- इस्लामाबादमध्ये अनोळखी ठिकाणी जेवण केल्यानंतर काही वेळातच मृत्यू
इस्लामाबाद : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये लष्कर-ए-तैयबाचा (Lashkar-e-Taiba) वरिष्ठ कमांडर कारी सईद अब्दुल अजीज (Abdul Aziz) याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ८ ऑगस्ट रोजी एका मशिदीच्या गेटजवळ अचानक कोसळल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. अब्दुल अजीजचा २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Mumbai Terror Attack)
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, मशिदीत पोहोचण्यापूर्वी अब्दुल अजीजने एका अनोळखी ठिकाणी जेवण केले होते. त्यानंतर काही वेळातच तो मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचला. मात्र, तिथे अचानक तो जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
मुंबई : मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील शिस्तभंग आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. गेल्या सात महिन्यांत १२ पोलीस ...
मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट :
अब्दुल अजीजच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक प्रशासनाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले जात असून, विषप्रयोगाची शक्यताही नाकारण्यात आलेली नाही. अनोळखी ठिकाणी जेवण केल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाल्याने या शक्यतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्याला अचानक गंभीर वैद्यकीय समस्या निर्माण झाली असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. (Mumbai Terror Attack)
लष्कर-ए-तैयबामध्ये महत्त्वाची जबाबदारी :
कारी सईद अब्दुल अजीज हा लष्कर-ए-तैयबातील महत्त्वाचा सदस्य असल्याचे सांगितले जाते. २६/११ मुंबई हल्ल्यासह विविध दहशतवादी कारवायांच्या कटात त्याची भूमिका असल्याचा दावा करण्यात आला आहे. संघटनेमध्ये तो एका विशेष विभागाची जबाबदारी सांभाळत होता. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकींमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत पोहोचवणे आणि त्यांच्याशी संपर्क ठेवणे, अशी जबाबदारी या विभागाकडे असल्याचे सांगितले जाते. अब्दुल अजीजच्या अचानक झालेल्या मृत्यूने पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांवर लक्ष ठेवणाऱ्या गुप्तचर यंत्रणांचेही लक्ष वेधले आहे. (Mumbai Terror Attack)
नवी दिल्ली : झारखंडमध्ये परीक्षांमधील कथित अनियमिततेविरोधात सुरू असलेला वाद आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन रविवारी १६ व्या दिवशीही सुरूच राहिले. ...
पाकिस्तानमध्ये ३० हून अधिक लष्कर दहशतवादी ठार?
दरम्यान, गेल्या काही वर्षांत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या अनेक सदस्यांची अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या झाल्याचा दावा करण्यात आला आहे. लष्करशी संबंधित दहशतवादी रिझवान हनीफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्याचे वृत्त आहे. त्यात मागील ३ ते ४ वर्षांच्या काळात पेशावर, कराची, रावळपिंडी, रावळाकोट आणि मुजफ्फराबाद यांसारख्या भागांमध्ये लष्कर-ए-तैयबाचे ३० हून अधिक सदस्य अज्ञात हल्लेखोरांकडून मारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. (Mumbai Terror Attack)
अब्दुल अजीजच्या मृत्यूमागे नेमके काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी त्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. (Mumbai Terror Attack)