सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीचे चित्र गेल्या काही दिवसांपासून अपेक्षेप्रमाणे एकतर्फी वाटत होते. मात्र महाविकास आघाडीने ऐनवेळी उमेदवार बदलत साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते अभयासिंह जगताप यांना रिंगणात उतरवल्याने या निवडणुकीला अचानक रंगत आणि चुरस निर्माण झाली. या घडामोडीमुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडून आले असून दोन्ही आघाड्यांमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणूक गेल्या काही दिवसांपासून एकतर्फी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र महाविकास आघाडीने ऐनवेळी उमेदवार बदलत साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे नेते अभयासिंह जगताप यांना रिंगणात उतरविल्याने निवडणुकीला अचानक चुरस प्राप्त झाली आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या जगताप यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर नवीन आव्हान उभे राहिले असून दोन्ही बाजूंनी पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीने या मतदारसंघातून धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली आहे. कदम यांना भाजपचे वरिष्ठ नेते व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा पाठिंबा असल्याचे मानले जाते. उमेदवारी अर्ज दाखल करतानाही भाजप व महायुतीतील प्रमुख नेते त्यांच्या सोबत उपस्थित होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना H-1B व्हिसा (H-1B Visa) धोरणाबाबत मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे. बोस्टनमधील फेडरल न्यायालयाने नव्या H-1B व्हिसा ...
गेल्या आठवड्यापर्यंत महाविकास आघाडीने ही निवडणूक जवळपास सोडून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. सांगलीचे बाळासाहेब पाटील यांचे नाव पुढे असताना निवडणुकीत विशेष रंगत दिसत नव्हती. मात्र ऐनवेळी उमेदवार बदलून जगताप यांना संधी देण्यात आल्याने राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. विशेषतः सांगली आणि सातारा जिल्ह्यातील महायुतीमधील नाराज गटांना एकत्र आणून अधिकृत उमेदवाराविरोधात मतदान घडवून आणण्याची रणनीती महाविकास आघाडीने आखल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महायुतीतील गळती रोखण्यासाठी थेट मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. सोमवारी त्यांनी भाजपशी संबंधित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांतील मतदार प्रतिनिधींशी संवाद साधत पक्षनिष्ठेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. वैयक्तिक नाराजी, स्थानिक मतभेद किंवा पाहुणचाराच्या राजकारणाला बळी न पडता महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनाच मतदान व्हावे, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. कोणाचीही नाराजी असेल, तर ती दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू, मात्र मतदान पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच झाले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असल्याचे समजते.
Ashok Kharat : नाशिकमधील ( Nashik ) .भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महिलांची अंधश्रद्धेच्या नावाखाली कथित फसवणूक करणाऱ्या अशोक ...
महायुतीतील नाराजीचे केंद्र सातारा जिल्ह्यात अधिक असल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांच्याशी संपर्क ठेवून त्यांच्याशी संबंधित मतदारांना एकत्र ठेवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. तसेच शिंदे
Ashok Kharat : नाशिकमधील ( Nashik ) .भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. महिलांची अंधश्रद्धेच्या नावाखाली कथित फसवणूक करणाऱ्या अशोक ...