Congress : राज्यसभा निवडणूकीपूर्वीच काँग्रेसच्या एकमेव उमेदवाराचा अर्ज रद्द

भोपाळ : मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या एकमेव उमेदवार असलेल्या मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. हैदराबाद येथील न्यायालयात प्रलंबित असलेल्या एका फौजदारी खटल्याची माहिती अर्जात नमूद न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. भाजपकडून यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच ९ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, निर्धारित मुदतीत कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत अर्जामध्ये आवश्यक माहिती लपविण्यात आल्याचे आढळून आल्याने तांत्रिक कारणास्तव त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.



या निर्णयामुळे मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या जागेसाठीच्या निवडणूक प्रक्रियेत काँग्रेस पक्षाची स्पर्धा आता संपुष्टात आली आहे. या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांनी याला "लोकशाहीची हत्या" असे संबोधले. कायदे आणि नियमांकडे दुर्लक्ष करून उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सिंघार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उमेदवारांनी स्वतःविरुद्ध दाखल असलेल्या प्रकरणांची माहिती देणे बंधनकारक असले, तरी केवळ कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेल्या प्रकरणाच्या आधारे अशी कारवाई करणे नियमबाह्य आहे. या निर्णयाविरोधात काँग्रेस न्यायालयात दाद मागणार असून हा मुद्दा जनतेसमोरही मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Babasaheb Patil : गटसचिवांच्या न्याय्य मागण्यांवर कायदेशीर व प्रशासकीय बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेऊ

मुंबई, दि. ९ जून : राज्यातील गटसचिवांच्या सेवा विषयक प्रश्न वेतन थकीत देयके तसेच जिल्हा संवर्गाच्या

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मानाचा स्कॉच पुरस्कार

शासन आपल्या दारी'च्या यशाबद्दल 'स्कॉच ग्रुप' कडून झाला सन्मान २०२४ साली जाहीर झालेला पुरस्कार आज उपमुख्यमंत्री

MSRDC : आराखडा तयार करावा,ऊर्जा राज्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई,  : तिसऱ्या मुंबईचा विकास जलद गतीने होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विकास प्रक्रियेवर लक्ष

Dr. Neelam Gorhe : महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि विद्यार्थी सुसंवादासाठी व्यासपीठ सुरू होणार

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीत तातडीने सुधारणा करावी आणि स्पर्धा परीक्षार्थींच्या

Crime News : पोलीस असल्याचे सांगत वृद्धाला गंडा; साडेतीन तोळ्यांचे दागिने घेऊन पसार

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर शहरात पुन्हा एकदा ‘बनावट पोलीस’ टोळी सक्रिय झाल्याचं समोर आलं असून, पोलीस असल्याची बतावणी

Tri Nation Series : ऋतुराजचे शतक; भारत 'अ' संघाची श्रीलंका 'अ' समोर २७८ धावांची आव्हानात्मक धावसंख्या

Dambulla, Sri Lanka: श्रीलंकेतील रंगिरी दंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू झालेल्या 'त्रिराष्ट्रीय अ' मालिकेच्या