Nasrapur : नसरापूर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात

पुणे  : संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेल्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५३ जणांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. त्यात अत्यंत महत्त्वपूर्ण पुरावे रेकॉर्डवर आले आहेत. यामध्ये वैद्यकीय पुरावे, वैज्ञानिक माहिती, बाल-साक्षीदाराची साक्ष आणि डीएनए प्रोफायलिंग या बाबींचा समावेश आहे.



उर्वरित दोन साक्षीदार एक सायबर तज्ज्ञ आणि मुख्य तपास अधिकारी (आयओ) यांच्या साक्षी नोंदवण्याचे काम सोमवारी (दि. १५) सुरू होणार आहे. दररोज चाललेल्या सुनावणीमुळे या खटल्याचा निकाल महिनाभराच्या आतच लागण्याची शक्यता असून, राज्याच्या इतिहासातील हा सर्वात जलद चाललेला खटला ठरू शकेल, असा विश्वास विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी व्यक्त केला. नसरापूर परिसरात दि. १ मे रोजी एका निष्पाप साडेतीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे या नराधमाला अटक करण्यात आली होती. विशेष न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरू आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून जिल्हा न्यायालयात ११०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. २९ मे रोजी न्यायालयात प्रत्यक्ष साक्ष नोंदवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी पीडितेच्या आई-वडिलांची साक्ष नोंदवली गेली. या खटल्यात आजमितीला एकूण ५३ साक्षीदार तपासून झाले आहेत. न्यायालयात तांत्रिक व डिजिटल पुराव्यांशी संबंधित ‘इ-साक्ष’ पोर्टलवरील साक्षीदार, घटनेची पुनर्रचना (सीन रिक्रिएशन) करणारे पंच आणि सीसीटीव्ही चित्रीकरण जप्त करणारे पंच अशा महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.

Comments
Add Comment

Sachin Ahir : सचिन अहिर यांच्या मुंबईतील घरात मोठी चोरी; 2.65 कोटींचा ऐवज लंपास, घरातील कर्मचाऱ्यावर संशय

Pune Metro : पुणेकरांचा मेट्रो प्रवास होणार हायटेक! लाईन ३ वर स्मार्ट तिकीट व्यवस्था सुरू

पुणे : पुणे मेट्रो (Pune Metro) लाईन ३ (Line 3) वर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक

Pune Wethear : पुण्यात पावसाचा जोर कायम; शहराला ऑरेंज, घाटमाथ्याला रेड अलर्ट

पुणे : पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून पुढील दोन दिवसही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची

Ashadhi Wari : आषाढी वारीत 'संवाद वारी'द्वारे रोजगार हमी योजनेची जनजागृती; मंत्री भरत गोगावले यांचा सहभाग

पंढरपूर येथे आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकऱ्यांपर्यंत केंद्र सरकारच्या व्ही.बी.जी. रामजी – विकसित भारत

Maharashtra weather : पुढचे काही तास धोक्याचे! 70 च्या वेगाने वारे आणि अतिमुसळधार पाऊस; 'या' 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट

14 जिल्ह्यांकडे पावसाने फिरवली पाठ! महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असला तरी राज्यात दोन वेगवेगळी चित्रे पाहायला

Babasaheb Patil : ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना उद्या कर्जमाफीचा लाभ मिळणार

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील; पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेधारकांची यादी जाहीर होणार मुंबई (Mumbai):