मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa Highway) प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पुलांच्या कामांमुळे वाहतूक कोंडी आणि प्रवासातील अडचणी वाढल्या होत्या. मात्र आता रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, पाली आणि लांजा येथील तीन महत्त्वाच्या पुलांची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून, हे पूल लवकरच वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि मुंबई-गोवा मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Mumbai-Goa Highway)
संगमेश्वर पुलावर दोन्ही बाजूंनी वाहतुकीची तयारी :
मुंबई : देशभरात इंधनाची वाढती मागणी आणि संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने डिझेलच्या साठेबाजी आणि काळाबाजारावर लगाम घालण्यासाठी ...
पाली पूल १७ जूनपासून सुरू :
रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून १७ जूनपासून हा पूल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे. या पुलामुळे महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होणार असून रत्नागिरी-गोवा दरम्यानचा प्रवासही अधिक जलद होईल. (Mumbai-Goa Highway)
लांजा उड्डाणपूल जुलैअखेर पूर्ण :
लांजा शहरातील बाजारपेठेतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. ३१ जुलैपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यानंतर स्थानिक आणि महामार्गावरील वाहतूक स्वतंत्रपणे हाताळणे शक्य होणार आहे. (Mumbai-Goa Highway)
पुणे : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आणि पालखी सोहळा (Palkhi Sohala) २०२६ च्या पार्श्वभूमीवर पुण्यात महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा पुणे ...