Congress : राज्यसभा निवडणूकीपूर्वीच काँग्रेसच्या एकमेव उमेदवाराचा अर्ज रद्द

भोपाळ : मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या एकमेव उमेदवार असलेल्या मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. हैदराबाद येथील न्यायालयात प्रलंबित असलेल्या एका फौजदारी खटल्याची माहिती अर्जात नमूद न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. भाजपकडून यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नटराजन यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच ९ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, निर्धारित मुदतीत कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत अर्जामध्ये आवश्यक माहिती लपविण्यात आल्याचे आढळून आल्याने तांत्रिक कारणास्तव त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.



या निर्णयामुळे मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या जागेसाठीच्या निवडणूक प्रक्रियेत काँग्रेस पक्षाची स्पर्धा आता संपुष्टात आली आहे. या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत विरोधी पक्षनेते उमंग सिंघार यांनी याला "लोकशाहीची हत्या" असे संबोधले. कायदे आणि नियमांकडे दुर्लक्ष करून उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सिंघार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उमेदवारांनी स्वतःविरुद्ध दाखल असलेल्या प्रकरणांची माहिती देणे बंधनकारक असले, तरी केवळ कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेल्या प्रकरणाच्या आधारे अशी कारवाई करणे नियमबाह्य आहे. या निर्णयाविरोधात काँग्रेस न्यायालयात दाद मागणार असून हा मुद्दा जनतेसमोरही मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Deep Amavasya : दीप अमावस्येला कशी करावी दिव्यांची पूजा ? सविस्तर जाणून घ्या...

मुंबई : हिंदू पुराणानुसार, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 'दीप अमावस्येला' घरातील सर्व दिव्यांची पूजा

Best Outfits For Beach Trip : समुद्रकिनारी स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसण्यासाठी ‘हे’ आउटफिट्स नक्की ट्राय करा

मुंबई : समुद्रकिनारी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर कपड्यांची निवडही तितकीच महत्त्वाची ठरते. बीचवर उन्हं,

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट

Jalgaon : भंगार विक्रीतून मध्य रेल्वे मालामाल, भुसावळ विभाग ३३ कोटींच्या महसुलासह दुसऱ्या क्रमांकावर

Jalgaon : आजपर्यंत आपण तिकीट विक्री किंवा तिकीट तपासणी मधून रेल्वे विभागाने (Central Railway) कोटींची कमाई केल्याचे ऐकले असेल,

Empty Stomach Food : सकाळी रिकाम्या पोटी नक्की काय खावं अन् काय टाळावं? 'या' एका चुकीमुळे बिघडू शकतं तुमचं पचनतंत्र!

रिकाम्या पोटी प्रत्येकासाठी एकच पदार्थ योग्य असेल असे नाही. तुमची पचनशक्ती, अॅसिडिटी आणि इतर आरोग्यविषयक

Dombivli Barvi Dam : कल्याण - डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, बारवी धरण ९९.८८ टक्के भरले

डोंबिवली : कल्याण - डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील मोठ्या भागाची तहान भागविणारे बारवी धरण ९९.८८