बर्मिंगहॅम : भारतीय महिला संघ रविवारी(१४ जून)आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. गट १ च्या पहिल्या सामन्यात त्यांची टक्कर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. या जागतिक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही स्पर्धात्मक चुरस दिसत नाही. पाकिस्तान विरुद्ध भारताची आधीची कामगिरी चांगली आहे, पण हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ कोणतीही चूक न करता विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
पाकिस्तानवर भारताचा दबदबा
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 16 टी-२० सामने खेळले गेले आहेत. यात भारतीय महिला संघाने १३ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत. टी- २० विश्वचषकाच्या इतिहासातील या दोन्ही संघात आठ सामने झाले आहेत. भारताने सहा वेळा विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानने केवळ दोनदा वेळा विजय मिळवला आहे. याआधी २०२४ च्या टी-२० विश्वचषकातही भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक सामना झाला होता. या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर सहा विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.(IND VS AFG)
धर्मशाला: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील वनडे मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल आणि स्टार फलंदाज श्रेयस अय्यर या दोघांकडे शिखर धवनचा सर्वात ...
भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध सलामीवीर स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांच्याकडून एका भक्कम सुरुवातीची अपेक्षा करत असेल. फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८२ धावा केल्यानंतर, मंधानाने पुढील सहा सामन्यांमध्ये १३, १२, ३७, ०, ३२ आणि ८ धावा केल्या. शफालीने जोहान्सबर्गमध्ये ६४ धावा केल्यानंतर, पुढील पाच सामन्यांमध्ये ९, ४, २, २२ आणि ११ धावा केल्या. हरमनप्रीत कौरने दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध अर्धशतके झळकावून पुनरागमन केले होते. जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष आणि भारती फुलमाली यांच्यावरही धावा करण्याची जबाबदारी असेल. भारत या सामन्यासाठी भारतीला अंतिम ११ क्रिकेटपटूंमध्ये स्थान देण्याची शक्यता आहे.
धर्मशाला: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान आणि भारत ...
गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली, भारत सलग दुसऱ्या आयसीसी विजेतेपदाच्या शोधात आहे. पाकिस्तानविरुद्धही भारताची कामगिरी उत्कृष्ट आहे आणि ही लय कायम ठेवणे संघासाठी फायदेशीर ठरेल. भारताच्या पहिल्या सामन्यातील विजयामुळे त्यांचे मनोधैर्य वाढेल. भारतीय संघ एका कठीण गटात आहे, ज्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसारखे बलाढ्य संघ आहेत. भारतासाठी दिलासादायक बाब ही आहे की, गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघातील बहुतेक क्रिकेटपटू या टी-२० विश्वचषक संघातही आहेत. भारतीय संघ आपल्या अंतिम ११ क्रिकेटपटूंमध्ये मोठे बदल करण्याची शक्यता कमी आहे.
मुंबई : मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्या आणि सार्वजनिक रस्त्यांवर जैन धर्मगुरूंच्या येण्या-जाण्यासाठी मारण्यात येणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यांवरून आता ...
भारताची संभाव्य प्लेइंग -११
शेफाली वर्मा, स्मृती मंधना, यास्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, श्री चरणी, क्रांती गौड.