BEST Bus : बेस्टला केलेल्या आर्थिक सहायाचा हिशोब द्या

एक हजार कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव ठेवला राखून


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


आर्थिक अडचणीत सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला हातभार लावण्यासाठी मुंबई महापालिकेचा आर्थिक सहाय दिले जात असले यापूर्वी देण्यात आलेल्या अनुदानासंदर्भातील खर्चाचा हिशोब दिला जावा अशी मागणी करत स्थायी समितीने एक हजार कोटी रुपयांच्या अनुदानाचा प्रस्ताव राखून ठेवला. तसेच पुढील बैठकीत स्थायी समितीच्या बैठकी बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक तथा लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापालिकेने मदत दिल्यानंतरही बेस्ट आर्थिक सक्षम होण्यासाठी काय प्रयत्न करते तसेच महापालिकेने दिलेल्या पैशांचा वापर कशासाठी केला जात आहे याची उपस्थित राहून माहिती देण्याची निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले आहेत.



बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती आणि मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन ही मुंबई महापालिकेने सन २०२६-२७ या वर्षांसाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून उपक्रमाच्या दैनंदिन कारभारासह कर्मचारी खर्च आणि प्रवासी सेवा सुरळीत ठेवण्यास मदत करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीसमोर आला होता. २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीत १२, ३१२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तरीही वाढता खर्च, प्रवासी उत्पन्नातील तूट आणि आर्थिक दायित्वांमुळे बेस्टची आर्थिक घडी अद्याप पूर्णपणे सावरलेली नाही. याबाबतच्या प्रस्तावावर बोलतांना उबाठाच्या यशोधर फणसे यांनी मागील महिन्यात दोन बेस्ट बसचे अपघात झाले असून कुर्ला आगाराचा मालमत्ता न भरल्याने याचे ९७ कोटी रुपयांचा रक्कम कापून घेत सुमारे ९०६ कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे या एक हजार कोटी रुपयांची मदत बेस्टला करण्यात येत असल्याने याच्या खर्चाची माहिती मिळेपर्यंत हा प्रस्ताव राखून ठेवण्याची मागणी फणसे यांनी केली.



तर बेस्टच्या बसेस भाड्याने घ्यायचा निर्णय कुणी घेतला असा सवाल करत शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी आपण दिलेल्या अनुदानातून भाडेतत्वावर बसेस घेण्याऐवजी मालकी तत्वावर बसेस का घेतल्या नाहीत असा सवाल केला. तर अश्रफ आझमी यांनी बेस्ट अपघातात जखमी झालेले नागरिकही मदतीसाठी बेस्टकडे प्रतिक्षित आहेत. साडेचार हजारांवर बेस्टचा ताफा हा २२४९वर आला आहे याबाबत चिंता व्यक्त केली. तर भाजपचे प्रकाश दरेकर यांनी बेस्टचे वैभव कुणामुळे खालसा होत आहे असा सवाल करत यापूर्वी काही नाही केले यापेक्षा पुढे काय करता येईल यासाठी प्रयत्न केला जावा अशी सूचना केली. तर गणेश खणकर यांनी बेस्टची किती पाच रुपये करणे कुणाचा निर्णय होता. तो निर्णय तोट्याचा असूनही पुढे चालू ठेवला. यावेळी झालेल्या चर्चेत जमीर कुरेशी, बढे, रमाकांत रहाटे आदींनी भाग घेतला. यानंतर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी आजवर १२ हजारांहून अधिक कोटी रुपयांची मदत केली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव राखून ठेवण्याचा निर्णय याचकरता घेण्यात येत आहे की बेस्टला अडचणीतून बाहेर काढण्याचा सकारात्मक पाऊल उचलले जात आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ५ जून रोजी याबाबतची बैठक घेतली आहे, त्याचा प्रारुप काही दिवसांमध्ये समोर येईलच. त्यामुळे बेस्टचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतलेलाच आहे. त्यामुळे बेस्टचा अॅक्शन प्लान काय आहे, याची माहिती या समितीला व्हावी आणि पुढील बैठकीत त्यांच्या अधिकाऱ्यांनी येवूनही संपूर्ण माहिती द्यावी याकरता हा प्रस्ताव पुढील बैठकीपर्यंत राखून ठेवण्यात येत असल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.

Comments
Add Comment

Bhandup News : भांडुपमध्ये फेरीवाल्यांचा वाद चिघळला; ज्येष्ठ नागरिकाला मारहाण? पोलिसांची कारवाई

भांडुप : भांडुपमधील शक्तीधाम मंदिर (Shaktidham Temple) परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला (Senior Citizen) झालेल्या कथित मारहाणीनंतर

Andheri Subway: अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी मिलन सब वेच्या पाच पटीने करावे लागणार काम

तरीही प्रशासनाला शंभर टक्के नाही शाश्वती तब्बल ५०० ते ६०० कोटी रुपये खर्च करून ५० टक्केच मिळणार दिलासा मुंबई

BMC News : ...म्हणून खड्डे बुजवण्याच्या कंत्राटांना स्थगिती

कंत्राटातील दर कमी करण्यासाठी स्थायी समितीने सहा प्रस्ताव फेरविचारासाठी पाठवले पश्चिम उपनगरातील खड्डयांच्या

Water Supply : टोकावरच्या आणि उंचावरच्या वस्त्यांना टँकरद्वारे अतिरिक्त पाणी पुरवठा करा

महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरात १० टक्के पाणी

BMC School : महापालिका शाळेत गणिताचा गुरुवार, सायन्सचा सोमवार उपक्रम

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १३३ शाळांचा आणि सर्व प्रशासकीय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांचा गौरव मुंबई (विशेष

Water Shortage : भविष्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात पाणीपुरवठ्याचे नियोजन करा, अशी मागणी

स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांची मागणी मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात यंदाच्या मान्सून हंगामाच्या