रकरणांवरून आंदोलने झाल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी