Sanjay Nirupam : नाशिक TCS प्रकरणात मोठा गौप्यस्फोट! मलेशियाचा थेट संबंध असल्याचा दावा

MUMBAI : नाशिकमधील टीसीएस कंपनीतल्या हिंदु महिला कर्मचाऱ्यांसोबत सक्तीचे धर्मांतरण, लैंगिक आणि आर्थिक शोषणामागे मलेशिया आणि पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय टोळी कार्यरत असून मलेशियातील टीसीएसचा थेट संबंध असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी आज केला. नाशिक ‘टीसीएस’ प्रकरणी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यावरुन निरुपम यांनी मलेशियात बसलेला फरार आरोपी इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईक व ‘एमआयएम’च्या नेत्यांची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच पॉश कायद्याची (POSH) अंमलबजावणी करण्यास हलगर्जीपणा केल्याबद्दल ‘टीसीएस’वर कारवाई होणे आवश्यक आहे, असे निरुपम यांनी सांगितले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



निरुपम म्हणाले की, ‘टीसीएस’ प्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या आरोपपत्रांमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पीडित हिंदू तरुणीचे धर्मांतर करण्यासाठी तिला सोशल मीडियावरील झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून तिचे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न आरोपींकडून सातत्याने करण्यात आला. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी निदा खान, दानिश शेख, तौफिक अत्तार हे तिघेच सूत्रधार नाहीत तर त्यांच्या पाठीशी मलेशिया आणि पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय टोळ्या कार्यरत असल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे. दानिश आणि तौफिक हे पिडितेला मलेशियाला पाठवणार होते, असेही आरोपत्रात म्हटले आहे. त्यामुळे आरोपींचे मलेशियाशी थेट संबंध होते, हे स्पष्ट दिसतंय असे निरुपम म्हणाले. याच मलेशियात फरार आरोपी झाकीर नाईक लपून बसला आहे. या झाकिर नाईकची संस्था किंवा एजन्सी महाराष्ट्रात कॉर्पोरेट्समध्ये काम करणाऱ्या हिंदु मुलींना धर्मांतरासाठी टार्गेट करत आहेत का, याबाबत तपास यंत्रणांनी चौकशी करायला हवी, अशी मागणी निरुपम यांनी केली.



निरुपम पुढे म्हणाले की, या प्रकरणातील आरोपी निदा खान ४० दिवस फरार होती. पोलीसांच्या शोध मोहीमेत ती छत्रपती संभाजी नगरमधील ‘एमआयएम’चे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरी कुटुबांसह सापडली. यात निदा खान आणि नगरसेवक मतीन पटेल यांना पोलीसांनी अटक केली. पोलीस चौकशीत मतीन पटेल याने वारंवार इम्तियाज जलीलचे नाव घेतले होते. जलील हे एमआयएमचे महाराष्ट्राचे प्रमुख आणि माजी खासदार आहेत. ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभागात निवडून आलेली ‘एमआयएम’ची नगरसेविका मुंब्र्याला हिरवे करणार असा दावा करते. यावेळी तिच्या सोबत असलेले इम्तियाज जलील तिथं केवळ मुंब्राच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्र हिरवा करणार असे जाहीर वक्तव्य करुन वाद निर्माण करतात. त्यामुळे टीसीएस प्रकरणात ‘एमआयएम’चा सहभाग असू शकतो, असा आरोप निरुपम यांनी यावेळी केला. तपास यंत्रणांनी ‘एमआयएम’च्या नेत्यांनी सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी निरुपम यांनी केली.

संपूर्ण प्रकरण ज्या कंपनीत घडले त्या टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपनीवर पॉश कायद्याची (POSH) काटेकोर अंमलबजावणी करण्यास हलगर्जीपणा केल्याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली.


महाराष्ट्रातील बड्या कॉर्पोरेट्सची चौकशी करावी


नाशिकमधील टीसीएस प्रकरणाची राज्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्यातील आयटी, फार्मा आणि मल्टी नॅशनल कंपन्यांमध्ये महिला कर्मचारी सुरक्षितरित्या काम करत आहेत का, याबाबत पोलीस आणि राज्य सरकारने चौकशी करायला हवी, अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली.
Comments
Add Comment

Maharashtra Monsoon Trip : मान्सून ट्रिप करायची? महाराष्ट्रातील या ८ निसर्गरम्य ठिकाणांना नक्की भेट द्या!

पावसाळ्याची पहिली सर, सर्वत्र मातीचा सुगंध आणि हिरवागार निसर्गाच्या सानिध्यात पावसाळ्यात एक वेगळीच मजा

Kidambi Srikanth : किदांबी श्रीकांतच्या खिलाडूवृत्तीने जिंकली प्रेक्षकांची मने

कॅलिफोर्निया(California) : भारताचा माजी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने(Kidambi Srikanth)

Voter List Update : मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट

रायगड : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या राशीनुसार नेसा 'या' शुभ रंगांची साडी

मुंबई : विवाहित महिलांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जाणारा वटपौर्णिमेचा सण आता अवघ्या काही तासांवर

Vat Purnima 2026: यंदाची वटपौर्णिमा ठरणार खास; सोमवारी दुर्मिळ शुभ संयोग, जाणून घ्या पूजेचा मुहूर्त

यंदा वटपौर्णिमा (Vat Purnima 2026) २९ जून २०२६ रोजी साजरी केली जाणार असून या वर्षीचा सण धार्मिकदृष्ट्या विशेष मानला जात आहे.

Soccer Ball : फुटबॉल इतिहासातील ५ अजरामर बॉल; ज्यांनी बदलली खेळाची दिशा!

फुटबॉलच्या मैदानावर खेळाडूंचे कौशल्य जितके महत्त्वाचे असते, तितकेच महत्त्वाचे असते तो 'बॉल'. तंत्रज्ञान आणि