सव्वा महिन्याच्या संसाराचा हृदयद्रावक शेवट, पोटाला दगड बांधला अन्…

Yavatmal News : यवतमाळमध्ये प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित जोडप्याचा हृदयद्रावक शेवट झाला आहे. पोटाला दगड बांधून दोघांनी विहिरीत उडी घेतली. आशिष आणि करिष्मा धानोरकर या दाम्पत्याच्या जीवनाचा असा हृदयद्रावक शेवट होईल कदाचित असे कोणालाही वाटले नसावे. या घटनेनं परिसर हादरला असून हळहळ व्यक्त होत आहे.




पोटाला दगड बांधून विहिरीत उडी


यवतमाळमध्ये प्रेमविवाह केलेल्या नवविवाहित जोडप्याने अवघ्या सव्वा महिन्याच्या संसारानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यासाठी या दाम्पत्याने पोटाला दगड बांधून विहिरीत उडी घेतली. अवघ्या सव्वा महिन्यातच त्यांनी जीवनाची अखेर केली. दोघांनीही विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेनेमुळे यवतमाळ हादरलं असून एकच खळबळ उडाली आहे.


सोमवारी रात्रीच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे ही धक्कादायक घटना घडली. आशिष रमेश धानोरकर (Ashish Ramesh Dhanorkar) आणि करिष्मा आशिष धानोरकर (Karishma Ashish Dhanorkar) असं या दाम्पत्याचं नाव आहे. या दोघांनीही टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. दोघेही सुस्वभावी होते. सर्वांशी हसून बोलायचे. मेहनती होते, त्यांनी असा टोकाचा निर्णय घ्यायला नको होता, असं स्थानिक म्हणत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आशिष (Ashish Ramesh Dhanorkar) हा एकुलता एक होता.




प्रेमविवाह अन सव्वा महिन्याच्या संसाराचा शेवट


आशिष आणि करिष्मा हे दोघेही कॅटरर्सच्या कामात एकत्र मजूर म्हणून काम करत होते. याचवेळी दोघेही प्रेमात पडले. प्रेमात पडलेल्या या जोडप्याने 4 मे 2026 रोजी लग्न केलं. लग्न होईल की नाही ही धाकधूक असताना दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून एकमेकांना कायमची साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र सोमवारचा दिवस दोघांच्याही आयुष्यात शेवटचा ठरला.


सोमवारी हे दोघेही वणीला जाण्याचे सांगून घराबाहेर पडले. मात्र त्यांनी सगणापूर शिवारातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. दोघांनीही नवरगाव शिवारातील अनिल झाडे यांच्या शेतात आल्यावर पोटाला दगड बांधून विहिरीत उडी घेतली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र हा घातपात आहे का ? असाही संशय अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



दरम्यान, झाडेंच्या शेतात मृतदेह आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली अन् अख्खा गाव विहिरीभोवती जमा झाला. विहिरीच्या बाजूला मोटारसायकल आणि दोघांच्या चपला होत्या. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Agriculture Minister Dattatreya Bharne : वादळी वाऱ्यामुळे बाधित फळपिकांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करा; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या

मुंबई : राज्यातील मे व जून २०२६ या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या

Maharashtra Kesari Sikandar Shaikh : ‘महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या थारचा भीषण अपघात!’ गाडीचा चक्काचूर; मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचाव

सांगली : महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी किताब पटकावून कुस्तीविश्वात स्वतःचा दबदबा निर्माण करणारा स्टार पैलवान

PM YOJANA : पंतप्रधान इंटर्नशिप योजना (PMIS); एनसीसी छात्रांसाठी सुवर्णसंधी

PUNE : राष्ट्रीय छात्र सेना (NCC) महाराष्ट्र संचालनालयाने 'पंतप्रधान इंटर्नशिप योजना' (PMIS) अंतर्गत राज्यातील एनसीसी

Sikandar Shaikh car accident : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखच्या गाडीचा भीषण अपघात; थारचा चक्काचूर, पैलवान थोडक्यात बचावला

सोलापूर : सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर सांगोला-मिरज (Miraj) मार्गावर महाराष्ट्रातील नामांकित कुस्तीपटू

Jalgoan : जळगावात एफडीएची मोठी कारवाई ! २१ लाखांचा गुटखा जप्त

Jalgoan : जळगाव जिल्ह्यात अवैध गुटखा तस्करीविरोधात ( Illegal gutka smuggling) अन्न व औषध प्रशासनाने मोठी धाडसी कारवाई केले आहे. या

MSRTC Student Pass : एसटीचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांच्या बस प्रवासाचा 'डिजिटल कायापालट'; आता कागदी पासची गरज नाही

Mumbai : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांसाठी एक