Kalyan ST Bus : आगार स्थलांतरामुळे एसटी प्रवाशांचे हाल; सहा महिन्यांपासून विठ्ठलवाडीपर्यंतच प्रवास

कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्प आणि उड्डाणपूल बांधकामामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच मुख्य एसटी आगाराचे तात्पुरते स्थलांतर विठ्ठलवाडी येथे करण्यात आल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या हजारो प्रवाशांना गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.


कल्याण पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता थेट एसटी आगारात उतरता येत नसून अनेक बसगाड्या पत्रीपूल, नेतिवली नाका किंवा सूचक नाका परिसरातच प्रवाशांना उतरवत आहेत. परिणामी सामानासह प्रवास करणाऱ्या नागरिकांना अतिरिक्त खर्च आणि त्रास सहन करावा लागत आहे.



रिक्षासाठी मोजावे लागतात अतिरिक्त पैसे :


एसटी बसमधून अर्ध्या रस्त्यात उतरवल्यानंतर प्रवाशांना कल्याण रेल्वे स्थानक किंवा शहरातील अन्य भागात पोहोचण्यासाठी रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. यासाठी १०० ते १५० रुपये भाडे आकारले जात असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. विशेषतः कोकण, अहिल्यानगर, बीड, उस्मानाबाद आणि इतर दूरवरच्या भागांतून येणाऱ्या प्रवाशांकडे मोठ्या प्रमाणात सामान असते. अशा वेळी अर्ध्या रस्त्यात उतरावे लागल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.



पाच वर्षांपासून प्रकल्प रखडला :


होणार होते मात्र ते अजून सुरु झालेले नाही.कल्याण स्टेशन परिसरातील 'सॅटीस' आणि परिसर विकास प्रकल्पाचे काम २०२१ पासून सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत एसटी आगाराचे आधुनिकीकरण आणि बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र, पाच वर्षे उलटूनही प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. 



बाहेरगावच्या गाड्यांना प्रवेशबंदी :


अहिल्यानगर, बीड, धाराशिव, कोकण आणि अन्य भागांतून येणाऱ्या एसटी बसला सध्या कल्याण डेपोमध्ये प्रवेश दिला जात नाही. या बसगाड्या गोविंदवाडी किंवा पत्रीपूल मार्गे थेट विठ्ठलवाडी आगारात पाठवल्या जातात. यामुळे कल्याण पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना मधल्या मार्गात उतरावे लागते आणि त्यानंतर खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते.



डिसेंबर २०२६ पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा :


आगार व्यवस्थापक चेतन देवधर यांनी सांगितले की, कल्याण आगाराचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. प्रशासनाने डिसेंबर २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य दिले असून त्यानंतर प्रवाशांना पुन्हा कल्याण आगारातूनच सेवा उपलब्ध होईल. तोपर्यंत मात्र हजारो एसटी प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

Ind Vs Pak Womens T-20 World Cup : भारतीय संघाला सलामीच्या लढतीत पाकिस्तानचे आव्हान; संघात मोठे बदल होण्याची शक्यता

बर्मिंगहॅम : भारतीय महिला संघ रविवारी(१४ जून)आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. गट

Raja Shivaji : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर किती कमाई झाली ?

Raja Shivaji Final Box Office Collection: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या धमाकेदार चित्रपटांची मेजवानी एकामागोमाग एक पहायला मिळत आहे. 'राजा

Shubham Gill & Sheryas Iyer : शिखर धवनचा विक्रम धोक्यात! शुभमन गिल-श्रेयस अय्यरसमोर इतिहास रचण्याची संधी

धर्मशाला: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील वनडे मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल आणि स्टार फलंदाज श्रेयस

Supriya Sule : काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही

मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांनी सध्या

Ind vs Afg : भारत- आफगाणिस्तान पहिल्या वनडेत ओवर कट-ऑफ जाहीर

धर्मशाला: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द

Sheetal Mhatre : सिद्धिविनायक मंदिराच्या पुनर्विकासात देऊबाई पाटील यांच्या स्मृती जपण्याची मागणी

शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मागणी न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्याकडे पत्राद्वारे