India-A vs Srilanka-A : दाम्बुलामध्ये भारताचा विजयी श्रीगणेशा, श्रीलंकेचा ८ धावांनी पराभव

दाम्बुला : सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या (१०१ धावा) शानदार शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या सांघिक आणि शिस्तबद्ध कामगिरीच्या जोरावर भारत 'अ' संघाने त्रिकोणी एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान श्रीलंका 'अ' संघाचा ८ धावांनी पराभव केला. शेवटच्या षटकांपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारताने दिलेल्या २७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव २६९ धावांवर संपुष्टात आला. या विजयासह भारताने मालिकेत २ गुणांची कमाई करत विजयी श्रीगणेशा केला आहे.दाम्बुलाच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर प्रभसिमरन सिंग (२) आणि वैभव सूर्यवंशी (१४) अवघ्या १६ धावांवर बाद झाले. त्यानंतर आलेला प्रियांश आर्य (३२) धावबाद झाला. ३ बाद ६९ अशी बिकट अवस्था असताना कर्णधार टिळक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी डावाची धुरा सांभाळली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी १५० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. ऋतुराज गायकवाडने ११४ चेंडूंत ६ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांच्या मदतीने १०१ धावांचे दिमाखदार शतक ठोकले. तर कर्णधार तिलक वर्माने ९७ चेंडूंत ६० धावांचे योगदान दिले. शेवटच्या ओव्हर्समध्ये आयुष बदोनी (२४) आणि सूर्यांश शेडगेने (नाबाद २६) केलेल्या वेगवान फलंदाजीमुळे भारताने ५० षटकांत ६ बाद २७७ धावांचे भक्कम आव्हान उभे केले. श्रीलंकेकडून मोहम्मदने सर्वाधिक २ बळी घेतले.


२७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या सलामीवीरांनी ९३ धावांची मजबूत भागीदारी करत भारताची चिंता वाढवली होती. निरोशन डिकवेला (४७) आणि अविष्का फर्नांडो (४५) यांनी वेगाने धावा कुटल्या. मात्र, आयुष बदोनीने या दोन्ही सेट फलंदाजांना बाद करत भारताला सामन्यात परत आणले. यानंतर मधल्या फळीत सदिरा समरविक्रमाने ४६ धावा केल्या.कर्णधार सहान आरचिगेने ७२ चेंडूंत ७४ धावांची कर्णधारी खेळी खेळत श्रीलंकेला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते, परंतु अंशुल कंबोजने त्याला बोल्ड करत श्रीलंकेच्या आशेवर पाणी फेरले. शेवटच्या षटकांमध्ये भारताने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचे शेवटचे ४ फलंदाज अवघ्या ७ धावांत बाद केले. श्रीलंकेचा पूर्ण संघ ४८.५ षटकांत २६९ धावांवर ढगाळला.
भारताकडून सर्वच गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. अर्शद खान, अनुकूल रॉय, आयुष बदोनी आणि विप्रज निगम यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेत श्रीलंकेला बॅकफूटवर ढकलले. तर अंशुल कंबोजने १ बळी घेतला. ऋतुराज गायकवाडने फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही चमक दाखवत एका महत्त्वपूर्ण धावबादमध्ये योगदान दिले.



धडाकेबाज सुरूवात मात्र...


या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू आणि आयपीएल स्टार वैभव सूर्ववंशीकडे सर्वांचे लक्ष होते. आयपीएलचा सीजन गाजवल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर वैभव कशी कामगिरी करतो याची उत्सुकता सर्वांना होती. मात्र वैभवला पहिल्या सामन्यात आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नाही. भारत अ फलंदाजी करत असताना वैभव सूर्यवंशी सलामीला खेळण्यासाठी आला. त्याने आल्या आल्या काही आकर्षक फटके मारले. त्याने १२ चेंडूत १४ धावा केल्या. त्याने तीन चौकार मारत धडाकेबाज सुरूवात केली. आता वैभव आयपीएलप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील दमदार कामगिरी करणार असे वाटत असतानाच श्रीलंका अ संघाचा गोलंदाज मोहम्मद शिराजने त्याची विकेट घेतली.(SPORTS)



थोडक्यात धावफलक:


भारत 'अ': ५० षटकांत २७७/६ (ऋतुराज गायकवाड १०१, टिळक वर्मा ६०, मोहम्मद शिराज २/६७)
श्रीलंका 'अ': ४८.५ षटकांत २६९/१० (सहान आरचिगे ७४, निरोशन डिकवेला स्ट्रोक ४७, अर्शद खान २/२४, आयुष बदोनी २/४६)
निकाल: भारत 'अ' संघ ८ धावांनी विजयी.



द्रविड आणि गंभीरच्या बरोबरीचा विक्रम


भारतीय क्रिकेट संघाबाहेर असला तरी ऋतुराज गायकवाडने आपल्या बॅटची धार कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. श्रीलंका 'अ' विरुद्धच्या सामन्यात दमदार शतक झळकावत त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. गायकवाडने संयमी आणि जबाबदार फलंदाजी करत ११२ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, शतकापर्यंत पोहोचेपर्यंत त्याने केवळ ९ चौकार लगावले. त्यामुळे ही खेळी केवळ आक्रमक नव्हे तर परिपक्व आणि परिस्थितीनुसार खेळलेली होती. त्याच्या या खेळीमुळे भारताला भक्कम धावसंख्या उभारता आली. या शतकासह ऋतुराज गायकवाडच्या लिस्ट-अ कारकिर्दीतील शतकांची संख्या २१ वर पोहोचली आहे. त्यामुळे सर्वाधिक लिस्ट-अ शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत त्याने राहुल द्रविड आणि गौतम गंभीर यांची बरोबरी केली आहे.

Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनकडून पराभवानंतर अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक भावुक! पत्रकार परिषदेत दाटला कंठ, अश्रू अनावर होताच...

न्यू जर्सी : फिफा विश्वचषकातील सर्वात चर्चित सामन्यांपैकी एक ठरलेल्या स्पेनविरुद्धच्या पराभवानंतर

Rohit Sharma : 'निवृत्तीच्या चर्चा सुरु राहिल्या नाहीत तर...' हिटमॅनने एकदिवसीय क्रिकेटमधील भविष्याबाबत सोडले मौन! VIDEO चर्चेत

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत सध्या क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत.

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनचा ऐतिहासिक विजय आणि एका नव्या युगाचा उदय!

फुटबॉल इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा महासंग्राम मानला गेलेला फिफा विश्वचषक २०२६ अत्यंत रोमांचक वातावरणात

Shubman Gill on Rohit Sharma's Retirement : 'रोहितच्या निवृत्तीची चर्चा म्हणजे...'; रोहितच्या निवृत्तीच्या अफवांवर कर्णधार गिलने अखेर सोडलं मौन, दिलं मोठं स्पष्टीकरण

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताला २७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनविरुद्धच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा पराभव; एमिलियानो मार्टिनेझच्या विक्रमी बचावांची चर्चा

NewYork : ऐतिहासिक विश्वचषक अंतिम सामन्यात स्पेनविरुद्ध अर्जेंटिनाला १-० ने पराभवाचा सामना करावा लागला असला तरी,

India vs England : रोहित शर्माचे लॉर्ड्सवर ऐतिहासिक शतक, सचिनचा विक्रमही मोडला

India vs England  : भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध शानदार शतक झळकावत पुन्हा एकदा