Kangna Ranaut : "मी एक अभिनेत्री म्हणून..." राजकारणी बनलेल्या कंगना रनौतने व्यक्त केली मनातील खंत!

नवी दिल्ली : बॉलिवूडची 'क्वीन' (Bollywood Queen) आणि विद्यमान खासदार कंगना रनौत (Kangana Ranaut) तिच्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता तिच्या आगामी 'भारत भाग्य विधाता' (Bharat Bhagya Vidhata) या चित्रपटामुळे ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. या चित्रपटात ती एका नर्सची भूमिका साकारत असून, या निमित्ताने तिने परिचारिकांच्या सध्याच्या गणवेशावर (Dress Code) थेट प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. नर्सेसचा सध्याचा गणवेश हा ब्रिटिश राजवटीची आठवण करून देणारा असून, भारतीय हवामान आणि सोयीनुसार त्यात बदल करणे गरजेचे असल्याचे मत तिने व्यक्त केले आहे.

डॉक्टरांना सवलत, मग नर्सेसना का नाही?


एका विशेष मुलाखतीत कंगनाने वैद्यकीय क्षेत्रातील एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले. ती म्हणाली की, रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना त्यांच्या व्यावसायिक पेहरावात काही प्रमाणात सूट दिली जाते, ते त्यांच्या कम्फर्टनुसार कपडे निवडू शकतात. मात्र, परिचारिका आजही अशा एका पारंपरिक ड्रेस कोडमध्ये अडकलेल्या आहेत, ज्याचा लूक पूर्णपणे परदेशी आणि पाश्चात्य वाटतो.


दुसऱ्या महायुद्धाचा आणि अमेरिकन नौदलाचा प्रभाव


नर्सेसच्या गणवेशाच्या इतिहासावर बोलताना कंगनाने सांगितले की, या डिझाईनमध्ये अनेक वर्षांपासून कोणताही मोठा बदल झालेला नाही. नर्सेस वापरत असलेली कॅप, पिन आणि बेल्ट या गोष्टी तिला 'यूएस नेव्ही'च्या (US Navy) युनिफॉर्मची आठवण करून देतात. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात असे गणवेश वापरले जायचे. कंगना म्हणाली, "आपण आजही ब्रिटिश नर्सेसचाच ड्रेस कोड जसाच्या तसा फॉलो करत आहोत. पण असे असले तरी, चित्रपटात काम करताना आम्ही नर्सेसच्या या गणवेशाचा आणि त्यांच्या निस्वार्थ सेवेचा पुरेपूर आदर राखला आहे. शेवटी, तुमचा आकार किंवा ठेवण महत्त्वाची नसून, तुमची ड्युटी हाच तुमचा खरा युनिफॉर्म असतो."

नर्सेसच्या सोयीनुसार हवा 'भारतीय टच'


?si=vZHD43lG3Gd-xfF6

या गणवेशात भविष्यात सकारात्मक बदल व्हावेत, अशी आशा कंगनाने व्यक्त केली. ती म्हणाली की, बाहेरचे हवामान कितीही गरम किंवा थंड असो, नर्सेसना एका विशिष्ट परदेशी लुकमध्येच राहावे लागते. भविष्यात जर नर्सेसना स्वतःला या बदलाची गरज वाटत असेल, तर त्यांच्या सोयीनुसार आणि पसंतीनुसार या गणवेशाला 'भारतीय रंगरूप' (Indian Touch) दिले गेले पाहिजे, हा नक्कीच एक स्वागतार्ह बदल ठरेल.

काय आहे 'भारत भाग्य विधाता'ची कथा?


या आगामी चित्रपटात कंगना रनौत एका 'स्टाफ नर्स'च्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. समाजाची निस्वार्थ सेवा करूनही ज्यांच्या अफाट श्रमाची फारशी दखल घेतली जात नाही, अशा एका सामान्य महिलेचा संघर्ष ती पडद्यावर साकारणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, तो अंगावर काटा आणणारा आहे. एका अत्यंत कठीण आणि आणीबाणीच्या प्रसंगात तब्बल ४०० हून अधिक लोकांचे प्राण वाचवण्यासाठी दाखवलेल्या असामान्य धैर्याची ही हृदयद्रावक सत्यकथा आहे. संकटाच्या काळात नेहमीचे प्रसिद्ध चेहरे नाही, तर नर्सेस आणि वॉर्ड बॉयजसारखे 'अनसंग हिरोज' (Unsung Heroes) कसे शांतपणे रक्षणकर्ते ठरतात, हे यात दाखवले आहे. त्यांच्या समर्पणाशिवाय आरोग्य व्यवस्था कशी कोलमडली असती, याची जाणीव हा चित्रपट करून देतो.

कधी प्रदर्शित होणार चित्रपट?


मनोज तापडिया (Manoj Tapadia) यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा बहुचर्चित आणि थरारक चित्रपट येत्या १२ जून रोजी सर्वत्र चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Comments
Add Comment

Visakhapatnam Steel Plant accident : "आईला जपा, मन लावून शिका..."; विशाखापट्टणम दुर्घटनेत मृत्यूशी झुंज देणाऱ्या पित्याचा काळीज पिळवटून टाकणारा शेवटचा निरोप!

विशाखापट्टणम : कोणताही बाप आपल्या कुटुंबासाठी आणि मुलांच्या भविष्यासाठी दिवसरात्र राबत असतो. मृत्यू समोर दिसत

Samudra Manthan Mission : ऊर्जा स्वावलंबनाकडे भारताची मोठी झेप: अंदमान समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा खजिना!

ANDAMAN : सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात, विशेषतः मध्य-पूर्वेतील तणावामुळे इंधन दर आणि पुरवठ्याबाबत जगभरात

Ujjawala scheme : उज्ज्वला योजनेच्या अनुदानावर मर्यादा, लाभार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या एलपीजी (LPG Gas) गॅस अनुदानाबाबत नवीन चर्चांना उधाण आले आहे. योजनेतील

Israel-Iran Conflict : इस्रायल-इराण संघर्ष भडकला; भारताने संवादातून तोडगा काढण्याची केली मागणी

नवी दिल्ली : पश्चिम आशिया आणि खाडी प्रदेशातील तणाव वाढल्यानंतर भारताने सोमवारी पुन्हा एकदा संघर्ष तातडीने कमी

Visakhapatnam Steel Plant : विशाखापट्टणमच्या स्टील प्रकल्पात दुर्घटना, वितळलेले स्टील अंगावर पडले आणि...

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या स्टील प्रकल्पात मोठी दुर्घटना झाली. काम सुरू असताना वितळलेले

दिल्ली आग प्रकरणी हॉटेलच्या मुख्य अकाउंटंटचे न्यायालयासमोर आत्मसमर्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): दिल्लीतील मालवीय नगर येथील एका गेस्ट हाऊसला लागलेल्या भीषण आगीत २२ जणांचा मृत्यू झाला