BMC : महापालिकेच्या किती कर्मचाऱ्यांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही

स्थायी समिती सदस्याने केली विचारणा


समितीपुढे माहिती सादर करण्याची केली मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेतील नोकर भरतीमध्ये आरक्षित प्रवर्गातून अर्ज भरुन सेवेत रुजू झालेल्या बहुतांशी कर्मचाऱ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केलेले नाही. अशाप्रकारे अनेक वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या निकषानुसार अधिसंख्या पदावर सामावून घेणे आवश्यक आहे. परंतु अशाप्रकारे अधिसंख्या पदावर सामावून न घेतल्याने बहुतांशी अशाप्रकारे निवृत्त झालेले कर्मचारी निवृत्ती वेतन आणि ग्रॅज्युएटीच्या लाभापासून वंचित राहिल्याने यावरून स्थायी समितीच्या बैठकीत सदस्याने मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे अशाप्रकारे किती कर्मचाऱ्यांनी जात प्रमाणपत्र सादर केलेले नाही तसेच त्यांना निवृत्तीनंतरचे लाभ देण्यात आलेले नाहीत याची माहिती देण्याची मागणी भाजपचे तेजिंदर तिवाना यांनी केली आहे.


महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक खात्यातील विवक्षित अधिकारी/कर्मचारी ह्याची सेवा वयाच्या ५५ वर्षानतर पुढे चालू ठेवण्याच्या प्रस्ताव मंजुरीला आला असता भाजपचे तेजिंदर तिवाना यांनी या प्रस्तावातील काही बाबींकडे समितीचे लक्ष वेधून घेतले. ते म्हणाले, या प्रस्तावात असे नमुद केले आहे की, कर्मचारी उर्मिला कोमरे कनिष्ठ लेखा परीक्षक यांची नियुक्ती अनुसूचित जमाती प्रवर्गातून झाली आहे. पण त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र अद्याप सादर केलेले नाहीत. या माध्यमातून त्यांनी प्रश्न उपस्थित करत अशाप्रकारे महापालिका सेवेत असलेल्या किती कर्मचाऱ्यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर केलेले नाही. आणि हे प्रमाणपत्र सादर न करताच किती कर्मचारी निवृत्त झाले आहेत. आणि या कर्मचाऱ्यांना अद्यापही निवृत्ती वेतन किंवा त्यांचे भत्ते दिले जात नाहीत, असे सांगितले.



तसेच हे प्रमाणपत्र न दिलेल्या कर्मचाऱ्यांना किंवा प्रमाणपत्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्या पदावर सामावून घेण्याचा राज्य शासनाचे परिपत्रक आहे. तर आतापर्यंत अशा किती कर्मचाऱ्यांना अधिसंख्या पदावर सामावून घेतले आहे. जेणेकरून, त्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारच्या निवृत्तीनंतर त्रास होणार नाही. शासनाच्या अधिसंख्या नियमांचे पालन किती प्रमाणात केले जात आहे, तसेच अधिसंख्या पदावर समावून न घेतलेले आणि निवृत्त झालेल्या किती कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन रोखून ठेवलेले आहेत,त्याची सर्वंकष माहिती सादर समितीला सादर करण्यात यावी.



अधिसंख्या पदावर सेवा वर्ग करण्यात आलेल्या उर्मिला कोमरे यांचे परिपत्रक एमबीसी ७१७८ दिनांक २०२५ मधील निर्देशानुसार कार्यालयीन आदेशान्वये १. ०९. २०२३ आणि ०२.०८.२०२४ या दोन दिवसांच्या तांत्रिक खंड क्षमापित करण्यात आलेला असे नमूद करण्यात आहे. पण निर्देश २०२५चे आहेत आणि प्रशासन याच निर्देशानुसार कार्यलयीन आदेशान्वये सन २०२३ आणि सन २०२४ तांत्रिक खंड क्षमपित करण्यात आलेले आहेत,असे म्हणत आहे, याचा अर्थ नक्की काय आहे अशीही विचारणा केली आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : गेमिंगमध्ये भारताची मोठी झेप! ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ साठी ‘इंडिया रायझिंग’चा ऐतिहासिक मार्ग खुला

- ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ च्या माध्यमातून महाराष्ट्र डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल –

Devendra Fadnavis : राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी पुन्हा सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

- सहकारात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव मुंबई : "महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला १०७ वर्षांची उज्ज्वल परंपरा

Devendra Fadanvis : मुंबई, ठाणे, कोकणाला पावसाने झोडपले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रशासनाला दिल्या 'या' सूचना

मुंबई : राज्यातील अनेक भागांसह मुंबईत सध्या मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे

Mumbai Rain : धक्कादायक! भांडूपमध्ये रस्ता खचून टेम्पो अन् झाड बघता बघता जमिनीच्या पोटात गायब

पुढचे काही तास मुसळधार पावसाची शक्यता Mumbai : मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी, शहराच्या काही

मागील सहा तासात पावसाने मुंबईला झोडपले... अनेक परिसर जलमय, वाहतुकीसाठी मार्ग केले बंद

मुंबई  : मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ ते

Mumbai Hit And Run : मुंबईच्या जोगेश्वरीत भीषण अपघात; भरधाव टँकरच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) जोगेश्वरी (Jogeshwari) पश्चिम परिसरात मध्यरात्री भीषण 'हिट अँड रन'ची (Hit And Run) घटना घडली. अमृत नगर येथील