Devendra Fadnavis : गायमुख ते फाउंटन हॉटेलपर्यंत भुयारी मार्ग

- मुख्यमंत्र्यांची मंजुरी; भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्तारालाही मान्यता


मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने पायाभूत सुविधांचा 'मेगाप्लॅन' मंजूर केला आहे. घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यानचा भुयारी मार्ग, फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रोच्या मार्ग विस्ताराच्या एकूण २२ हजार ६११ कोटी रुपयांच्या विकास प्रस्तावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंगळवारी 'मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समिती'च्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर मुंबई-ठाणे परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.



मंत्रालयात पार पडलेल्या या उच्चस्तरीय बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मंजूर प्रस्तावानुसार, घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाउंटन हॉटेल दरम्यान ५.८६ किलोमीटर लांबीचा सहा पदरी भुयारी मार्ग (टनेल) तयार केला जाईल. तर फाउंटन हॉटेल ते भाईंदर दरम्यान ९.५८ किलोमीटर लांबीचा सहा पदरी उन्नत (एलिव्हेटेड) पूल उभारण्यात येणार आहे. या एकूण १७ हजार ३६ कोटींच्या प्रकल्पामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि पनवेल येथून येणारी वाहतूक थेट राष्ट्रीय महामार्ग-४८ ला जोडली जाईल. हा भुयारी मार्ग अत्याधुनिक 'टीबीएम' (टनेल बोरिंग मशीन) तंत्रज्ञानाचा वापर करून १४ मीटर व्यासाचा बांधला जाणार असून, पुढील पाच वर्षांत तो पूर्ण करण्याचे नियोजन आहे. वसई खाडीला समांतर जाणाऱ्या उन्नत पुलामुळे वाहनांना ताशी १०० किलोमीटर वेगाने धावणे शक्य होणार आहे.


घोडबंदर मार्गावरील जड वाहनांची कोंडी फोडण्यासाठी आणि गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक वळवण्यासाठी हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर 'बांधा-वापरा-हस्तांतरित करा' (बीओटी) मॉडेलनुसार केली जाईल. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून 'व्हायबिलिटी गॅप फंडिंग' उपलब्ध करून दिले जाईल. तसेच या प्रकल्प परिसरासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला 'विशेष नियोजन प्राधिकरण' म्हणून नियुक्त करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली.



नवी मुंबई मेट्रो विमानतळाला जोडणार


या बैठकीत सिडकोच्या ५ हजार ५७५ कोटी रुपयांच्या नवी मुंबई मेट्रोच्या दोन महत्त्वपूर्ण मार्ग विस्तारांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये 'मेट्रो मार्ग १ए' (सागर संगम ते सीबीडी बेलापूर) आणि 'मेट्रो मार्ग २' (पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल-४) यांचा समावेश आहे. या नव्या मंजुरीमुळे सागर संगम ते थेट नवी मुंबई विमानतळापर्यंत तब्बल २८ किलोमीटरचा सलग मेट्रो प्रवास प्रवाशांना करता येणार आहे. या विस्तारित मार्गांवर एकूण १३ नवीन स्थानके बांधली जाणार असून, भविष्यात दररोज सुमारे १२ लाख प्रवाशांना या वेगवान सेवेचा फायदा होईल.

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,