Ashok Kharat Case : 'या' सरकारी वकिलाच्या एंट्रीने अशोक खरातला फुटला घाम ! आता खरातची सुटका नाहीच

Ashok Kharat Case : नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राला अशोक खरात प्रकरणाने हादरवून सोडले आहे. आता याच अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरात प्रकरणात अंधश्रद्धा विरोधी खटल्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम (Adv. Ujjwal Nikam) यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सोबतच अहिल्यानगरचे अनुभवी फौजदारी वकील परिमल फळे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे खरातची आता सुटका नाहीच अशी चर्चा शहरात रंगली आहे.



आता खरातची सुटका नाहीच !


अशोक खरात सध्या पोलीस आणि ईडीच्या ताब्यात आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkarwada Police Station दाखल झालेल्या एकूण ८ वेगवेगळ्या गुन्ह्यांचे कामकाज आता ॲड. उज्ज्वल निकम स्वतः पाहणार आहेत. यासाठी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी अहिल्यानगरचे अनुभवी फौजदारी वकील परिमल फळे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अशोक खरात प्रकरणातील खटल्याला आता अधिक धार प्राप्त झाली असून संपूर्ण राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.



मानधनाचा खर्च गृह विभाग उचलणार


या खटल्यात ॲड. उज्ज्वल निकम यांना सहकार्य करण्यासाठी राज्य शासनाने ॲड. परिमल फळे यांची ‘सहाय्यक विशेष सरकारी वकील’ म्हणून नियुक्ती केली आहे. दोन्ही वकिलांच्या मानधनाचा (फी) खर्च राज्य शासनाचा गृह विभाग उचलणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने ११ जून २०२६ ला या नियुक्तीची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. राज्य सरकारच्या वतीने कक्ष अधिकारी राजेश मांजरेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, अशोक खरातविरोधातील न्यायालयीन प्रक्रियेत सरकारची बाजू प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी निकम-फळे या जोडीवर सोपविण्यात आली आहे.



परिमल फळे फौजदारी कायद्यातील अनुभवी वकील


वकील परिमल फळे हे फौजदारी कायद्यातील अनुभवी वकील म्हणून ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी ॲड. उज्ज्वल निकम यांचयासोबत काम केलेले आहे. त्यामुळे वकील फळे यांचा अनुभवही तगडा आहे. ॲड. फळे यांनी यापूर्वी राहुरी येथील आढाव वकील दाम्पत्य हत्या प्रकरण, नेवासे येथील वकील रियाज पठाण हत्या प्रकरण यांसारख्या गाजलेल्या खटल्यांमध्ये त्यांनी वकील उज्ज्वल निकम यांच्यासोबत सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली होती. याशिवाय रेखा जरे खून प्रकरण, संदीप वारळ हत्या प्रकरणासह अनेक चर्चित खटल्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.



भोंदू खरातवर गंभीर गुन्ह्यांची नोंद


अशोक खरातवर वेगवेगळे गुन्हे दाखल असून सध्या तो कोठडीत आहे. त्याच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात एकापाठोपाठ ८ वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे. त्याच्यावर या ८ गुन्ह्यांमध्ये बलात्कार, गुंगीकारक औषध देणे, फसवणूक, जादूटोणा विरोधी कायदा आणि फार्महाऊसवर पिस्तूल व जिवंत काडतुसे सापडल्यामुळे आर्म्स ॲक्ट अशा विविध कडक कलमांचा समावेश आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे. सरकारवाडा पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.

Comments
Add Comment

Gold and Silver : सोनं-चांदी होणार स्वस्त ? सरकारचा मोठा निर्णय; आयात शुल्कात बदलामुळे दरांवर काय परिणाम ?

Gold and Silver : सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने आज म्हणजेच १२ जून २०२६ रोजी

External Affairs Minister : अमेरिकेची दुटप्पी धोरणे आणि भारताचे ऊर्जा धोरण; परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट मांडली भूमिका

NEW DELHI : रशियाकडून केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीवरून पाश्चात्य देशांकडून होणाऱ्या टीकेला परराष्ट्र

Dating App Fraud : अ‍ॅपच्या नादात महिला फसली प्रेमाच्या जाळ्यात

नवी दिल्ली : मैत्री, नातेसंबंध आणि प्रेम याला अनेकांच्या आयुष्यात प्रचंड महत्त्व असते. काहींना ते सहज मिळते तर

Mantri Nitesh Rane : कोकणातील तीर्थस्थळे जलमार्गांनी जोडणार!

मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; आंगणेवाडी, कुणकेश्वर, गणपतीपुळे, पाली बल्लाळेश्वर मंदिराचा समावेश मुंबई :

Kane Williamson Retirement : न्यूझीलंड क्रिकेटला मोठा धक्का ! केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, 16 वर्षांच्या सुवर्ण कारकिर्दीला पूर्णविराम

मुंबई : जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक केन विल्यमसनने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

Konkan Railway : गणेशोत्सवासाठी आताच तयारीला लागा ! कोकण रेल्वेचे कधी सुरू होणार आरक्षण ?

मुंबई : यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्यामुळे ११, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी गावी पोहोचू इच्छिणाऱ्यांची