JALGAON CRIME : लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर दोन वर्षे अत्याचार; संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

JALGAON: लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीवर गेल्या दोन वर्षांपासून जळगाव आणि धुळे परिसरात शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ट्रकचालक शाहीद शेख फारुख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, संशयित सध्या फरारी आहे.




काय आहे प्रकरण?


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची धुळे येथील रहिवासी असून ती जळगावात एका नातेवाइकाकडे आली होती. याच दरम्यान सुप्रीम कॉलनीतील रहिवासी असलेल्या शाहीद शेख फारुख याची तिच्याशी ओळख झाली. शाहीदने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून विश्वासात घेतले. १७ एप्रिल २०२४ ते १ मे दरम्यान संशयिताने पीडितेस जळगाव आणि धुळ्यातील विविध ठिकाणी, तसेच देवपूरमधील एका भाड्याच्या खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला.



लग्नाला नकार आणि फसवणूक


गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. दरम्यान, तरुणीने शाहीदकडे लग्नाचा तगादा लावला, तेव्हा त्याने लग्नास स्पष्टपणे नकार दिला आणि पीडितेसोबत वाद घालत तिला मारहाण केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने सोमवारी (ता. ८) एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.



दोघेही विवाहित?


या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, संशयित आरोपी शेख शाहीद फारुख हा आधीच विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. तसेच, तक्रारदार पीडित तरुणीचेही लग्न झालेले असून तिला दोन अपत्ये असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.



पोलिसांचा तपास सुरू


पीडितेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आरोपी शाहीद शेख फारुख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर संशयित आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे करत आहेत.

Comments
Add Comment

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले असून या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

Mahabaleshwar Heavy Rainfall : महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला

- प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; गावाला कोणताही धोका नाही - नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू

पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पंढरपूर : पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासाच्या

Onion Farmers : केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांना दिलासा

सरकारी खरेदीदरात १३ टक्क्यांनी वाढ; प्रति क्विंटल २ हजार १२५ रुपये दर निश्चित मुंबई : कांदा उत्पादक

Ratnagiri News : धक्कादायक! दिड वर्षांच्या चिमुकल्यासह आईने मारली मांडवी एक्सप्रेसमधून उडी

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक (Ratnagiri News) अत्यंत धक्कादायक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

Jalna Bus Accident : जालना-बीड महामार्गावर भीषण अपघात! दोन एसटी बसची समोरासमोर धडक; चालकांसहअनेक प्रवासी जखमी

जालना : जालना-बीड महामार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. अंबड तालुक्यातील शहापूरजवळ गल्हाटी नदीच्या पुलावर