मुंबई: गेली अनेक वर्षे रखडलेल्या घोडबंदर येथील ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाचे काम आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) माध्यमातून वेगाने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.या संदर्भात मंत्रालयात पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पर्यटन सचिव संजय खंदारे, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्त राधा बिनोद शर्मा तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून घोडबंदर किल्ला व परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. घोडबंदर किल्ला, खाडी किनारा , त्या बाजूला स्काय वॉक अशा विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. घोडबंदर किल्ला परिसराचा विकास करुन पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने घोडबंदर किल्ल्याच्या पायथ्याशी ‘शिवसृष्टी’ उभारण्याचा प्रस्ताव मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता. त्यांनी या प्रस्तावाला मान्यता देत सुमारे ५० कोटी रुपये खर्चाच्या ‘शिवसृष्टी’ प्रकल्पास मंजुरी दिली होती.
मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब; अतिरिक्त १४ हजार कोटींचा भार पडणार मुंबई : २०१७ आणि २०१९ मधील कर्जमाफी योजनांमध्ये तांत्रिक अडचणी किंवा इतर ...