आंदोलक-सुरक्षा दल संघर्षात ३० ठार, २०० हून अधिक जखमी
रावलकोट : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. आंदोलनकर्ते आणि पाकिस्तानी सुरक्षा दल यांच्यात झालेल्या संघर्षात ३० जणांचा मृत्यू झाला असून २०० हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. महागाई, वाढती बेरोजगारी, वीजदरवाढ आणि राजकीय हक्कांच्या प्रश्नांवरून नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. स्थानिक प्रशासनाने जॉइंट आवामी ॲक्शन कमिटी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला मोर्चा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत बेकायदेशीर घोषित केला आणि त्यावर बंदी घातली. यानंतर आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष उफाळून आला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना H-1B व्हिसा (H-1B Visa) धोरणाबाबत मोठा न्यायालयीन धक्का बसला आहे. बोस्टनमधील फेडरल न्यायालयाने नव्या H-1B व्हिसा ...
गेल्या आठवड्यात रावळकोट येथे एका व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे प्रशासनाचा हात असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. रविवारी रात्री आंदोलकांनी रुग्णालय आणि शवगृहाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच चिघळली. पूँछ विभागाचे पोलिस अधीक्षक सरदार वाहिद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या गोळीबारात किमान सहा आंदोलकांचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला आणि विविध भागांत हिंसाचाराच्या घटना घडल्या.
दाम्बुला : सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या (१०१ धावा) शानदार शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या सांघिक आणि शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर भारत 'अ' संघाने ...
नागरिकांमध्ये मोठा असंतोष
सुरक्षा दलांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला असता आंदोलकांनी रायफल, पेट्रोल बॉम्ब आणि इतर शस्त्रांचा वापर करून प्रतिकार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मंगळवारी आंदोलन अधिक व्यापक स्वरूपात पसरल्यानंतर पोलिस, सुरक्षा दल आणि आंदोलक यांच्यात अनेक ठिकाणी चकमकी झाल्या. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये वाढती महागाई, वीज बिलांचा बोजा, बेरोजगारी आणि राजकीय अधिकारांबाबतची नाराजी यामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
नवी दिल्ली : दहशतवाद्यांचे मदतनीस शोधण्यासाठी एनआयएने पंजाब आणि हरियाणात एकूण अठरा ठिकाणी छापे टाकले. पाकिस्तानी दहशतवादी शहजाद भट्टीशी लागेबांधे ...
अनेक शहरांतील बाजारपेठा बंद
संघर्षानंतरचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये बरनाला, भिमबर आणि मीरपूर येथे मोठ्या प्रमाणात जमलेले आंदोलक दिसत आहेत. तसेच मुझफ्फराबाद येथे सुरक्षा दलांनी आंदोलकांवर अश्रुधूराच्या नळकांड्या फेकल्याचे दृश्यही समोर आले आहे. संघर्षानंतर वाढलेल्या तणावामुळे अनेक शहरांतील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या असून, काही भागांत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
MUMBAI: सोमवारी सकाळी दादर पश्चिममधील कोतवाल गार्डन (प्लाझा) जवळ बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला ...
मृतांचा आकडा वाढण्याची भीती
या हिंसक संघर्षात जवळपास ३० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मृतांमध्ये सामान्य नागरिकांसह सुरक्षा दलातील जवानांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. जखमींची संख्या २०० च्या पुढे गेली असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाकिस्तान प्रशासनाने संवेदनशील भागांत अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले असून संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण कायम आहे.