Nashik : नवरी निघाली तीन मुलांची आई ! शेतकरी तरुणाची ३ लाखांची फसवणूक; नेमकं काय घडलं ?

Nashik : नाशिक आणि सोलापूर ( Solapur ) जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने हतबल झालेल्या एका शेतकरी तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, ज्या महिलेशी तरुणाचा विवाह लावून देण्यात आला, तिचे आधीच लग्न झालेले असून तिला तीन मुले असल्याचे देखील समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून मुख्य संशयित महिलेला अटक (Arrest) करण्यात आली आहे.



नेमकं काय घडलं ?


गेल्या काही वर्षात शेतकरी कुटुंबातील (Farmer family) शेतकरी असलेल्या मुलांना मुलगी भेटणे कठीण झाले आहे. मुलीकडील अपेक्षा वाढल्याने अनेक गावांमध्ये शेतकरी मुलं लग्नाचे वय उलटूनही अविवाहितच राहत आहेत. लग्नासाठी कुठे मोर्चे तर कुठे तरुणाच्या आत्महत्या होत आहेत. अशाच परिस्थितीचा फायदा घेत काही टोळ्या सक्रिय झाल्या असून लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.


सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ (Mohol) तालुक्यातील नरखेड येथे अशीच एक घटना घडली. २४ वर्षीय विशाल धावणे हा तरुण शेतकरी असून त्याच्यासाठी वधू शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. यादरम्यान त्याची सोलापूरमधील एका दलालाशी ओळख झाली. या दलालाने नाशिकमधील दुसऱ्या एजंटशी संपर्क साधत विशालसाठी मुलगी मिळाल्याचे सांगितले. मात्र, या संपूर्ण प्रकरणामागे एक मोठा कट रचण्यात आला होता. याची कल्पना तरुणाला नव्हती. धक्कादायक म्हणजे संबंधित महिला आधीच विवाहित असतानाही ती अविवाहित असल्याचा बनाव रचण्यात आला. विशालला विश्वासात घेत लग्न ठरविण्याचे नाटक करण्यात आले. त्यासाठी दलालांकडून पैशांचीही मागणी करण्यात आली.



नवरी गायब , नवरदेव हतबल


पोलिसांच्या माहितीनुसार, या व्यवहारात एका संशयित दलालास ५० हजार रुपये देण्याचे तर कथित वधूच्या वडिलांच्या भूमिकेत असलेल्या संशयितास तब्बल २ लाख ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते. लग्नाच्या आशेने विशालने ही रक्कम दिली. त्यानंतर ७ जून रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालुक्यातील कसबे वणी येथील एका मंदिरात मोठ्या थाटामाटात विवाह सोहळाही पार पडला. लग्न झाल्यानंतर विशाल आणि त्याचे नातेवाईक नव्या संसाराची स्वप्ने पाहत नववधूसोबत वाहनाने रवाना झाले. मात्र, काही अंतर पुढे गेल्यानंतर अचानक वाहन थांबवण्यात आले. त्यावेळी एका संशयिताने नवरीला गाडीतून खाली उतरण्यास सांगितले. काही क्षणांतच ती महिला रहस्यमयरीत्या गायब झाली.


अचानक घडलेल्या या प्रकारामुळे विशाल आणि त्याच्या कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी महिलेचा शोध घेत चौकशी सुरू केली. मात्र, चौकशीदरम्यान समोर आलेली माहिती ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या महिलेशी विवाह लावून देण्यात आला होता, ती आधीच विवाहित असून तिला तीन मुले असल्याचे समोर आले. आपण मोठ्या फसवणुकीचे बळी ठरलो असल्याचे विशालच्या लक्षात आले.



वणी पोलिसांकडून तपास सुरु


इतकंच नाही, तर महिलेकडील मंडळींकडून धोका असल्याची भीतीही त्यांना वाटू लागली. त्यामुळे तेथून निघण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी एका विनाक्रमांकाच्या मोटारीने त्यांच्या वाहनाचा पाठलाग केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. हा संपूर्ण प्रकार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी, पंचवटी तसेच सोलापूर जिल्ह्यातील नरखेड आणि मोहोळ परिसरात घडला. फसवणूक झाल्यानंतर विशाल धावणे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र घटनास्थळ वणी पोलीस ठाण्याच्या (Wani Police Station) हद्दीत येत असल्याने हा गुन्हा वणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.



आधी चौकशी मगच लग्नाची बोलणी करा


या प्रकरणी वणी पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये विनाक्रमांकाच्या वाहनातील संशयित, बापू अंधारे, नाशिकमधील काही संशयित, अज्ञात दलाल, तीन महिला आणि अन्य दोन जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या टोळीतील मुख्य संशयित महिलेला पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, ही टोळी याच पद्धतीने आणखी कित्येक तरुणांची फसवणूक करत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लग्न जुळवताना अशा दलालांपासून सावध राहण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Mankhurd : मानखुर्दमध्ये चाळीचा भाग कोसळला, पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

मुंबई : मुंबईत सतत पडत असलेल्या पावसामुळे मानखुर्दमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरांतील

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

School - College Holidays : मोठी बातमी! मुंबई, ठाणे, पनवेलसह सर्व शाळा-महाविद्यालयांना उद्या सुटी; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा महत्वाचा निर्णय

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे आणि पनवेल येथे सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार

Prakash Abitkar : वारीत अत्यावश्यक रुग्णांसाठी प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा!

भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची आणि आरोग्य संपन्न वारी या डिजिटल उपक्रमाची सुरुवात मुंबई : आषाढी यात्रेच्या

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी