Chhatrapati Sambhajinagar : १५ वर्षांचं प्रेम अवघ्या ७ दिवसांत संपलं; नवविवाहितेचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर शहरात डोळ्यात टचकन पाणी येईल अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.लग्नानंतर अवघ्या सात दिवसांतच एका नवविवाहितेचा अचानक चक्कर येऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटने नंतर नववधू आणि मुलीकडच्या माहेरची मंडळी आणि मित्रपरिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



मिळलेल्या माहिती नुसार :
मृत नवविवाहितेचे नाव दीपाली लिनहार आहे.दीपाली आणि संदीप खंडाळे हे गेल्या 15 वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दोन्ही कुटुंबाकडून या लग्नासाठी विरोध होता पण दीपाली आणि संदीप यांनी एकमेकांची साथ सोडली नाही. त्यांनी आपल्या कुटुंबाची समजूत काढली त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 4 जून रोजी अत्यंत उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात त्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. १५ वर्षाच्या प्रेमाचं रूपांतरण लग्नात झालं दोन्ही बाजूंचे मित्रपरिवार आणि नातेवाईक खूप खुश होते पण काळाने घात केला आणि दोन्ही कुटुंबियांना मोठा धक्का बसला.



माहेरीचं झाला घात
लग्न सुरळीतपणे पार पडलं मुलीचं थाटामाठात सासरी स्वागत झालं. लग्ना नंतरच्या सर्व विधी पार पडल्या आणि दीपाली पाचपरतवनासाठी आपल्या माहेरी आली. संध्याकाळच्या सुमारास दीपाली बाथरूममध्ये गेली असताना अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली.कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न लावता तिला तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचाराआधी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. काही दिवसापूर्वी ज्या घरात आनंदाचं आणि खेळीमेळीच वातावर होत तिथे आता फक्त आणि फक्त आक्रोश आणि हुंदके ऐकू येत आहेत. काळाने दिपालीला हिरावून नेले. नव्या आयुष्याची खऱ्या अर्थाने सुरुवात होण्यापूर्वीच हा आनंदाचा प्रवास इतक्या दुर्दैवी वळणावर जाऊन थांबेल असं कोणालाही वाटलं नव्हतं.

Comments
Add Comment

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले असून या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

Mahabaleshwar Heavy Rainfall : महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला

- प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; गावाला कोणताही धोका नाही - नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू

पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पंढरपूर : पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासाच्या

Onion Farmers : केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांना दिलासा

सरकारी खरेदीदरात १३ टक्क्यांनी वाढ; प्रति क्विंटल २ हजार १२५ रुपये दर निश्चित मुंबई : कांदा उत्पादक

Ratnagiri News : धक्कादायक! दिड वर्षांच्या चिमुकल्यासह आईने मारली मांडवी एक्सप्रेसमधून उडी

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक (Ratnagiri News) अत्यंत धक्कादायक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

Jalna Bus Accident : जालना-बीड महामार्गावर भीषण अपघात! दोन एसटी बसची समोरासमोर धडक; चालकांसहअनेक प्रवासी जखमी

जालना : जालना-बीड महामार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. अंबड तालुक्यातील शहापूरजवळ गल्हाटी नदीच्या पुलावर