Sharad Pawar : काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव शरद पवारांनी आधीच दिला होता!

नाना पटोलेंचा दावा; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून मात्र इन्कार


मुंबई : एकीकडे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबाबत खळबळजनक दावा केला आहे. "राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव खुद्द शरद पवार यांनी याआधीच दिला होता," असे ते म्हणाले. मात्र, नाना पटोलेंचा हा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी फेटाळून लावला असून विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या पटलावर नसल्याचे स्पष्ट केले आहे. या वादामुळे मविआतील अंतर्गत सुंदोपसुंदी आणि दोन्ही पक्षांमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.



काँग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला पाचारण केले आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी मुंबई विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले यांनी शरद पवारांचा संदर्भ देत मोठा दावा केला. पटोले म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव ऑलरेडी पवार साहेबांनी दिला होता. मात्र, काही तांत्रिक किंवा राजकीय कारणांमुळे त्यावर निर्णय घेण्यास उशीर झाला. आज देशातील घटनात्मक व्यवस्था धोक्यात आली असून धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन रोखण्यासाठी, तसेच देश आणि संविधान वाचवण्यासाठी सर्व सेक्युलर पक्षांनी एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे." पटोले यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.


नाना पटोलेंच्या या दाव्यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यावर तीव्र आक्षेप घेत विलीनीकरणाची शक्यता फेटाळून लावली. शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, "काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा कोणताही प्रस्ताव शरद पवार यांच्याकडून देण्यात आलेला नाही आणि काँग्रेसकडूनही असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. जर असा काही विषय असता, तर नक्कीच पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून आम्हाला त्याची कल्पना दिली गेली असती."



बुधवारी सकाळी शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीचा हवाला देत शिंदे म्हणाले, "या बैठकीत विलीनीकरणाच्या कोणत्याही प्रस्तावावर शरद पवार यांनी आमच्याशी चर्चा केलेली नाही. माझ्यापर्यंत अशी कोणतीही अधिकृत माहिती आलेली नसल्याने समोर आलेल्या वृत्तामध्ये काडीचेही तथ्य नाही", असे शिंदे यांनी सांगितले.

आता सर्वच नेत्यांना 'शहाणपण' सुचले - अंकुश काकडे


- दरम्यान, या वादावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनीही पक्षाची भूमिका स्पष्ट करताना काँग्रेसला टोला लगावला आहे. काकडे म्हणाले, "संविधान वाचवण्यासाठी सर्व डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, यात दुमत नाही. पण काँग्रेसने राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला आहे या चर्चेत तथ्य नाही. असा प्रस्ताव जेव्हा येईल तेव्हा वरिष्ठ नेते त्यावर निर्णय घेतील."
- "अलीकडच्या काळातील दोन-तीन निवडणुकांमुळे आता सर्वच पक्षाच्या नेत्यांना 'शहाणपण' सुचले आहे. मग ते राहुल गांधी असोत, ममता बॅनर्जी असोत किंवा अन्य कोणी... सगळेच राजकारणात तावून सुलाखून निघाले आहेत. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे असले, तरी विलीनीकरणाची कोणतीही घाई आमच्या बाजूने नाही," असे काकडे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

PM Modi : पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान ताकाईची यांनी मारुती सुझुकी खरखोडा प्लांटचे केले उद्घाटन

नवी दिल्ली : भारतातील वाहन उद्योगात गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठी गुंतवणूक आता प्रत्यक्षात साकार झाली आहे.

India Japan relations : भारत-जपान दरम्यान महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : भारत आणि जपान यांच्यात आज महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही

Cyber Threat : इस्रो मुख्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

बंगळुरू : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने शहरात खळबळ उडाली

Indian Navy : एडनच्या आखातात भारतीय नौदलाची मोठी कारवाई; समुद्री चाच्यांचा हल्ला हाणून पाडला

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने पुन्हा एकदा समुद्रातील आपली ताकद सिद्ध करत मोठ्या समुद्री चाचेगिरीचा प्रयत्न हाणून

Delhi Police : दिल्लीत मोठ्या हल्ल्याचा कट उधळला, आयएसआयशी संबंधित ४ दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : एका मोठ्या आंतरराज्यीय कारवाईत, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानची(Pakistan) गुप्तचर संस्था

Supreme Court : 'एआय विनाशकारी; मानवी हस्तक्षेप आवश्यक' - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याबाबत सावधगिरीचा