Kalyan ST Bus : आगार स्थलांतरामुळे एसटी प्रवाशांचे हाल; सहा महिन्यांपासून विठ्ठलवाडीपर्यंतच प्रवास

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्प आणि उड्डाणपूल बांधकामामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच मुख्य एसटी आगाराचे तात्पुरते स्थलांतर विठ्ठलवाडी येथे करण्यात आल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या हजारो प्रवाशांना गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.


कल्याण पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता थेट एसटी आगारात उतरता येत नसून अनेक बसगाड्या पत्रीपूल, नेतिवली नाका किंवा सूचक नाका परिसरातच प्रवाशांना उतरवत आहेत. परिणामी सामानासह प्रवास करणाऱ्या नागरिकांना अतिरिक्त खर्च आणि त्रास सहन करावा लागत आहे.



रिक्षासाठी मोजावे लागतात अतिरिक्त पैसे :


एसटी बसमधून अर्ध्या रस्त्यात उतरवल्यानंतर प्रवाशांना कल्याण रेल्वे स्थानक किंवा शहरातील अन्य भागात पोहोचण्यासाठी रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. यासाठी १०० ते १५० रुपये भाडे आकारले जात असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. विशेषतः कोकण, अहिल्यानगर, बीड, उस्मानाबाद आणि इतर दूरवरच्या भागांतून येणाऱ्या प्रवाशांकडे मोठ्या प्रमाणात सामान असते. अशा वेळी अर्ध्या रस्त्यात उतरावे लागल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.



पाच वर्षांपासून प्रकल्प रखडला :


होणार होते मात्र ते अजून सुरु झालेले नाही.कल्याण स्टेशन परिसरातील 'सॅटीस' आणि परिसर विकास प्रकल्पाचे काम २०२१ पासून सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत एसटी आगाराचे आधुनिकीकरण आणि बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र, पाच वर्षे उलटूनही प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. 



बाहेरगावच्या गाड्यांना प्रवेशबंदी :


अहिल्यानगर, बीड, धाराशिव, कोकण आणि अन्य भागांतून येणाऱ्या एसटी बसला सध्या कल्याण डेपोमध्ये प्रवेश दिला जात नाही. या बसगाड्या गोविंदवाडी किंवा पत्रीपूल मार्गे थेट विठ्ठलवाडी आगारात पाठवल्या जातात. यामुळे कल्याण पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना मधल्या मार्गात उतरावे लागते आणि त्यानंतर खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते.



डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा :


आगार व्यवस्थापक चेतन देवधर यांनी सांगितले की, कल्याण आगाराचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. प्रशासनाने डिसेंबर २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले असून त्यानंतर प्रवाशांना पुन्हा कल्याण आगारातूनच सेवा उपलब्ध होईल. तोपर्यंत मात्र हजारो एसटी प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case : ...अखेर खेळ उलटला! केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया-चेतनला दिलासा, कोर्टाने मागणी फेटाळली

सिया चेतनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, पोलिसांची मागणी फेटाळली पुणे : केतन अग्रवाल हत्या (Ketan Agrawal Murder Case) प्रकरणात

Sassoon Dock : फिनलँडच्या कंपन्यांच्या सहकार्याने होणार ससून डॉकचे आधुनिकीकरण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री नितेश राणे यांच्यात बैठक

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक ससून डॉकचे (Sassoon Dock) डिजिटायझेशन आणि आधुनिकीकरण करून त्याला जागतिक दर्जाचे व

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून

Ambenali Ghat : आंबेनळी घाट ६ जुलैपर्यंत वाहनांसाठी बंद

अलिबाग : आंबेनळी घाट हा भूस्खलन, दरड कोसळणे आणि दगड घसरण्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून ही बाब लक्षात घेऊन

Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या