सव्वा महिन्याच्या संसाराचा हृदयद्रावक शेवट, पोटाला दगड बांधला अन्…

Yavatmal News : यवतमाळमध्ये प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित जोडप्याचा हृदयद्रावक शेवट झाला आहे. पोटाला दगड बांधून दोघांनी विहिरीत उडी घेतली. आशिष आणि करिष्मा धानोरकर या दाम्पत्याच्या जीवनाचा असा हृदयद्रावक शेवट होईल कदाचित असे कोणालाही वाटले नसावे. या घटनेनं परिसर हादरला असून हळहळ व्यक्त होत आहे.




पोटाला दगड बांधून विहिरीत उडी


यवतमाळमध्ये प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित जोडप्याने अवघ्या सव्वा महिन्याच्या संसारानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यासाठी या दाम्पत्याने पोटाला दगड बांधून विहिरीत उडी घेतली. अवघ्या सव्वा महिन्यातच त्यांनी जीवनाची अखेर केली. दोघांनीही विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेनेमुळे यवतमाळ हादरलं असून एकच खळबळ उडाली आहे.


सोमवारी रात्रीच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे ही धक्कादायक घटना घडली. आशिष रमेश धानोरकर (Ashish Ramesh Dhanorkar) आणि करिष्मा आशिष धानोरकर (Karishma Ashish Dhanorkar) असं या दाम्पत्याचं नाव आहे. या दोघांनीही टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दोघेही सुस्वभावी होते. सर्वांशी हसून बोलायचे. मेहनती होते, त्यांनी असा टोकाचा निर्णय घ्यायला नको होता, असं स्थानिक म्हणत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आशिष (Ashish Ramesh Dhanorkar) हा एकुलता एक होता.




प्रेमविवाह अन सव्वा महिन्याच्या संसाराचा शेवट


आशिष आणि करिष्मा हे दोघेही कॅटरर्सच्या कामात एकत्र मजूर म्हणून काम करत होते. याचवेळी दोघेही प्रेमात पडले. प्रेमात पडलेल्या या जोडप्याने 4 मे 2026 रोजी लग्न केलं. लग्न होईल की नाही ही धाकधूक असताना दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून एकमेकांना कायमची साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र सोमवारचा दिवस दोघांच्याही आयुष्यात शेवटचा ठरला.


सोमवारी हे दोघेही वणीला जाण्याचे सांगून घराबाहेर पडले. मात्र त्यांनी सगणापूर शिवारातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. दोघांनीही नवरगाव शिवारातील अनिल झाडे यांच्या शेतात आल्यावर पोटाला दगड बांधून विहिरीत उडी घेतली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र हा घातपात आहे का ? असाही संशय अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



दरम्यान, झाडेंच्या शेतात मृतदेह आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली अन् अख्खा गाव विहिरीभोवती जमा झाला. विहिरीच्या बाजूला मोटारसायकल आणि दोघांच्या चपला होत्या. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Pune Traffic Update : पुणे पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत बदल, जिल्हाधिकाऱ्यांकडून पर्यायी मार्गांची घोषणा

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ८ जुलै २०२६ रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या

Thailand Job Scam : राज्यातील २५ तरुण थायलंड-म्यानमार सीमेवर अडकले

- सुटकेसाठी राज्य सरकार सक्रिय; मुख्यमंत्र्यांकडून गिरीश महाजन यांच्याकडे जबाबदारी मुंबई : फेसबुकवरील आकर्षक

National Health Mission : NHMच्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; 10 वर्षांहून अधिक सेवेनंतर समायोजनाचा मार्ग मोकळा

१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत

Nashik Pune High Speed Rail : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी १ जुलैला मुख्यमंत्र्यांची बैठक; केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक मुंबई : नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे

Navnath ban : "राष्ट्र प्रथम" विचारसरणीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; काँग्रेससोबत जाणारे राऊतच खरे 'महाराष्ट्रद्रोही': भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Harit Maharashtra : राज्यात ११ कोटी वृक्ष लागवडीसाठी नियोजनावर भर; मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

मुंबई : राज्यात यंदा ११ कोटी वृक्ष लागवडीचे (Tree Plantation) उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून हे लक्ष्य वेळेत पूर्ण